शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

केंद्रीय पथकाकडून केवळ दीड तासात दोन गावांच्या नुकसानीची पाहणी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 00:29 IST

केंद्रीय पथकाने रविवारी तालुक्यातील पळसखेडा ठोंबरी, चांदई एक्को भागातील नुकसानीची दीड तासात पाहणी करून जाफराबाद तालुक्याचा मार्ग धरला.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन / राजूर : परतीच्या पावसामुळे पिकांचे झालेले नुकसान आणि कुटुंबावर कोसळलेल्या व्यथा केंद्रीय पथकासमोर मांडताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. केंद्रीय पथकाने रविवारी तालुक्यातील पळसखेडा ठोंबरी, चांदई एक्को भागातील नुकसानीची दीड तासात पाहणी करून जाफराबाद तालुक्याचा मार्ग धरला.पथक प्रमुख तथा अतिरिक्त सचिव डॉ. वी. तिरूपगल, डॉ. के. मनोहरण, जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे व इतर अधिकाऱ्यांनी शेतक-यांशी संवाद साधला. चांदई एक्को येथील श्रीराम ढाकणे या ८८ वर्षाच्या शेतक-याच्या शेतातील मका व सोयाबीन या पिकाच्या नुकसानीची पाहणी करण्यात आली. आपल्या आयुष्यात अशी नैसर्गिक आपत्ती आली नव्हती. इतके नुकसान झाले नव्हते हे सांगताना ढाकणे यांचे डोळे पाणावले होते. ग्रामसेवक, कृषी विभागाच्या पथकाने पाहणी केली. मात्र, मदत मिळाली नाही. तुम्ही आले आणि चालले मदत केव्हा मिळणार? अशी विचारणा ढाकणे यांनी केली. मात्र, त्यांचे म्हणणे लिहून घेत अधिकारी पुढच्या दौ-याकडे गेले.पळसखेडा ठोंबरी येथील शिवाजी गायकवाड यांच्या शेतातील मकाच्या नुकसानीची पथकाने पाहणी केली. त्यानंतर राजूर येथे अनिल भालेराव यांच्या मका खरेदी केंद्राला भेट देऊन माहिती घेतली. आणि त्यानंतर हे पथक जाफराबादकडे रवाना झाले.तालुक्यातील भोकरदन, वाकडी, आन्वा, जळगाव सपकाळ, पाारध, वालसावंगी, धावडा, पिंपळगाव रेणुकाई या भागात प्रारंभीपासूनच अतिवृष्टी झाली होती. परतीच्या पावसानेसुध्दा या भागातील पिकाचे मोठे नुकसान झाले. मात्र, केंद्रीय पथकाने या भागाची पाहणी केली नाही.किती वेळा पाहणी करणारनुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या पथकाला शेतक-यांनी आता किती वेळा पाहणी व पंचनामे करता आम्हाला रबीच्या हंगामासाठी मदत मिळेल एवढेच काम लवकर करा, असे सांगितले. मात्र शेतक-यांची भाषा या पथकातील अधिका-यांना समजत नव्हती, एवढे मात्र खरे!

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी