शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

विमा कंपनीविरोधात तक्रारींचा महापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 01:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पीकविम्याचा हप्ता भरूनही त्यांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याचे वास्तव आहे. यासाठी जिल्हाधिका-यांनी कार्यालयात सुरू केलेल्या स्वतंत्र कक्षात तक्रारी देण्यासह कागदपत्रांची पूर्तता करून घेतली जात आहे. या तक्रारी नोंदविण्यासाठीची अंतिम तारीख २० जुलै असल्याने बुधवारी शेतक-यांनी मोठी गर्दी केली होती.दोन वर्षापूर्वी जालना जिल्ह्याने विक्रमी ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पीकविम्याचा हप्ता भरूनही त्यांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याचे वास्तव आहे. यासाठी जिल्हाधिका-यांनी कार्यालयात सुरू केलेल्या स्वतंत्र कक्षात तक्रारी देण्यासह कागदपत्रांची पूर्तता करून घेतली जात आहे. या तक्रारी नोंदविण्यासाठीची अंतिम तारीख २० जुलै असल्याने बुधवारी शेतक-यांनी मोठी गर्दी केली होती.दोन वर्षापूर्वी जालना जिल्ह्याने विक्रमी पीकविमा भरल्या प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दिल्लीत सत्कार झाला होता. त्यासाठी कृषी अधीक्षक दशरथ तांभाळे यांच्यासह मध्यवर्ती बँकेच्या व्यवस्थापनाने देखील मोलाची भूमिका बजावली होती. गेल्या वर्षी मात्र पीकविमा भरताना अनेक तांत्रिक चुका राहिल्याने शेतक-यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. ही अडचण दूर करण्यासाठी ओरिएंटल विमा कंपनी तसेच अन्य एक विमा कंपनीच्या प्रतिनिधींना थेट जिल्हाधिकारी कार्यालयात बसवून शेतक-यांच्या तक्रारी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हाभरातून शेतक-यांनी गर्दी केली होती.कंपनीने तातडीने दोष दूर करून मदत द्यावीपीकविमा भरण्याच्या पध्दतीत अमुलाग्र बदल करण्याची गरज आहे. अनेकवेळा कागदपत्रांची पूर्तता करूनही विमा कंपनी तसेच बँकांच्या दुर्लक्षामुळे शेतकरी पीकविमा भरण्यापासून वंचित राहत आहे. याकडे पुढील वर्षी विमा भरण्याच्या पध्दतीत सुधारणा करून सर्व व्यवहार हे मराठीतून केल्यास शेतक-यांना नेमके काय सुरू आहे, याची कल्पना येणार आहे. अनेकवेळा आॅनलाइन विमा भरताना सर्व्हर डाऊन होण्यामुळे देखील तांत्रिक दोष निर्माण झाले आहेत.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी