शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

केंद्र, राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची दिशाभूल- कैलास गोरंट्याल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 01:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : छत्रपती शिवाजी महाराजांचे नांव घेऊन सत्तेवर आलेल्या विद्यमान सरकारने शेतकऱ्यांची ख-या अथाने फसवणूक केली ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : छत्रपती शिवाजी महाराजांचे नांव घेऊन सत्तेवर आलेल्या विद्यमान सरकारने शेतकऱ्यांची ख-याअथाने फसवणूक केली आहे. कर्जमाफी दिल्याचे सांगून कोणत्याही शेतक-याला या कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. कर्जमाफी झाली असती, तर आत्महत्या थांबल्या नसत्या का, असा सवाल करुन या सरकारने पिकविम्यातही कंपन्यांचा करोडो रुपयांचा फायदा करुन शेतकºयांना उघडे केले आहे, हेच अच्छे दिन आहेत का, असा संतप्त सवाल माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी केला.जालना विधानसभा मतदार संघातील सारवाडी, रोहणवाडी आणि लोंढेवाडी या गावांना त्यांनी बुधवारी भेटी दिल्या या भेटी दरम्यान गोरंट्याल बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राम सावंत, बाळासाहेब तनपूरे, जालना तालुकाध्यक्ष वसंत जाधव, समाधान शेजूळ, अब्दुल राऊफ परसुवाले, अरुण घडलिंग, बबन वाघ, गणेश चौधरी, नामदेव महाराज उगले, तुकाराम चावरे, गणेश कापसे, दिपक उजेड, अंकुश बाळराज, एकनाथ कुटे, सचिन चाळसे, विष्णू काजळे, गणेश मैंद, तर सारवाडीचे पोलीस पाटील पंडित काळे, आसाराम काळे, दामू काळे, भाऊसाहेब काळे, नारायण काळे, उपसरपंच विलास काळे, उध्दव महाराज काळे आदींची उपस्थिती होती.पुढे बोलतांना गोरंट्याल म्हणाले की, केंद्रात पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील युपीए सरकार सत्तेत असताना शेतक-यांना सरसकट कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेऊन संकटात असलेल्या शेतक-यांना मोठा दिलासा देण्यात आला. राज्यातील भाजपा- शिवसेना सरकारने शेतक-यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या गोंडस नावाखाली कर्जमाफीची घोषणा केली असली तरी, पाच वर्षात हे सरकार कर्जमाफी करु शकलेले नाही.त्यामुळे शेतक-यांच्या संकटात अधिकच भर पडली असून त्यामुळे शेतकरी आत्महत्या थांबण्याऐवजी अधिक मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. शेतकºयांच्या आत्महत्येला हे सरकारच जबाबदार असल्याचा आरोप गोरंट्याल यांनी केला. शेतकरी विरोधी असलेल्या या सरकारला खाली खेचण्यासाठी येत्या निवडणूकीत शेतक-यांसह सर्व घटकांनी कॉंग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची आवश्यकता असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.यावेळी गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली सारवाडी येथील रमेश काळे, विठ्ठल काळे, रवि काळे, विठ्ठल नारायण काळे, जीवन काळे, योगेश काळे, लक्ष्मण काळे, शरद कुटे, गणपत काळे, भीमराव काळे, विज्ञान नरवडे, सुदर्शन कमाने, विक्रम नरवडे, गंगाधर काळे, संतोष नाचणे, सुखदेव काळे, मच्छिंद्र पवार, भाऊराव खरात, कैलास काळे, बळीराम काळे, राजाराम काळे, रामकिसन काळे, श्रीधर काळे, परबराव काळे, बाबूराव काळे आदींनी गोरंट्याल यांच्या उपस्थिती काँग्रेस प्रवेश केला.

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारणvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक