शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

जालना शहर होणार हिरवेगार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:24 IST

केंद्र शासनाच्या अटल अमृत योजनेंतर्गत शहरांतील हरित पट्टे विकसित केले जाणार आहेत.

राजेश भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : केंद्र शासनाच्या अटल अमृत योजनेंतर्गत शहरांतील हरित पट्टे विकसित केले जाणार आहेत. यामुळे शहर सुशोभित व हिरवेगार होण्याची अपेक्षा आहे. या योजनेंतर्गत पालिकेला ३ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. याची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली असून, याच्या अंतिम मंजुरीसाठी स्थायी समितीच्या बैठकीत ठेवला जाणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.शहरी भागांतील पर्यावरण पूरक बाबी करण्यासह हरित पट्टे विकसित करण्याच्या उद्देशाने योजना आखली आहे. या योजनेंतर्गत वनीकरण वाढविण्याचे उद्दिष्ट देण्यात येणार आहे. तसेच लागवड केलेल्या वृक्षांचे संगोपन आणि संवर्धन होतेय की नाही, याची तपासणीही केंद्राचे पथक करणार आहे. शहरात प्रदूषणाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. तसेच वनीकरण नसल्यातच जमा आहे. याचा प्रत्यक्ष परिणाम शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. वाढते धूलिकण आणि पर्यावरणातील इतर प्रदूषण कमी व्हावे, यासाठी अटल अमृत योजनेंतर्गत जालना पालिकेचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार काही दिवसांपूर्वी पालिकेला तीन कोटी रुपयांचा निधीही प्राप्त झाला आहे. याची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी स्थायी समितीच्या बैठकीतच यावर शिक्कामोर्तब होणार आहे. या योजनेंतर्गत पालिका प्रशासनाला शहरातील विविध भागांत वृक्ष लागवड करण्यासह नागरिकांना वनीकरण वाढविण्यासाठी प्रोत्साहन द्यावे लागणार आहे. इतर योजनांप्रमाणे ही योजनाही केवळ कागदावर राहू नये, यासाठी नागरिकांची समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. याचे कंत्राट ज्या संस्थेला वा एजन्सीला दिले जाणार आहे. त्याची योग्यता व पूर्वानुभव याचाही प्राधान्याने विचार केला जावा, असे मत पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.गत काही महिन्यांत जालना पालिकेला कोट्यवधी रुपयांचा निधी राज्य आणि केंद्र शासनाकडून मिळालेला आहे. याचा विनियोग योग्य पद्धतीने होतोय की नाही, याचीही तपासणी उच्चपदस्थ अधिका-यांकडून केली जाणार आहे.