शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

विमा कंपनीविरोधात तक्रारींचा महापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 01:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पीकविम्याचा हप्ता भरूनही त्यांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याचे वास्तव आहे. यासाठी जिल्हाधिका-यांनी कार्यालयात सुरू केलेल्या स्वतंत्र कक्षात तक्रारी देण्यासह कागदपत्रांची पूर्तता करून घेतली जात आहे. या तक्रारी नोंदविण्यासाठीची अंतिम तारीख २० जुलै असल्याने बुधवारी शेतक-यांनी मोठी गर्दी केली होती.दोन वर्षापूर्वी जालना जिल्ह्याने विक्रमी ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पीकविम्याचा हप्ता भरूनही त्यांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याचे वास्तव आहे. यासाठी जिल्हाधिका-यांनी कार्यालयात सुरू केलेल्या स्वतंत्र कक्षात तक्रारी देण्यासह कागदपत्रांची पूर्तता करून घेतली जात आहे. या तक्रारी नोंदविण्यासाठीची अंतिम तारीख २० जुलै असल्याने बुधवारी शेतक-यांनी मोठी गर्दी केली होती.दोन वर्षापूर्वी जालना जिल्ह्याने विक्रमी पीकविमा भरल्या प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दिल्लीत सत्कार झाला होता. त्यासाठी कृषी अधीक्षक दशरथ तांभाळे यांच्यासह मध्यवर्ती बँकेच्या व्यवस्थापनाने देखील मोलाची भूमिका बजावली होती. गेल्या वर्षी मात्र पीकविमा भरताना अनेक तांत्रिक चुका राहिल्याने शेतक-यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. ही अडचण दूर करण्यासाठी ओरिएंटल विमा कंपनी तसेच अन्य एक विमा कंपनीच्या प्रतिनिधींना थेट जिल्हाधिकारी कार्यालयात बसवून शेतक-यांच्या तक्रारी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हाभरातून शेतक-यांनी गर्दी केली होती.कंपनीने तातडीने दोष दूर करून मदत द्यावीपीकविमा भरण्याच्या पध्दतीत अमुलाग्र बदल करण्याची गरज आहे. अनेकवेळा कागदपत्रांची पूर्तता करूनही विमा कंपनी तसेच बँकांच्या दुर्लक्षामुळे शेतकरी पीकविमा भरण्यापासून वंचित राहत आहे. याकडे पुढील वर्षी विमा भरण्याच्या पध्दतीत सुधारणा करून सर्व व्यवहार हे मराठीतून केल्यास शेतक-यांना नेमके काय सुरू आहे, याची कल्पना येणार आहे. अनेकवेळा आॅनलाइन विमा भरताना सर्व्हर डाऊन होण्यामुळे देखील तांत्रिक दोष निर्माण झाले आहेत.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी