शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

मिरची बाजाराला वातावरणाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 23:21 IST

वातावरणात झालेला बदल आणि गारपिटीमुळे लाल मिरची ओलसर झाल्याचे कारण पुढे करत व्यापा-यांनी मंगळवारी दहा ते बारा हजार रूपये क्विंटल विकल्या जाणा-या लाल मिरचीची साडेसात ते आठ हजार रूपयाने खरेदी केली. त्यामुळे शेतक-यांना प्रति क्विंटल दोन हजार रूपयांचा फटका बसला.

गजानन वानखडे/जालना : वातावरणात झालेला बदल आणि गारपिटीमुळे लाल मिरची ओलसर झाल्याचे कारण पुढे करत व्यापा-यांनी मंगळवारी दहा ते बारा हजार रूपये क्विंटल विकल्या जाणा-या लाल मिरचीची साडेसात ते आठ हजार रूपयाने खरेदी केली. त्यामुळे शेतक-यांना प्रति क्विंटल दोन हजार रूपयांचा फटका बसला.निव्वळ वातावरण खराब मिरची ओलसर असल्याचे कारण पुढे करत मिरची व्यापा-यांनी मिरचीचे पाडले. परिणामी दहा ते बारा हजार रूपये प्रति क्विंटल विकल्या जाणारी मिरची साडेसात ते आठ हजार रूपये प्रति क्विंटल दराने नाईलाजाने शेतक-यांना विकाली लागल्याने मिरची उत्पादक शेतक-यांना तब्बल दोन ते अडीच हजार रूपयाचे नुकसान सहन करावे लागले. दर मंगळवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत भरणा-या मिरची बाजारात जालना जिल्ह्यासह बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात लाल मिरची विक्रीस आणतात. गत दोन वर्षापासून मिरचीवर पडलेल्या रोग आणि योग्य भाव मिळत नसल्याने मिरची उत्पादन शेतकरी हैराण झाले होते. सध्या मार्च एप्रिल २०१७ मध्ये लागवड केलेली लाल मिरची बाजारात विक्रीसाठी येत आहे. दहा ते बारा हजार रूपये प्रति क्विंटल लाला मिरचीला भाव येत असल्याने मिरची बाजारात गेल्या आठवड्यात २००० हजार पोते लाल मिरचीची चागली आवक झाली होती. मिरची सर्वांधीक ११ हजार रूपये प्रति क्विंटल भाव देण्यात आला होता. मात्र काही दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे मिरचीचा ऊन न मिळाल्याने मिरची चामट झाली आहे. मात्र मिरचीच्या दर्जा मात्र कायम आहे. असे असतांना व्यापा-यांनी चांगली मिरची कमी दराने मांगितल्याने शेतक-यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते.............................काही दिवसापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि गारपिट आणि पावसामुळे लाल मिरची ओलसर झाली आहे. मिरचीची गुणवत्ता पाहून मिरची खरेदी करण्यात येत आहे.- इस्माईल शेख, मिरची व्यापारी