शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

जालन्यातील काँग्रेसचे नेते मुंबईत तळ ठोकून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:37 IST

लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी आत वेगात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते मुंबईत तळ ठोकून आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी आत वेगात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते मुंबईत तळ ठोकून आहेत. गुरूवारी सकाळी ११ वाजता जिल्ह्यातील काँग्रेसचे हे सर्व नेते प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले.जालना लोकसभा मतदारसंघ हा आघाडीच्या धर्मात काँग्रेसला सुटलेला आहे. त्यातच १९९६ नंतर येथे काँग्रेस उमेदवाराला भाजपच्या विरोधात पराभवच पत्करावा लागला. यावेळी मात्र काँग्रेसला पोषक वातावरण असल्याचा दावा काँग्रेसकडून केला जात आहे. मध्यंतरी शिवसेनेचा बडा नेता काँग्रेसमध्ये येणार म्हणून जोरदार चर्चा होती, परंतु त्या चर्चेला आता जवळपास पूर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसने उमेदवारी संदर्भात चाचपणी सुरू केली असून, आ. कल्याण काळे यांचे नाव आघाडीवर आहे.असे असले तरी जालन्यातील नेते जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, काँग्रेस समितीचे केंद्रीय सदस्य तथा माजी सभापती भीमराव डोंगरे, माजी आ. कैलास गोरंट्याल, शहराध्यक्ष शेख महेमूद, प्रभारी मनोज पाटील, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य कल्याण दळे आदी नेते मुंबईत तळ ठोकून आहेत.आ. कल्याण काळे यांनी २००९ मध्ये खा. रावसाहेब दानवे यांना जबरदस्त टक्कर देत त्यांच्या तोंडचे पाणी पळवले होते. काळे यांचा पराभव हा केवळ साडे आठ हजार मतांनी झाला होता. त्यामुळे त्यांच्या नावाला सर्वमान्यता असल्याचे बोललले जात आहे.मात्र कल्याण काळे हे निवडणूक लढविण्यास इच्छुक नसल्याचे त्यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. परंतु जर काँग्रेस हाय कमांडने सांगितल्यावर त्यांना मैदानात उतरावेच लागेल असे सांगण्यात येते. जर कल्याण काळे यांनी नकार दिल्यास पर्याय म्हणून अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य तथा माजी सभापती भीमराव डोंगरे यांना उमेदवारी देण्याची मागणी जालन्यातील हे नेते प्रदेशाध्यक्ष चव्हाणांकडे करणार असल्याचे सांगण्यात आले.भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुकतेच माजी आ. अरविंद चव्हाण यांनी प्रवेश केला आहे. तर काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेले अंबडचे माजी आ. अ‍ॅड. विलास खरात हे पुन्हा घर वापसीच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा असून, काँग्रेसकडून थेट खासदारकीचे तिकीट मिळविण्यासाठी त्यांनी लॉबिंग सुरू केल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :congressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक