शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

ढगाळ वातावरणामुळे रब्बीतील पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:25 IST

राजूर : भोकरदन तालुक्यातील राजूरसह परिसरात गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ वातावरणासह धुके दाटून येत आहे. त्यामुळे या भागातील रब्बी ...

राजूर : भोकरदन तालुक्यातील राजूरसह परिसरात गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ वातावरणासह धुके दाटून येत आहे. त्यामुळे या भागातील रब्बी हंगामातील फुलोऱ्यात असलेल्या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होत असून, पिकांना मोठा फटका बसत आहे. खरिपापाठोपाठ रब्बी हंगामही वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

यावर्षी पावसाळ्यात सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांची वाट लागली. कपाशी, मका, सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागले. मुबलक जलसाठा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात गहू, ज्वारी, हरभरा पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात केली. राजूर परिसरात यावर्षी रब्बीच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ झालेली आहे. सध्या रब्बी हंगामातील पिके तजेलदार असताना अचानक गेल्या आठ दिवसांपासून ढग दाटून येत असून, धुके पडत असल्याने फुलोऱ्यातील पिकांना मोठा फटका बसत आहे. सध्या गव्हाला थंडीची गरज असताना धुके पडत आहेत. त्यामुळे पिके वाया जाण्याची भीती बळावली आहे. तसेच दूषित वातावरणामुळे हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढला असून, आंब्याचा मोहोर गळून पडत आहे. यावर्षी आंब्याला मोठ्या प्रमाणात मोहोर आला आहे. परंतु, तो गळून पडत असल्याने आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. परिसरात गेल्या दोन वर्षांपासून फळबाग लागवड क्षेत्रात मोठी वाढ झालेली आहे. धुक्यामुळे द्राक्ष बागाही धोक्यात असून, धुक्यामुळे फुलोऱ्यात असलेली ज्वारी काळी पडत आहे. रब्बीची पिके ऐन भरात असताना दूषित वातावरणामुळे ती वाया जात असल्याने शेतकऱ्यांचे अवसान गळाले आहे.