शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

महावितरण व पालिकेत बिलावरून सुंदोपसुंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 00:29 IST

शहागड-जालना या पाच वर्षांपासून बंद पाईपलाइनचे ५१ कोटींची थकित वीज भरण्यासाठी महावितरणने नगरपालिकेला नोटीस बजावली आहे. बिल न भरल्यास शहरातील पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. महावितरणची ही मनमानी असून याविरुद्ध आपण जलआंदोलन छेडणार असल्याची माहिती नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहागड-जालना या पाच वर्षांपासून बंद पाईपलाइनचे ५१ कोटींची थकित वीज भरण्यासाठी महावितरणने नगरपालिकेला नोटीस बजावली आहे. बिल न भरल्यास शहरातील पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. महावितरणची ही मनमानी असून याविरुद्ध आपण जलआंदोलन छेडणार असल्याची माहिती नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. अंबड नगरपालिकेला पाणी देण्याचा कुठलाही निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी रविवारी पत्रकार परिषदेत याबाबत भूमिका मांडली. शहागड-अंबड-जालना ही योजना जायकवाडी-जालना पाणीपुरवठा योजना सुरू झाल्यापासून पूर्णत: बंद आहे. असे असतानाही महावितरणने नगरपालिका तब्बल पाच वर्षांनंतर थकित वीजबिल भरण्याबाबत नोटीस पाठवली आहे. योजनेच्या अंबड येथील मीटरवर (क्र.५१००१९००५१०९) १७ कोटी, ४२ लाख ५६ हजार २१८ रुपये आणि शहागड येथील जोडणीवर (क्र. ५१००१९००५०९५) ३३ कोटी, ९५ लाख ३६ हजार रुपये, अशी एकूण ५१ कोटी ३७ लाख ९२ हजार २२० रुपये थकबाकी आहे. दोन्ही ठिकाणच्या जोडण्या कायमस्वरुपी खंडित आहेत. त्यामुळे थकित देयके सात दिवसांत भरावीत अन्यथा थकित रक्कम सध्या जायकवाडी योजनेसाठी सुरू असलेल्या फिल्टरबेड व मस्तगड येथील मीटरवर समायोजित करण्यात येईल, असे नोटिसीत नमूद आहे. महावितरणने ही नोटीस देण्याबाबत पालिकेला कुठलीही माहिती दिली नाही. शिवाय थकित बिलाची कुठलीही कॉपी सोबत पाठवलेली नाही.जालना नगरपालिकेने शहरातील पाणीपुरवठ्याचे थकित वीजबिल एकरकमी भरले. सध्या नियमित बिल अदा केले जात आहे. मात्र, महावितरणने भाजप,सेनेच्या राजकीय दबावातून ही नोटीस पाठवली आहे. महावितरणच्या या मनमानीविरुद्ध जनआंदोलन छेडणार असल्याचे गोरंट्याल यांनी सांगितले. सत्ताधारी नेते जालना पालिका प्रशासनाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले. या वेळी नगरसेवक जगदीश भरतिया, शेख महेमूद यांची उपस्थिती होती.जालन्याची भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता अंबडला पाणी देण्याचा कुठलाही करार जालना पालिका करणार नाही. अंबडला केवळ व्यावसायिक दराने पाणी दिले जाईल, असे गोरंट्याल यांनी स्पष्ट केले. शहागड-जालना अंबड योजेतून अंबडने कुठलाही खर्च न देता अनेक वर्ष फुकट पाणी घेतल्याचा आरोप त्यांनी केला.