शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

जागतिक आदिवासी दिन केला साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:34 IST

ब्राम्हणखेडा येथे शेतीशाळेचे आयोजन जालना : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत ब्राम्हणखेडा येथे शेतीशाळा घेण्यात आली. ...

ब्राम्हणखेडा येथे शेतीशाळेचे आयोजन

जालना : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत ब्राम्हणखेडा येथे शेतीशाळा घेण्यात आली. यावेळी शेतीशाळा समन्वयक नंदकिशोर पुंड यांनी कीटकनाशक फवारणी करताना सुरक्षा किटचा वापर करणे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच फवारणीची सुरक्षा किट घरच्या घरी कशी तयार करावी याविषयी प्रात्यक्षिक दाखवले शेतीशाळा प्रशिक्षक मुकुंद ढवळे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना शत्रू कीटक व मित्र कीटक यांची ओळख करून जैविक कीटकनाशकांची फवारणी करून मित्र किडींची जोपासना करण्याविषयी मार्गदर्शन केले तसेच कृषी सहायक वानखेडे यांनी विविध योजनांविषयी शेतकऱ्यांना माहिती दिली.

पदोन्नती बद्दल पवार यांचा सत्कार

जालना : सदर बाजार पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल परशुराम पवार यांची सहायक पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष संदीप वाघमारे, सामाजिक कार्यकर्ता मयुरी अग्रवाल, डीबी पथकाचे प्रमुख गणेश झलवार, रामप्रसाद रेंगे उपस्थित होते

धावडा परिसरातून पूरग्रस्तासाठी मदत

जालना : पूर तसेच नैसर्गिक संकटात सापडलेल्यांसाठी राज्यभरातून मदतीचे हात पुढे आहे. यामध्ये जालना जिल्ह्यातील धावडा परिसरातील ग्रामस्थांनीही पुढाकार घेत धान्य संकलन केले. परिसरातील धावडा, पोखरी, विझोरा, वालसांवगी, जाळीचादेव, येथील महिला बचत गटांनी १० क्विंटल धान्य जमा करून मदत पाठवली आहे. यावेळी सरपंच बोराडे, गटाचे समन्वयक पवार, बचत गटाच्या सदस्या आदी उपस्थित होते यावेळी जमा झालेल्या धान्याची पॅकिंग करून हे धान्य पुढे पाठवले जाणार आहे.

जांबसमर्थ येथे वृक्षांची लागवड

जांबसमर्थ : घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथील अंबड - पाथरी राज्य महामार्गावरील संत रामदास स्वामी स्मृतीवणात समर्थ मंदिर ट्रस्टच्या वतीने क्रांतिदिनाचे औचित्य साधून सोमवारी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सरपंच बाबासाहेब तांगडे, महेश साकळगावकर, सुरेश देशपांडे, धनंजय देशपांडे, अविनाश जहागीरदार, लक्ष्मण तांगडे, अर्जुन गणकवार, डॉ. कृष्णा कोकणे, गुलाब तांगडे, किशोर मुनेमाणिक, रामराव खाडे आदींची उपस्थिती होती.

घनसावंगी शहरातील पथदिवे बंद

घनसावंगी : शहरांतर्गत विविध भागातील पथदिवे बंद पडले आहेत. पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी पादचारी नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. अंधाराचा फायदा घेत अनेकजण भुरट्या चोऱ्या ही करू लागले आहेत. ही गैरसोय दूर करण्यासाठी पालिकेने लक्ष देऊन बंद पडलेले पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.

विस्कळीत सेवेमुळे मोबाईल धारक त्रस्त

परतूर : शहरासह ग्रामीण भागातील बीएसएनएलची सेवा सतत विस्कळीत होत आहे. त्यामुळे एकमेकांना संपर्क साधताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो. शिवाय इंटरनेट सेवाही विस्कळीत झाली आहे. याचा मुलांच्या ऑनलाईन शिक्षणावर परिणाम होत आहे. संबंधितांनी सुरळीत सेवा पुरवावी, अशी मागणी ग्राहक वर्गातून केली जात आहे.