शहरं
Join us  
Trending Stories
1
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
2
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
3
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
4
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
5
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
6
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
7
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
8
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
9
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
10
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
11
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
12
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
13
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
14
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
15
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
16
भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला
17
अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं
18
'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका, सांगितला धक्कादायक अनुभव
19
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
20
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?

जालना शहर होणार हिरवेगार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:24 IST

केंद्र शासनाच्या अटल अमृत योजनेंतर्गत शहरांतील हरित पट्टे विकसित केले जाणार आहेत.

राजेश भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : केंद्र शासनाच्या अटल अमृत योजनेंतर्गत शहरांतील हरित पट्टे विकसित केले जाणार आहेत. यामुळे शहर सुशोभित व हिरवेगार होण्याची अपेक्षा आहे. या योजनेंतर्गत पालिकेला ३ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. याची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली असून, याच्या अंतिम मंजुरीसाठी स्थायी समितीच्या बैठकीत ठेवला जाणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.शहरी भागांतील पर्यावरण पूरक बाबी करण्यासह हरित पट्टे विकसित करण्याच्या उद्देशाने योजना आखली आहे. या योजनेंतर्गत वनीकरण वाढविण्याचे उद्दिष्ट देण्यात येणार आहे. तसेच लागवड केलेल्या वृक्षांचे संगोपन आणि संवर्धन होतेय की नाही, याची तपासणीही केंद्राचे पथक करणार आहे. शहरात प्रदूषणाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. तसेच वनीकरण नसल्यातच जमा आहे. याचा प्रत्यक्ष परिणाम शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. वाढते धूलिकण आणि पर्यावरणातील इतर प्रदूषण कमी व्हावे, यासाठी अटल अमृत योजनेंतर्गत जालना पालिकेचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार काही दिवसांपूर्वी पालिकेला तीन कोटी रुपयांचा निधीही प्राप्त झाला आहे. याची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी स्थायी समितीच्या बैठकीतच यावर शिक्कामोर्तब होणार आहे. या योजनेंतर्गत पालिका प्रशासनाला शहरातील विविध भागांत वृक्ष लागवड करण्यासह नागरिकांना वनीकरण वाढविण्यासाठी प्रोत्साहन द्यावे लागणार आहे. इतर योजनांप्रमाणे ही योजनाही केवळ कागदावर राहू नये, यासाठी नागरिकांची समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. याचे कंत्राट ज्या संस्थेला वा एजन्सीला दिले जाणार आहे. त्याची योग्यता व पूर्वानुभव याचाही प्राधान्याने विचार केला जावा, असे मत पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.गत काही महिन्यांत जालना पालिकेला कोट्यवधी रुपयांचा निधी राज्य आणि केंद्र शासनाकडून मिळालेला आहे. याचा विनियोग योग्य पद्धतीने होतोय की नाही, याचीही तपासणी उच्चपदस्थ अधिका-यांकडून केली जाणार आहे.