शहरं
Join us  
Trending Stories
1
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
2
२ दिवसापूर्वी कर्तव्यावर पोहचला जवान, आज पत्नीचं निधन; अवघ्या १५ दिवसाची लेक एकटी पडली
3
गुन्हेगार आणि पीडितला सारखेच दाखवण्याचा प्रयत्न..; ट्रम्प यांच्या भूमिकेवर शशी थरुर संतापले
4
धक्कादायक! विषारी दारू प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू, ६ जणांची प्रकृती चिंताजनक
5
ट्रम्प यांनी भारतावर लावला २५% टॅरिफ, आता प्रत्युत्तरात्मक शुल्काच्या तयारीत देश; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले
6
उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे
7
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
8
₹३३,९२,९१,६०,००० चं गिफ्ट; डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणारे सर्वात महागडं गिफ्ट; कोण करतंय इतका खर्च?
9
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
10
'मी पोलीस आहे, तुला सोडणार नाही'; कोल्हापुरात एसटी चालकाला मारहाण
11
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
12
'ही' प्रसिद्ध ऑटोकार कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार; काय आहे कारण?
13
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
14
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
15
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
16
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
17
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
18
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
19
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
20
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा

ढगाळ वातावरणामुळे रब्बीतील पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:23 IST

आन्वा : भोकरदन तालुक्यातील आन्वा व वाकडी परिसरात सतत ढगाळ वातावरण तयार होत आहे. ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील हरभऱ्यासह ...

आन्वा : भोकरदन तालुक्यातील आन्वा व वाकडी परिसरात सतत ढगाळ वातावरण तयार होत आहे. ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील हरभऱ्यासह इतर पिकांवर अळ्यांसह रोगराईचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

गतवर्षी जोरदार पाऊस झाल्याने खरिपातील पिके वाया गेली. अनेकांना या नुकसानाचे अनुदान अद्यापही मिळालेले नाही. पीककर्जही वेळेत न मिळाल्याने शेतकऱ्यांनी उसनवारी, सावकाराकडील कर्ज घेऊन रब्बी हंगामातील पिकांचा पेरा केला. शेतकऱ्यांना यंदा या हंगामातून चांगले उत्पन्न मिळेल, अशी आशा होती. मात्र, सततच्या ढगाळ वातावरणामुळे गहू, हरभरा आदी पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव झाला आहे. खराब हवामानामुळे खरिपापाठोपाठ रब्बी हंगामही वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. त्यात अवकाळी पाऊस किंवा गारपीट झाली तर अतोनात नुकसान होण्याची भीतीही वर्तविली जात आहे. कीडरोग नियंत्रणात आणण्यासाठी शेतकरी महागड्या औषधांची फवारणी करत आहेत. कृषी विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.

सध्या विहिरींमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. आम्ही नियोजन करून हरभऱ्याचा पेरा केला आहे. परंतु, ढगाळ वातावरणामुळे २५ एकरावरील हरभरा वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. हरभऱ्यावर अळीचा प्रादुर्भाव वाढत असून, कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरज असल्याचे देवराव पांडव, उपसरपंच अमरजीत देशमुख यांनी सांगितले.