शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

जालना शहर होणार हिरवेगार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:24 IST

केंद्र शासनाच्या अटल अमृत योजनेंतर्गत शहरांतील हरित पट्टे विकसित केले जाणार आहेत.

राजेश भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : केंद्र शासनाच्या अटल अमृत योजनेंतर्गत शहरांतील हरित पट्टे विकसित केले जाणार आहेत. यामुळे शहर सुशोभित व हिरवेगार होण्याची अपेक्षा आहे. या योजनेंतर्गत पालिकेला ३ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. याची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली असून, याच्या अंतिम मंजुरीसाठी स्थायी समितीच्या बैठकीत ठेवला जाणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.शहरी भागांतील पर्यावरण पूरक बाबी करण्यासह हरित पट्टे विकसित करण्याच्या उद्देशाने योजना आखली आहे. या योजनेंतर्गत वनीकरण वाढविण्याचे उद्दिष्ट देण्यात येणार आहे. तसेच लागवड केलेल्या वृक्षांचे संगोपन आणि संवर्धन होतेय की नाही, याची तपासणीही केंद्राचे पथक करणार आहे. शहरात प्रदूषणाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. तसेच वनीकरण नसल्यातच जमा आहे. याचा प्रत्यक्ष परिणाम शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. वाढते धूलिकण आणि पर्यावरणातील इतर प्रदूषण कमी व्हावे, यासाठी अटल अमृत योजनेंतर्गत जालना पालिकेचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार काही दिवसांपूर्वी पालिकेला तीन कोटी रुपयांचा निधीही प्राप्त झाला आहे. याची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी स्थायी समितीच्या बैठकीतच यावर शिक्कामोर्तब होणार आहे. या योजनेंतर्गत पालिका प्रशासनाला शहरातील विविध भागांत वृक्ष लागवड करण्यासह नागरिकांना वनीकरण वाढविण्यासाठी प्रोत्साहन द्यावे लागणार आहे. इतर योजनांप्रमाणे ही योजनाही केवळ कागदावर राहू नये, यासाठी नागरिकांची समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. याचे कंत्राट ज्या संस्थेला वा एजन्सीला दिले जाणार आहे. त्याची योग्यता व पूर्वानुभव याचाही प्राधान्याने विचार केला जावा, असे मत पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.गत काही महिन्यांत जालना पालिकेला कोट्यवधी रुपयांचा निधी राज्य आणि केंद्र शासनाकडून मिळालेला आहे. याचा विनियोग योग्य पद्धतीने होतोय की नाही, याचीही तपासणी उच्चपदस्थ अधिका-यांकडून केली जाणार आहे.