शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

‘जय महावीर’च्या जयघोषाने दुमदुमले जालना शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 01:00 IST

जैन धर्मातील चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीचे औचित्य साधून बुधवारी जालना शहरात भगवान महावीर जन्मकल्याणकाचे भव्य आयोजन करण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जैन धर्मातील चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीचे औचित्य साधून बुधवारी जालना शहरात भगवान महावीर जन्मकल्याणकाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. प. पू. दिलीपकंवरजी म. सा; प. पू. सौम्यप्रज्ञाश्रीजी म. सा. यांच्या सान्निध्यात सकल जैन समाजाच्या वतीने मोठी शोभा यात्रा काढण्यात आली.भगवान महावीरांच्या जयंतीचे औचित्य साधून सकाळी महावीर चौक येथे सकल जैन संघाच्यावतीने ध्वजारोहण करण्यात आल्यानंतर शोभा यात्रेस प्रारंभ झाला.सकल जैन समाज एकत्र आल्याने प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात शोभा काढण्यात आली. अत्यंत उत्साही आणि चैतन्यमय वातावरणात निघालेली ही शोभा यात्रा शहरातील विविध मार्गाने जाऊन यांची सांगता शिवाजी पुतळ्याशेजारी असलेल्या गुरु गणेशनगर मध्ये झाली. बॅण्ड पथक हे या शोभा यात्रेचे खास आकर्षण होते. समाज बांधवांच्या वतीने शोभायात्रा मार्गावर ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती तर सकल जैन समाजाच्या वतीने जालना शहरवासियांसाठी प्रसाद म्हणून बुंदीचे लाडू वाटप करण्यात आले.शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी संजय लव्हाडे, डॉ. गौतमचंद रुणवाल, संजय मुथा, सुदेश सकलेचा, विजयराज सुराणा, विजयकुमार सकलेचा, धर्मेंद्र धोका, वीरेंद्र धोका, श्री ललवाणी, विनयकुमार आबड, उत्तमचंद बनवट, अशोक बिनायकिया, सुरेशचंद मुथा, मनोज मोदी, प्रमोद देसरडा, गौतमचंद मुनोत, विजय जैन, प्रेमचंद कासलीवाल, प्रवीण पहाडे, शिखर लोहाडे, रजत चोविश्या, विनोद पाटणी, संतोष बडजाते, जैनराज सेठीया, पवन सेठिया, माणिकचंद कासलीवाल, सुरेश मरलेचा, महावीर रुणवाल, सोमेश ठोले, योगेश पाटणी, अनिल छाबडा, सुधीर पहाडे, विजय सावजी, कन्हैया पाटणी, हसमुख शाह, प्रदीप सियाल, प्रकाश सुराणा, दीपक मिश्रीकोटकर, अनुप डोणगावकर, प्रकाश नेवे, सुरेश अग्रवाल, विजय सावजी, निलेश लव्हाडे यांनी परिश्रम घेतले.जिल्हा न्यायालयात महावीर जयंतीजालना : व्यक्ती आणि परिस्थिती बदलता येत नाही. मात्र आपण स्वत: निश्चितच बदलू शकतो आणि हा बदल घडवण्यासाठी प्रयत्न केलाच पाहिजे. व्यवहार आणि अध्यात्म या दोन वेगवेगळ्या बाबी असल्या तरी त्यांची सांगड घालता आली पाहिजे, असे प्रतिपादन प्रथम सत्र न्यायाधीश श्रीपाद टेकाळे यांनी येथे बोलतांना केले.जैन समाजाचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीचे औचित्य साधून बुधवारी जालना जिल्हा वकील संघाच्यावतीने प्रथमच जिल्हा न्यायालयात भगवान महावीरांची जयंती उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना न्या. टेकाळे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर न्यायाधीश वेदपाठक, मिश्रा, पोतदार, कोन्होळे, जिल्हा सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. विपुल देशपांडे, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. लक्ष्मण उढाण, अ‍ॅड. दिनेश भोजने, अ‍ॅड. भुषण तवरावाला, अ‍ॅड. अनुज लकडे, अ‍ॅड. सोपान शेजूळ, जैन श्रावक संघाचे माजी अध्यक्ष सुदेश सकेलचा, इंद्रकुमार गादीया आदींची उपस्थिती होती....तरच महावीर जयंती साजरी केल्याचं सार्थक-अरुणप्रभाजी म.सा.जालना : भगवान महावीरांच्या जयंतीचे औचित्य साधून जालनेकरांनी मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला असला तरी, नुसत्या घोषणा देऊन काहीही होत नसते. भगवान महावीरांनी सांगितलेले तत्त्व जोपर्यंत तुम्ही अंगिकारत नाही, तुमच्या मनात उतरवत नाहीत, तोपर्यंत महावीरांची जयंती साजरी करण्याला कोणताही अर्थ प्राप्त होत नाही. भगवान महावीरांचे तत्व अंगिकारले तरच महावीर जयंती साजरी केल्याचं सार्थक होईल, असा हितोपदेश प. पू. अरुणप्रभाजी म. सा. यांनी येथे बोलताना दिला.जैन समाजाचे चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी येथील तपोधाममधील गुरुगणेश भगवानमध्ये आयोजित विशेष प्रवचनात प. पू. अरुणप्रभाजी म. सा. बोलत होत्या. यावेळी विचारपीठावर प. पू. दिलीपकुंवरजी म. सा; प. पू. सौम्यप्रभाजी म. सा. प. पू. गुलाबकवंरजी म. सा. आदींची उपस्थिती होती. प्रारंभी गुलाबकंवरजी म. सा. यांनी भगवान महावीरांच्या चरित्राबद्दल थोडक्यात माहिती दिली. पुढे बोलताना प. पू. अरुणप्रभाजी म्हणाल्या की, खरे तर आम्ही खरोखरच भाग्यशाली आहोत की आम्हाला अहिंसेचा आणि जियो और जिने दो असा संदेश देणाऱ्या भगवान महावीरांची जयंती साजरी करण्याची संधी मिळाली आहे. परंतु भगवान महावीरांबद्दल आपल्याला किती आस्था आहे?

टॅग्स :Mahavir Jayantiमहावीर जयंतीcommunityसमाजReligious programmeधार्मिक कार्यक्रम