शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

जालना शहर होणार हिरवेगार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:24 IST

केंद्र शासनाच्या अटल अमृत योजनेंतर्गत शहरांतील हरित पट्टे विकसित केले जाणार आहेत.

राजेश भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : केंद्र शासनाच्या अटल अमृत योजनेंतर्गत शहरांतील हरित पट्टे विकसित केले जाणार आहेत. यामुळे शहर सुशोभित व हिरवेगार होण्याची अपेक्षा आहे. या योजनेंतर्गत पालिकेला ३ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. याची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली असून, याच्या अंतिम मंजुरीसाठी स्थायी समितीच्या बैठकीत ठेवला जाणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.शहरी भागांतील पर्यावरण पूरक बाबी करण्यासह हरित पट्टे विकसित करण्याच्या उद्देशाने योजना आखली आहे. या योजनेंतर्गत वनीकरण वाढविण्याचे उद्दिष्ट देण्यात येणार आहे. तसेच लागवड केलेल्या वृक्षांचे संगोपन आणि संवर्धन होतेय की नाही, याची तपासणीही केंद्राचे पथक करणार आहे. शहरात प्रदूषणाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. तसेच वनीकरण नसल्यातच जमा आहे. याचा प्रत्यक्ष परिणाम शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. वाढते धूलिकण आणि पर्यावरणातील इतर प्रदूषण कमी व्हावे, यासाठी अटल अमृत योजनेंतर्गत जालना पालिकेचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार काही दिवसांपूर्वी पालिकेला तीन कोटी रुपयांचा निधीही प्राप्त झाला आहे. याची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी स्थायी समितीच्या बैठकीतच यावर शिक्कामोर्तब होणार आहे. या योजनेंतर्गत पालिका प्रशासनाला शहरातील विविध भागांत वृक्ष लागवड करण्यासह नागरिकांना वनीकरण वाढविण्यासाठी प्रोत्साहन द्यावे लागणार आहे. इतर योजनांप्रमाणे ही योजनाही केवळ कागदावर राहू नये, यासाठी नागरिकांची समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. याचे कंत्राट ज्या संस्थेला वा एजन्सीला दिले जाणार आहे. त्याची योग्यता व पूर्वानुभव याचाही प्राधान्याने विचार केला जावा, असे मत पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.गत काही महिन्यांत जालना पालिकेला कोट्यवधी रुपयांचा निधी राज्य आणि केंद्र शासनाकडून मिळालेला आहे. याचा विनियोग योग्य पद्धतीने होतोय की नाही, याचीही तपासणी उच्चपदस्थ अधिका-यांकडून केली जाणार आहे.