शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारे महाविद्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 00:51 IST

जालना शहर व जिल्ह्यातील पहिले महाविद्यालय म्हणून ओळख असलेल्या जेईएस महाविद्यालय हीरक महोत्सवी वर्ष साजरे करत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहर व जिल्ह्यातील पहिले महाविद्यालय म्हणून ओळख असलेल्या जेईएस महाविद्यालय हीरक महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. या निमित्त गेल्या ६० वर्षात या महाविद्यालयाने दिलेल्या योगदानाबद्दल एका हीरक महोत्सवी विशेषकांचे प्रकाशन करणार आहे. यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू येवले यांची प्रमुख उपस्थितीत राहणार आहे. हा समारंभ मंगळवारी सायंकाळी होणार आहे.जेईएस महाविद्यालयाची मुहूर्तमेढ ही देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या प्रेरणेतून रोवली गेली. यासाठी स्वत: पंडित नेहरू जालन्यात आले होते. त्यावेळी त्यांचा सत्कार करताना त्यावेळच्या व्यापाऱ्यांनी २५ हजार रूपयांची थैली त्यांना भेट दिली. ते पैसे लगेचच त्यांनी व्यापाऱ्यांना परत करून यातून जालन्यात महाविद्यालय उभारण्याची विनंती केली आणि हे महाविद्यालय सुरू झाले. या महाविद्यालयाचे संस्थापक म्हणून आर.जी. बगडिया, एस.बी. लखोटिया आणि आर. बेझंजी हे होते. त्यांनी रोवलेल्या शैक्षणिक रोपट्याचे आज ६० वर्षात एक वटवृक्ष झाला आहे. प्रारंभी कला आणि वाणिज्य शाखा असलेल्या महाविद्यालयात नंतर विज्ञान शाखाही सुरू करण्यात आली. इलेक्ट्रॉनिक लॅब असलेले त्या काळातील हे एकमेव महाविद्यालय होते. मराठवाड्यातील हे पाचव्या क्रमांकाचे महाविद्यालय असल्याची माहिती प्राचार्य डॉ. जवाहर काबरा यांनी दिली.काळानुरूप बदल करून या महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने आपले महत्त्व आणि गुणवत्ता कायम राखली आहे.गेल्या साठ वर्षाचा विचार करता या महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने दाखविलेले पुरोगामी आणि लोकशाहीला धरून ठेवणारे निर्णय घेऊन तज्ज्ञ प्राचार्य तसेच प्राध्यापकांची फौजच या महाविद्यालयास लाभली आहे. त्यांच्या या विद्यादानातून या महाविद्यालयाने आज केवळ राज्यालाच नव्हे तर देशालाही अनेक दिग्गज आणि हुशार विद्यार्थी दिले आहेत. त्यांच्यामुळे जालन्याच्या या महाविद्यालयाची ख्याती ही देशभर पसरलेली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. या महाविद्यालयास लाभलेले पाहिले प्राचार्य पी.एम. सप्रे, के.डी. गादिया, सी.के. लखोटिया, गो.रा. सिकची, डॉ. आर.जी. अग्रवाल, डॉ. आर.एस.अग्रवाल यांनी त्यांच्या कार्यकाळात विविध स्तुत्य उपक्रम राबवून महाविद्यालयाचे नाव उंचावले आहे. एकूणच या महाविद्यालयातून शिक्षण घेलेले विद्यार्थी हे केवळ नोकरीतच नाहीत, तर मोठे उद्योजक झाले असून, अनेकजण राजकारणातही सक्रिय आहे. त्यातील प्रमुख नावे म्हणजे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आ. कैलास गोरंट्याल, माजी मंत्री अर्जुन खोतकर, माजी आ. अरविंद चव्हाण, माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर यांच्यासह अनेकांची नावे घेतली तर ती यादी खूप मोठी होईल.

टॅग्स :collegeमहाविद्यालयEducation Sectorशिक्षण क्षेत्र