शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

स्वच्छता अभियानावर समितीची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 00:17 IST

शहर कचरामुक्त करण्यासाठी वॉर्डनिहाय कमिटी स्थापन करुन अभियान यशस्वी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

राजेश भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकसहभागाशिवाय कुठलीही योजना वा उपक्रम यशस्वी होत नसल्याचा पूर्वानुभव पाहता स्वच्छ भारत आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियानात जालना शहराचा ठसा उमटविण्यासाठी लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने कंबर कसली आहे. शहर कचरामुक्त करण्यासाठी वॉर्डनिहाय कमिटी स्थापन करुन अभियान यशस्वी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. वॉर्डांतील कमिटीच स्वच्छतेवर लक्ष ठेवणार असून, स्वच्छता अ‍ॅपवर तक्रारींसाठी नागरिकांना आवाहन केले जाणार आहे.शहरात मागील निवडणुकीवेळी वॉर्ड पुनर्रचना करण्यात आली असून, आता लोकसंख्येनुसार ६१ वॉर्ड निर्माण करण्यात आले आहेत. गतवर्षीची निवडणूक प्रभागनिहाय घेण्यात आली असली तरी स्वच्छतेची कामे, ही वॉर्डनिहाय केली जाणार आहेत.स्वच्छ महाराष्ट्र स्वच्छ अभियान राबविले जात आहे. यासाठी केंद्राकडून कोट्यवधींचा निधी स्थानिक स्वराज्य संस्थांना दिला जात आहे. या निधीतून कंत्राटी पद्धतीने अधिकारी, कर्मचाºयांची भरती आणि स्वच्छतेचे साहित्य व सामुग्री खरेदी केली जात आहे.केंद्र शासनाने स्वच्छतेच्या आॅनलाईन तक्रारीसाठी अ‍ॅपही विकसित केले आहे. याद्वारे नागरिकांना आपल्या भागातील स्वच्छतेबाबत तक्रारी नोंदविण्याची सुविधा आहे. जालना पालिकेने एक पाऊल पुढे टाकत स्वच्छता अभियानात नागरिकांना सहभागी करुन अभियान यशस्वी करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरु केले आहेत. शहरातील ६१ वॉर्डांत स्वतंत्र कमिट्या तयार करण्यात येणार असून, याची जबाबदारी त्या त्या वॉर्डातील नगरसेवकावर सोपवली जाणार आहे. वॉर्डाची भौगोलिक व इत्थंभूत माहिती नगरसेवकास असल्याने स्वच्छतेची कामे त्यानुसार केली जाणार आहेत. वॉर्डात किती हॉटेल्स, दुकाने, हॉस्पिटल्स, शाळा व वसाहती आहेत, याची माहिती नगरसेवकांना असते. त्यामुळे स्वच्छतेचे काम योग्य रीतीने होऊ शकणार आहे. सर्वपक्षीय नगरसेवक आणि प्रशासनातील अधिकारी एकत्र आले तर स्वच्छता अभियान यशस्वी होऊन शहराचा लौकिक सर्वदूर पोहोचणार आहे.