शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

कोजागिरीनिमित्त विचारमंथन कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 00:03 IST

खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये समाजहित जोपासण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रविवारी सायंकाळी विविध विषयांवर विचार मंथन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये समाजहित जोपासण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रविवारी सायंकाळी विविध विषयांवर विचार मंथन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.कृषीरत्न पुरस्कार प्राप्त विजयअण्णा बोराडे, कृषीभूषण भगवानराव काळे, कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ, प्राध्यापक, शिक्षक वृंद आणि वर्षभरात कृषी विज्ञान केंद्रात होणाऱ्या कार्यक्रमाला सातत्याने सहभागी होणारे आदींच्या पुढाकारातून ही कोजागिरी पौर्णिमा कृषी विज्ञान केंद्रामध्ये साजरी केली जात आहे.कोजागिरीच्या दिवशी सायंकाळी सात वाजल्यापासून येथे जिल्ह्यासह औरंगाबाद जिल्ह्यातून मोठ्या संख्येने नागरिक येतात. रात्री आठ वाजेपर्यंत सर्वांचा एकमेकांशी परिचय होतो. स्नेहभोजन होते. यानंतर तासाभराचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येतो. कार्यक्रम झाल्यानंतर सर्व चालू- घडामोडींवर आधारित जाणवणा-या समस्येविषयी चार- पाच वेगवेगळे विषय ठेवण्यात येतात. या माध्यमातून सर्वानुमते एक विषयावर विचार मंथन होते. यावेळी प्रत्येक जण स्वत:ची भूमिका मांडतात. हा मोलाचा संदेश कोजागिरीला उपस्थित असलेला प्रत्येक जण आपल्या गावी घेऊन जातो. यानंतर केलेल्या कामावर कृतीतून अंमलबजावणी केली जात आहे. मागील पंधरा वर्षांपासून हा उपक्रम कोजागिरी पौर्णिमेनिमित्त राबविण्यात येत आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ब्रह्मदेव येवले यांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. शिवाय धुलिवंदनाचा अनोखा कार्यक्रमही येथे वेगळ््या पद्धतीने साजरा केला जातो.

टॅग्स :kojagariकोजागिरीscienceविज्ञानcultureसांस्कृतिक