शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

महावितरण व पालिकेत बिलावरून सुंदोपसुंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 00:29 IST

शहागड-जालना या पाच वर्षांपासून बंद पाईपलाइनचे ५१ कोटींची थकित वीज भरण्यासाठी महावितरणने नगरपालिकेला नोटीस बजावली आहे. बिल न भरल्यास शहरातील पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. महावितरणची ही मनमानी असून याविरुद्ध आपण जलआंदोलन छेडणार असल्याची माहिती नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहागड-जालना या पाच वर्षांपासून बंद पाईपलाइनचे ५१ कोटींची थकित वीज भरण्यासाठी महावितरणने नगरपालिकेला नोटीस बजावली आहे. बिल न भरल्यास शहरातील पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. महावितरणची ही मनमानी असून याविरुद्ध आपण जलआंदोलन छेडणार असल्याची माहिती नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. अंबड नगरपालिकेला पाणी देण्याचा कुठलाही निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी रविवारी पत्रकार परिषदेत याबाबत भूमिका मांडली. शहागड-अंबड-जालना ही योजना जायकवाडी-जालना पाणीपुरवठा योजना सुरू झाल्यापासून पूर्णत: बंद आहे. असे असतानाही महावितरणने नगरपालिका तब्बल पाच वर्षांनंतर थकित वीजबिल भरण्याबाबत नोटीस पाठवली आहे. योजनेच्या अंबड येथील मीटरवर (क्र.५१००१९००५१०९) १७ कोटी, ४२ लाख ५६ हजार २१८ रुपये आणि शहागड येथील जोडणीवर (क्र. ५१००१९००५०९५) ३३ कोटी, ९५ लाख ३६ हजार रुपये, अशी एकूण ५१ कोटी ३७ लाख ९२ हजार २२० रुपये थकबाकी आहे. दोन्ही ठिकाणच्या जोडण्या कायमस्वरुपी खंडित आहेत. त्यामुळे थकित देयके सात दिवसांत भरावीत अन्यथा थकित रक्कम सध्या जायकवाडी योजनेसाठी सुरू असलेल्या फिल्टरबेड व मस्तगड येथील मीटरवर समायोजित करण्यात येईल, असे नोटिसीत नमूद आहे. महावितरणने ही नोटीस देण्याबाबत पालिकेला कुठलीही माहिती दिली नाही. शिवाय थकित बिलाची कुठलीही कॉपी सोबत पाठवलेली नाही.जालना नगरपालिकेने शहरातील पाणीपुरवठ्याचे थकित वीजबिल एकरकमी भरले. सध्या नियमित बिल अदा केले जात आहे. मात्र, महावितरणने भाजप,सेनेच्या राजकीय दबावातून ही नोटीस पाठवली आहे. महावितरणच्या या मनमानीविरुद्ध जनआंदोलन छेडणार असल्याचे गोरंट्याल यांनी सांगितले. सत्ताधारी नेते जालना पालिका प्रशासनाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले. या वेळी नगरसेवक जगदीश भरतिया, शेख महेमूद यांची उपस्थिती होती.जालन्याची भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता अंबडला पाणी देण्याचा कुठलाही करार जालना पालिका करणार नाही. अंबडला केवळ व्यावसायिक दराने पाणी दिले जाईल, असे गोरंट्याल यांनी स्पष्ट केले. शहागड-जालना अंबड योजेतून अंबडने कुठलाही खर्च न देता अनेक वर्ष फुकट पाणी घेतल्याचा आरोप त्यांनी केला.