शहरं
Join us  
Trending Stories
1
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
2
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
3
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
4
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
5
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
6
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
7
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
8
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...
9
Pranjal Khewalkar Arrest : मोबाईलमधून हाऊस पार्टीतील महिलांशी केलेली चॅटिंग व पार्टीचे व्हिडिओ सापडले
10
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
11
Sonam Raghuvanshi : बेवफा सोनमवर चित्रपट येणार, 'हे' नाव असणार; दिग्दर्शकाने घेतली राजा रघुवंशीच्या भावाची भेट
12
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी
13
शेजारी राहणाऱ्या महिलेवर केले वार, गुप्तांगावरही ओरबाडलं अन् जंगलात फेकून दिलं! तरुण का झाला हैवान?
14
राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले, उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर कधी जाणार? ‘ते’ मुहूर्त तर हुकले, आता...
15
पोस्टाची 'ही' स्कीम हलक्यात घेऊ नका; थोडी थोडी गुंतवणूक करून जमवू शकता १७ लाखांचा फंड
16
खळबळजनक! HIV पॉझिटिव्ह अन् कर्जबाजारी होता भाऊ; रक्षाबंधनाच्या आधी बहीण झाली निष्ठूर
17
विवाहित पुरुषापासून दूर रहा...! कोर्टाचा महिलेला अजब आदेश, स्वत: विवाहित होती, तरी तिला...
18
नेपाळमध्ये ISI उभं करतंय नेटवर्क, 'बांगलादेशी मॉडेल'चा वापर; 'असा' रचला जातोय भारताविरोधी कट
19
अरे देवा! मुलगा वर्गात झोपला अन् शाळेला कुलूप लावून शिक्षक गेले घरी, जाग आल्यावर घाबरून...
20
९ महिन्यापूर्वी लव्ह मॅरेज अन् आज फेसबुकवर शेवटचा मेसेज लिहून जोडप्यानं संपवलं आयुष्य

खासगीकरणाच्या माध्यमातून आरक्षणाला मुठमाती देण्याचे षड्यंत्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 00:50 IST

दलित, आदिवासी तसेच ओबीसी या समाजातील मागास घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य घटनेने आरक्षण दिले. त्यामुळे समाजातील या घटकांची थोडी प्रगती झाली. मात्र, या घटकांना विकासाच्या प्रवाहापासून रोखण्यासाठी नोकऱ्यांचे खासगीकर आणि कंत्राटीकरण करून आरक्षणाला मुठमाती देण्याचे षड्यंत्र या सरकारकडून सुरू आहे, असे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष तथा अर्थतज्ज्ञ डॉ. सुखदेव थोरात यांनी केले.

ठळक मुद्देसुखदेव थोरात : ३५ व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाला थाटात प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाधर पानतावणे नगरी, जालना : दलित, आदिवासी तसेच ओबीसी या समाजातील मागास घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य घटनेने आरक्षण दिले. त्यामुळे समाजातील या घटकांची थोडी प्रगती झाली. मात्र, या घटकांना विकासाच्या प्रवाहापासून रोखण्यासाठी नोकऱ्यांचे खासगीकर आणि कंत्राटीकरण करून आरक्षणाला मुठमाती देण्याचे षड्यंत्र या सरकारकडून सुरू आहे, असे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष तथा अर्थतज्ज्ञ डॉ. सुखदेव थोरात यांनी केले.

३५ व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे जालन्यातील मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात डॉ. सुखदेव थोरात यांच्या हस्ते उद््घाटन झाले. यावेळी बोलताना डॉ. थोरात म्हणाले, दलित साहित्याचा पाया महाराष्ट्रात घातला गेला असला तरी, सीमापार करून ते आज सातासमुद्रापार पोहोचले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विपूल साहित्य लिहिले. परंतु त्यावेळी आजच्या एवढा डाटा संकलन नव्हते. त्यामुळे ज्यातून विचारांना प्रेरणा मिळून समाजाचे वास्तव असेल तेच चांगले, असा त्यांचा मानदंड होता. दलित साहित्यात दलित अधिकाºयांचाही सिंहाचा वाटा असल्याचे थोरात म्हणाले. आजही दलित समाजातील जवळपास ६५ टक्के लोक हे आपली उपजिविका मोलमजूरी करूनच भागवत आहेत. मनुस्मृतीमुळे त्यांना संपत्ती निर्मितीचा अधिकार नाकरल्याचे परिणाम आजही ते भोगत असल्याचे वास्तव आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.आरक्षण हटविणे कोणालाही शक्य नाही. कल्याणकारी राज्याबाबतच्या सूचना या घटनेनेच सर्वांना दिल्या आहेत. आरक्षणाच्या मुद्याला सुरूंग लावण्यासाठी नोकºयाप्रमाणेच शिक्षणाचेही खासगीकरण केले जात असल्याचे थोरात यावेळी म्हणाले.उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ साहित्यीक श्रीपाल सबनीस, संमेलनाचे अध्यक्ष डी.बी. जगत्पुरीया, नीतीन राऊत यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात डॉ. विजय कुमठेकर, निवेदिता पानतावणे यांनी अस्मितादर्शची भूमिका भविष्यातील वाटचालीबद्दल मनोगत व्यक्त केले. स्वागताध्यक्ष डॉ. संजय लाखे पाटील यांनी देखील भूमिका विशद केली.राज्य घटनेची मिरवणूकसाहित्य संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी, सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून राज्य घटनेची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष डी.बी. जगत्पुरीया, अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस, माजी मंत्री आणि अ.भा. काँग्रेस समितीच्या मागासवर्गीय विभागाचे अध्यक्ष डॉ. नीतीन राऊत, स्वांगताध्यक्ष डॉ. संजय लाखे पाटील, अस्मितादर्शच्या संपादिका आणि संवर्धक डॉ. निवेदिता पानतावणे, न. प. उपाध्यक्ष राजेश राऊत, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, संमेलन कार्याध्यक्ष डॉ. विजय कुमठेकर, सचिव राम गायकवाड आदींची उपस्थिती होती.गीता द्यावी पण...जपानच्या दौºयावर असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानच्या पंतप्रधानांना राज्य घटनेऐवजी गीता भेट दिली. त्यावर आम्हाला आक्षेप नाही. धर्माचरण करण्याचा अधिकार घटनेने सर्वांना दिला आहे. पण, गीतेत जी वर्णव्यवस्था आहे. तिची अंमलबजावणी करू नका, असा सल्ला थोरात यांनी दिला. वर्णव्यवस्थेतूनच जातीयतेची बीजे रोवली गेली आहेत, असे थोरात म्हणाले.

टॅग्स :JalanaजालनाAsmitadarsh Sahitya Sammelanअस्मितादर्श साहित्य संमेलन