शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

सातोना, आंबा ग्रामपंचायतीत सत्ता पालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:32 IST

परतूर : तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतीचे निकाल सोमवारी जाहीर झाले आहेत. तालुक्यात सर्वात मोठ्या असलेल्या सातोना (खू) व आंबा ग्रामपंचायतीत ...

परतूर : तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतीचे निकाल सोमवारी जाहीर झाले आहेत. तालुक्यात सर्वात मोठ्या असलेल्या सातोना (खू) व आंबा ग्रामपंचायतीत सत्ता पालट झाली आहे. तर वाटूर येथे विद्यमान सरपंचाचे पुन्हा वर्चस्व सिद्ध झाले आहे.

तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतची मत मोजणी जवाहर नवोदय विद्यालय (आंबा) येथे पार पडली. दहा टेबलवर १३ फेºयात ही मत मोजणी पूर्ण झाली. तालुक्यातील ग्रामपंचायतीचे निकाल ऐकण्यासाठी सकाळपासूनच मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. निकाल जहिर होताच कार्यकर्ते जल्लोष करून गुलाल उधळत होते. ही मतमोजणी शांततेत व सुरळीत पार पडल्याचे निवडणूक निर्णय अधीकारी रूपा चित्रक यांनी सांगितले. यावेळी शिकाऊ पोलीस अधीक्षक हसन गौर, सपोनी. शैलेंद्र ठाकरे, पोउनी. सुनील बोडखे, के. एस. अंंभुरे आदींनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता. तालुक्यात सर्वात मोठ्या सातोना (खू), आंबा व वाटूर या ग्रामपंचायतीच्या निकालाची उत्सूकता ग्रामस्थांना अधिक होती. सातोना (खू) ही ग्रामपंचायत काँग्रेसचे महेश आकात यांच्या ताब्यात होती. मात्र, या निवडणूकीत भाजपचे विलास आकात यांच्या पॅनलचे १५ पैकी १२ उमेदवार तर विद्यमान सरपंच महेश आकात यांच्या पॅनलचे केवळ तिनच सदस्य निवडून आले. आंबा येथे भाजपच्या सत्तेला सुरूंग लागला. जुन्या नेत्यांनी आघाडी करत ही ग्रमपंचायत भाजपच्या ताब्यातून हिसकावली आहे. वाटूरची ग्रामपंचायत काँग्रेसचे बद्रीनारायण खवणे यांच्या ताब्यात होती. यावेळीही त्यांनी व्यवस्थित खेळी खेळत १३ पैकी आपले ९ उमेदवार निवडून आणत आपले वर्चस्व या ग्रामपंचायतवर सिद्ध केले आहे. हातडी व का-हाळा या दोन ग्रामपंचायतीत प्रत्येकी ९ पैकी सर्वच सदस्य रा.काँ. चे आले आहेत.

महाविकास आघाडीला मोठे यश- सुरेशकुमार जेथलिया

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आ. सुरेशकुमार जेथलिया म्हणाले की, या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व सेना मिळून मोठे यश मिळाले आहे. या निवडणुका गावपातळीवर असल्याने सर्वच पक्षाचे सदस्य कमी- अधीक प्रमाणात असतात. आमच्या आघाडीच्या ताब्यात जवळपास २३ ग्रा. पं. आल्या असल्याचेही जेथलिया यांनी सांगितले.

राष्ट्रवादीच्या ताब्यात १५ ग्रामपंचायती

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल आकात म्हणाले, आमच्या ताब्यात १५ ग्रामपंचायती आल्या आहेत. प्रथमत: आमच्या पक्षाला ग्राम पातळीवर मोठे यश मिळाले आहे. यातून तालुक्यात युवकांची ताकद वाढत असल्याचे दिसून येत असल्याचेही सभापती आकात म्हणाले.

भाजपाच्या ताब्यात ३१ ग्रामपंचायती

युवा नेते राहुल लोणीकर म्हणाले, या निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले आहे. ३१ ग्रामपंचायती आमच्या ताब्यात आल्या आहेत. हा विजय माजी मंत्री आ. बबनराव लोणीकर यांनी केलेल्या विकास कामासह आमच्या कार्यकर्त्यांचा आहे,

फोटो ओळ : परतूर येथील मतमोजणी केंद्रावर मतमोजणी प्रतिनीधींमध्ये जाण्यासाठी अशा रांगा लागल्या होत्या. २) मतमोजणी केंद्राबाहेर उभा असलेले कार्यकर्ते.