शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
3
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
4
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
5
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
6
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
7
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
8
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
9
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
10
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
11
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
12
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
13
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
14
छत्रपतींच्या किल्ल्यांकडे पाहण्याची नजर आता बदलेल?
15
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
16
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
17
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
18
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
19
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
20
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर

ढगाळ वातावरणामुळे रब्बीतील पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:23 IST

आन्वा : भोकरदन तालुक्यातील आन्वा व वाकडी परिसरात सतत ढगाळ वातावरण तयार होत आहे. ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील हरभऱ्यासह ...

आन्वा : भोकरदन तालुक्यातील आन्वा व वाकडी परिसरात सतत ढगाळ वातावरण तयार होत आहे. ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील हरभऱ्यासह इतर पिकांवर अळ्यांसह रोगराईचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

गतवर्षी जोरदार पाऊस झाल्याने खरिपातील पिके वाया गेली. अनेकांना या नुकसानाचे अनुदान अद्यापही मिळालेले नाही. पीककर्जही वेळेत न मिळाल्याने शेतकऱ्यांनी उसनवारी, सावकाराकडील कर्ज घेऊन रब्बी हंगामातील पिकांचा पेरा केला. शेतकऱ्यांना यंदा या हंगामातून चांगले उत्पन्न मिळेल, अशी आशा होती. मात्र, सततच्या ढगाळ वातावरणामुळे गहू, हरभरा आदी पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव झाला आहे. खराब हवामानामुळे खरिपापाठोपाठ रब्बी हंगामही वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. त्यात अवकाळी पाऊस किंवा गारपीट झाली तर अतोनात नुकसान होण्याची भीतीही वर्तविली जात आहे. कीडरोग नियंत्रणात आणण्यासाठी शेतकरी महागड्या औषधांची फवारणी करत आहेत. कृषी विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.

सध्या विहिरींमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. आम्ही नियोजन करून हरभऱ्याचा पेरा केला आहे. परंतु, ढगाळ वातावरणामुळे २५ एकरावरील हरभरा वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. हरभऱ्यावर अळीचा प्रादुर्भाव वाढत असून, कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरज असल्याचे देवराव पांडव, उपसरपंच अमरजीत देशमुख यांनी सांगितले.