शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

जालन्यातील काँग्रेसचे नेते मुंबईत तळ ठोकून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:37 IST

लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी आत वेगात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते मुंबईत तळ ठोकून आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी आत वेगात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते मुंबईत तळ ठोकून आहेत. गुरूवारी सकाळी ११ वाजता जिल्ह्यातील काँग्रेसचे हे सर्व नेते प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले.जालना लोकसभा मतदारसंघ हा आघाडीच्या धर्मात काँग्रेसला सुटलेला आहे. त्यातच १९९६ नंतर येथे काँग्रेस उमेदवाराला भाजपच्या विरोधात पराभवच पत्करावा लागला. यावेळी मात्र काँग्रेसला पोषक वातावरण असल्याचा दावा काँग्रेसकडून केला जात आहे. मध्यंतरी शिवसेनेचा बडा नेता काँग्रेसमध्ये येणार म्हणून जोरदार चर्चा होती, परंतु त्या चर्चेला आता जवळपास पूर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसने उमेदवारी संदर्भात चाचपणी सुरू केली असून, आ. कल्याण काळे यांचे नाव आघाडीवर आहे.असे असले तरी जालन्यातील नेते जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, काँग्रेस समितीचे केंद्रीय सदस्य तथा माजी सभापती भीमराव डोंगरे, माजी आ. कैलास गोरंट्याल, शहराध्यक्ष शेख महेमूद, प्रभारी मनोज पाटील, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य कल्याण दळे आदी नेते मुंबईत तळ ठोकून आहेत.आ. कल्याण काळे यांनी २००९ मध्ये खा. रावसाहेब दानवे यांना जबरदस्त टक्कर देत त्यांच्या तोंडचे पाणी पळवले होते. काळे यांचा पराभव हा केवळ साडे आठ हजार मतांनी झाला होता. त्यामुळे त्यांच्या नावाला सर्वमान्यता असल्याचे बोललले जात आहे.मात्र कल्याण काळे हे निवडणूक लढविण्यास इच्छुक नसल्याचे त्यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. परंतु जर काँग्रेस हाय कमांडने सांगितल्यावर त्यांना मैदानात उतरावेच लागेल असे सांगण्यात येते. जर कल्याण काळे यांनी नकार दिल्यास पर्याय म्हणून अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य तथा माजी सभापती भीमराव डोंगरे यांना उमेदवारी देण्याची मागणी जालन्यातील हे नेते प्रदेशाध्यक्ष चव्हाणांकडे करणार असल्याचे सांगण्यात आले.भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुकतेच माजी आ. अरविंद चव्हाण यांनी प्रवेश केला आहे. तर काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेले अंबडचे माजी आ. अ‍ॅड. विलास खरात हे पुन्हा घर वापसीच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा असून, काँग्रेसकडून थेट खासदारकीचे तिकीट मिळविण्यासाठी त्यांनी लॉबिंग सुरू केल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :congressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक