शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
2
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
3
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
4
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
5
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
6
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
7
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
8
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
9
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
10
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
11
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
12
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
13
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
14
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
15
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
16
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
17
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
18
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

महावितरण व पालिकेत बिलावरून सुंदोपसुंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 00:29 IST

शहागड-जालना या पाच वर्षांपासून बंद पाईपलाइनचे ५१ कोटींची थकित वीज भरण्यासाठी महावितरणने नगरपालिकेला नोटीस बजावली आहे. बिल न भरल्यास शहरातील पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. महावितरणची ही मनमानी असून याविरुद्ध आपण जलआंदोलन छेडणार असल्याची माहिती नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहागड-जालना या पाच वर्षांपासून बंद पाईपलाइनचे ५१ कोटींची थकित वीज भरण्यासाठी महावितरणने नगरपालिकेला नोटीस बजावली आहे. बिल न भरल्यास शहरातील पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. महावितरणची ही मनमानी असून याविरुद्ध आपण जलआंदोलन छेडणार असल्याची माहिती नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. अंबड नगरपालिकेला पाणी देण्याचा कुठलाही निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी रविवारी पत्रकार परिषदेत याबाबत भूमिका मांडली. शहागड-अंबड-जालना ही योजना जायकवाडी-जालना पाणीपुरवठा योजना सुरू झाल्यापासून पूर्णत: बंद आहे. असे असतानाही महावितरणने नगरपालिका तब्बल पाच वर्षांनंतर थकित वीजबिल भरण्याबाबत नोटीस पाठवली आहे. योजनेच्या अंबड येथील मीटरवर (क्र.५१००१९००५१०९) १७ कोटी, ४२ लाख ५६ हजार २१८ रुपये आणि शहागड येथील जोडणीवर (क्र. ५१००१९००५०९५) ३३ कोटी, ९५ लाख ३६ हजार रुपये, अशी एकूण ५१ कोटी ३७ लाख ९२ हजार २२० रुपये थकबाकी आहे. दोन्ही ठिकाणच्या जोडण्या कायमस्वरुपी खंडित आहेत. त्यामुळे थकित देयके सात दिवसांत भरावीत अन्यथा थकित रक्कम सध्या जायकवाडी योजनेसाठी सुरू असलेल्या फिल्टरबेड व मस्तगड येथील मीटरवर समायोजित करण्यात येईल, असे नोटिसीत नमूद आहे. महावितरणने ही नोटीस देण्याबाबत पालिकेला कुठलीही माहिती दिली नाही. शिवाय थकित बिलाची कुठलीही कॉपी सोबत पाठवलेली नाही.जालना नगरपालिकेने शहरातील पाणीपुरवठ्याचे थकित वीजबिल एकरकमी भरले. सध्या नियमित बिल अदा केले जात आहे. मात्र, महावितरणने भाजप,सेनेच्या राजकीय दबावातून ही नोटीस पाठवली आहे. महावितरणच्या या मनमानीविरुद्ध जनआंदोलन छेडणार असल्याचे गोरंट्याल यांनी सांगितले. सत्ताधारी नेते जालना पालिका प्रशासनाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले. या वेळी नगरसेवक जगदीश भरतिया, शेख महेमूद यांची उपस्थिती होती.जालन्याची भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता अंबडला पाणी देण्याचा कुठलाही करार जालना पालिका करणार नाही. अंबडला केवळ व्यावसायिक दराने पाणी दिले जाईल, असे गोरंट्याल यांनी स्पष्ट केले. शहागड-जालना अंबड योजेतून अंबडने कुठलाही खर्च न देता अनेक वर्ष फुकट पाणी घेतल्याचा आरोप त्यांनी केला.