शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक आदिवासी दिन केला साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:34 IST

ब्राम्हणखेडा येथे शेतीशाळेचे आयोजन जालना : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत ब्राम्हणखेडा येथे शेतीशाळा घेण्यात आली. ...

ब्राम्हणखेडा येथे शेतीशाळेचे आयोजन

जालना : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत ब्राम्हणखेडा येथे शेतीशाळा घेण्यात आली. यावेळी शेतीशाळा समन्वयक नंदकिशोर पुंड यांनी कीटकनाशक फवारणी करताना सुरक्षा किटचा वापर करणे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच फवारणीची सुरक्षा किट घरच्या घरी कशी तयार करावी याविषयी प्रात्यक्षिक दाखवले शेतीशाळा प्रशिक्षक मुकुंद ढवळे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना शत्रू कीटक व मित्र कीटक यांची ओळख करून जैविक कीटकनाशकांची फवारणी करून मित्र किडींची जोपासना करण्याविषयी मार्गदर्शन केले तसेच कृषी सहायक वानखेडे यांनी विविध योजनांविषयी शेतकऱ्यांना माहिती दिली.

पदोन्नती बद्दल पवार यांचा सत्कार

जालना : सदर बाजार पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल परशुराम पवार यांची सहायक पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष संदीप वाघमारे, सामाजिक कार्यकर्ता मयुरी अग्रवाल, डीबी पथकाचे प्रमुख गणेश झलवार, रामप्रसाद रेंगे उपस्थित होते

धावडा परिसरातून पूरग्रस्तासाठी मदत

जालना : पूर तसेच नैसर्गिक संकटात सापडलेल्यांसाठी राज्यभरातून मदतीचे हात पुढे आहे. यामध्ये जालना जिल्ह्यातील धावडा परिसरातील ग्रामस्थांनीही पुढाकार घेत धान्य संकलन केले. परिसरातील धावडा, पोखरी, विझोरा, वालसांवगी, जाळीचादेव, येथील महिला बचत गटांनी १० क्विंटल धान्य जमा करून मदत पाठवली आहे. यावेळी सरपंच बोराडे, गटाचे समन्वयक पवार, बचत गटाच्या सदस्या आदी उपस्थित होते यावेळी जमा झालेल्या धान्याची पॅकिंग करून हे धान्य पुढे पाठवले जाणार आहे.

जांबसमर्थ येथे वृक्षांची लागवड

जांबसमर्थ : घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथील अंबड - पाथरी राज्य महामार्गावरील संत रामदास स्वामी स्मृतीवणात समर्थ मंदिर ट्रस्टच्या वतीने क्रांतिदिनाचे औचित्य साधून सोमवारी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सरपंच बाबासाहेब तांगडे, महेश साकळगावकर, सुरेश देशपांडे, धनंजय देशपांडे, अविनाश जहागीरदार, लक्ष्मण तांगडे, अर्जुन गणकवार, डॉ. कृष्णा कोकणे, गुलाब तांगडे, किशोर मुनेमाणिक, रामराव खाडे आदींची उपस्थिती होती.

घनसावंगी शहरातील पथदिवे बंद

घनसावंगी : शहरांतर्गत विविध भागातील पथदिवे बंद पडले आहेत. पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी पादचारी नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. अंधाराचा फायदा घेत अनेकजण भुरट्या चोऱ्या ही करू लागले आहेत. ही गैरसोय दूर करण्यासाठी पालिकेने लक्ष देऊन बंद पडलेले पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.

विस्कळीत सेवेमुळे मोबाईल धारक त्रस्त

परतूर : शहरासह ग्रामीण भागातील बीएसएनएलची सेवा सतत विस्कळीत होत आहे. त्यामुळे एकमेकांना संपर्क साधताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो. शिवाय इंटरनेट सेवाही विस्कळीत झाली आहे. याचा मुलांच्या ऑनलाईन शिक्षणावर परिणाम होत आहे. संबंधितांनी सुरळीत सेवा पुरवावी, अशी मागणी ग्राहक वर्गातून केली जात आहे.