शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

‘जय महावीर’च्या जयघोषाने दुमदुमले जालना शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 01:00 IST

जैन धर्मातील चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीचे औचित्य साधून बुधवारी जालना शहरात भगवान महावीर जन्मकल्याणकाचे भव्य आयोजन करण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जैन धर्मातील चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीचे औचित्य साधून बुधवारी जालना शहरात भगवान महावीर जन्मकल्याणकाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. प. पू. दिलीपकंवरजी म. सा; प. पू. सौम्यप्रज्ञाश्रीजी म. सा. यांच्या सान्निध्यात सकल जैन समाजाच्या वतीने मोठी शोभा यात्रा काढण्यात आली.भगवान महावीरांच्या जयंतीचे औचित्य साधून सकाळी महावीर चौक येथे सकल जैन संघाच्यावतीने ध्वजारोहण करण्यात आल्यानंतर शोभा यात्रेस प्रारंभ झाला.सकल जैन समाज एकत्र आल्याने प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात शोभा काढण्यात आली. अत्यंत उत्साही आणि चैतन्यमय वातावरणात निघालेली ही शोभा यात्रा शहरातील विविध मार्गाने जाऊन यांची सांगता शिवाजी पुतळ्याशेजारी असलेल्या गुरु गणेशनगर मध्ये झाली. बॅण्ड पथक हे या शोभा यात्रेचे खास आकर्षण होते. समाज बांधवांच्या वतीने शोभायात्रा मार्गावर ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती तर सकल जैन समाजाच्या वतीने जालना शहरवासियांसाठी प्रसाद म्हणून बुंदीचे लाडू वाटप करण्यात आले.शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी संजय लव्हाडे, डॉ. गौतमचंद रुणवाल, संजय मुथा, सुदेश सकलेचा, विजयराज सुराणा, विजयकुमार सकलेचा, धर्मेंद्र धोका, वीरेंद्र धोका, श्री ललवाणी, विनयकुमार आबड, उत्तमचंद बनवट, अशोक बिनायकिया, सुरेशचंद मुथा, मनोज मोदी, प्रमोद देसरडा, गौतमचंद मुनोत, विजय जैन, प्रेमचंद कासलीवाल, प्रवीण पहाडे, शिखर लोहाडे, रजत चोविश्या, विनोद पाटणी, संतोष बडजाते, जैनराज सेठीया, पवन सेठिया, माणिकचंद कासलीवाल, सुरेश मरलेचा, महावीर रुणवाल, सोमेश ठोले, योगेश पाटणी, अनिल छाबडा, सुधीर पहाडे, विजय सावजी, कन्हैया पाटणी, हसमुख शाह, प्रदीप सियाल, प्रकाश सुराणा, दीपक मिश्रीकोटकर, अनुप डोणगावकर, प्रकाश नेवे, सुरेश अग्रवाल, विजय सावजी, निलेश लव्हाडे यांनी परिश्रम घेतले.जिल्हा न्यायालयात महावीर जयंतीजालना : व्यक्ती आणि परिस्थिती बदलता येत नाही. मात्र आपण स्वत: निश्चितच बदलू शकतो आणि हा बदल घडवण्यासाठी प्रयत्न केलाच पाहिजे. व्यवहार आणि अध्यात्म या दोन वेगवेगळ्या बाबी असल्या तरी त्यांची सांगड घालता आली पाहिजे, असे प्रतिपादन प्रथम सत्र न्यायाधीश श्रीपाद टेकाळे यांनी येथे बोलतांना केले.जैन समाजाचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीचे औचित्य साधून बुधवारी जालना जिल्हा वकील संघाच्यावतीने प्रथमच जिल्हा न्यायालयात भगवान महावीरांची जयंती उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना न्या. टेकाळे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर न्यायाधीश वेदपाठक, मिश्रा, पोतदार, कोन्होळे, जिल्हा सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. विपुल देशपांडे, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. लक्ष्मण उढाण, अ‍ॅड. दिनेश भोजने, अ‍ॅड. भुषण तवरावाला, अ‍ॅड. अनुज लकडे, अ‍ॅड. सोपान शेजूळ, जैन श्रावक संघाचे माजी अध्यक्ष सुदेश सकेलचा, इंद्रकुमार गादीया आदींची उपस्थिती होती....तरच महावीर जयंती साजरी केल्याचं सार्थक-अरुणप्रभाजी म.सा.जालना : भगवान महावीरांच्या जयंतीचे औचित्य साधून जालनेकरांनी मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला असला तरी, नुसत्या घोषणा देऊन काहीही होत नसते. भगवान महावीरांनी सांगितलेले तत्त्व जोपर्यंत तुम्ही अंगिकारत नाही, तुमच्या मनात उतरवत नाहीत, तोपर्यंत महावीरांची जयंती साजरी करण्याला कोणताही अर्थ प्राप्त होत नाही. भगवान महावीरांचे तत्व अंगिकारले तरच महावीर जयंती साजरी केल्याचं सार्थक होईल, असा हितोपदेश प. पू. अरुणप्रभाजी म. सा. यांनी येथे बोलताना दिला.जैन समाजाचे चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी येथील तपोधाममधील गुरुगणेश भगवानमध्ये आयोजित विशेष प्रवचनात प. पू. अरुणप्रभाजी म. सा. बोलत होत्या. यावेळी विचारपीठावर प. पू. दिलीपकुंवरजी म. सा; प. पू. सौम्यप्रभाजी म. सा. प. पू. गुलाबकवंरजी म. सा. आदींची उपस्थिती होती. प्रारंभी गुलाबकंवरजी म. सा. यांनी भगवान महावीरांच्या चरित्राबद्दल थोडक्यात माहिती दिली. पुढे बोलताना प. पू. अरुणप्रभाजी म्हणाल्या की, खरे तर आम्ही खरोखरच भाग्यशाली आहोत की आम्हाला अहिंसेचा आणि जियो और जिने दो असा संदेश देणाऱ्या भगवान महावीरांची जयंती साजरी करण्याची संधी मिळाली आहे. परंतु भगवान महावीरांबद्दल आपल्याला किती आस्था आहे?

टॅग्स :Mahavir Jayantiमहावीर जयंतीcommunityसमाजReligious programmeधार्मिक कार्यक्रम