शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

मिरची बाजाराला वातावरणाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 23:21 IST

वातावरणात झालेला बदल आणि गारपिटीमुळे लाल मिरची ओलसर झाल्याचे कारण पुढे करत व्यापा-यांनी मंगळवारी दहा ते बारा हजार रूपये क्विंटल विकल्या जाणा-या लाल मिरचीची साडेसात ते आठ हजार रूपयाने खरेदी केली. त्यामुळे शेतक-यांना प्रति क्विंटल दोन हजार रूपयांचा फटका बसला.

गजानन वानखडे/जालना : वातावरणात झालेला बदल आणि गारपिटीमुळे लाल मिरची ओलसर झाल्याचे कारण पुढे करत व्यापा-यांनी मंगळवारी दहा ते बारा हजार रूपये क्विंटल विकल्या जाणा-या लाल मिरचीची साडेसात ते आठ हजार रूपयाने खरेदी केली. त्यामुळे शेतक-यांना प्रति क्विंटल दोन हजार रूपयांचा फटका बसला.निव्वळ वातावरण खराब मिरची ओलसर असल्याचे कारण पुढे करत मिरची व्यापा-यांनी मिरचीचे पाडले. परिणामी दहा ते बारा हजार रूपये प्रति क्विंटल विकल्या जाणारी मिरची साडेसात ते आठ हजार रूपये प्रति क्विंटल दराने नाईलाजाने शेतक-यांना विकाली लागल्याने मिरची उत्पादक शेतक-यांना तब्बल दोन ते अडीच हजार रूपयाचे नुकसान सहन करावे लागले. दर मंगळवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत भरणा-या मिरची बाजारात जालना जिल्ह्यासह बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात लाल मिरची विक्रीस आणतात. गत दोन वर्षापासून मिरचीवर पडलेल्या रोग आणि योग्य भाव मिळत नसल्याने मिरची उत्पादन शेतकरी हैराण झाले होते. सध्या मार्च एप्रिल २०१७ मध्ये लागवड केलेली लाल मिरची बाजारात विक्रीसाठी येत आहे. दहा ते बारा हजार रूपये प्रति क्विंटल लाला मिरचीला भाव येत असल्याने मिरची बाजारात गेल्या आठवड्यात २००० हजार पोते लाल मिरचीची चागली आवक झाली होती. मिरची सर्वांधीक ११ हजार रूपये प्रति क्विंटल भाव देण्यात आला होता. मात्र काही दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे मिरचीचा ऊन न मिळाल्याने मिरची चामट झाली आहे. मात्र मिरचीच्या दर्जा मात्र कायम आहे. असे असतांना व्यापा-यांनी चांगली मिरची कमी दराने मांगितल्याने शेतक-यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते.............................काही दिवसापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि गारपिट आणि पावसामुळे लाल मिरची ओलसर झाली आहे. मिरचीची गुणवत्ता पाहून मिरची खरेदी करण्यात येत आहे.- इस्माईल शेख, मिरची व्यापारी