शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

गावरान पानाच्या विड्याला 'कलकत्ता'चा ब्रेक ! पानमळे आली निम्म्यावर

By विजय मुंडे  | Updated: August 22, 2023 19:09 IST

कामासाठी मजूर मिळेनात, उन्हाळ्यात पाण्याचाही प्रश्न ऐरणीवर आल्याने शेतकऱ्यांनी गावरान पानमळे जगवणे अवघड झाले आहे

जालना : घरगुती कार्यक्रम कोणताही असो त्यात पानाचा विडा नाही असे होत नाही! धार्मिक कार्यक्रमांमध्येही गावरान पानांचे महत्त्व अधिक आहे. परंतु, बदलत्या काळानुरूप युवा वर्गाचा कलकत्ता, बनारसी पानाकडे वाढला आहे. यामुळे दहा वर्षांतच गावरान पानांची असलेली मागणी निम्म्यावर आली असून, याचा परिणाम पानमळे मोडीत निघण्यावर झाला आहे.

जालना जिल्ह्यातील भोकरदन, जाफराबाद तालुक्यांतील भारज, वालसावंगी, वालसा या गावांसह इतर ठिकाणी आठ-दहा वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात पानमळे होते. धार्मिक कार्यक्रमात पूजेसाठी गावरान पानाचे महत्त्व आहे. त्यात घरगुती किंवा इतर कार्यक्रम असाेत जेवणानंतर पानाचा विडा आवर्जून एकमेकांना दिला जात होता. शिवाय पान खाण्याने शरीराला लाभ होत असल्याचे आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात. परंतु, बदलत्या काळानुरूप कलकत्ता भागातून आलेले कलकत्ता पान आणि बनारस भागातून येणारे बनारस पान यामुळे युवा पिढीचा ओढा या पानांकडे वाढला आहे. गावरान पानांना बाजारात असणारी मागणी घटली आहे. दुसरीकडे पानमळ्यांसाठी मुबलक पाण्याची उपलब्धताही होत नाही. याचा परिणामही पानमळ्यांवर झाला आहे. पानमळ्यातील वेली लावण्याचे आणि पाने तोडण्याचे कामही जिकिरीचे आहे. हे काम करण्यासाठी मजुरांची उपलब्धता ग्रामीण भागात होत नाही. या सर्व बाबींचा परिणाम गावरान पानमळे कमी होण्यावर झाला आहे.

अनेकांनी पानमळे मोडलेआमच्याकडे गत १५ वर्षांपासून पानमळा आहे. एकेकाळी पानांना मोठ्या प्रमाणात मागणी होती. चिखली, खामगाव, संभाजीनगर, श्रीरामपूर आदी ठिकाणी २५०० पानांचा पिटारा पाठविला जात होता. परंतु, गावरान पानांची मागणी घटली आहे. त्यात पाणी आणि मजुरांची टंचाईही आहे. यामुळे अनेकांनी पानमळे मोडीत काढले आहेत.- वसंतराव बोडखे, शेतकरी, भारज (बु.)

५०० पनांची मागणी शंभरावरआमच्या चार पिढ्यांपासून पान तयार करण्याचा व्यवसाय केला जातो. दहा वर्षांपूर्वी आम्हाला दैनंदिन ५०० गावरान पान लागत होते. परंतु, आता कलकत्ता, बनारस पानांना ग्राहकांची मागणी वाढली आहे. त्यामुळे दिवसाला केवळ १०० गावरान पाने लागतात.- राजेश कोंड्याल, व्यापारी, जालना

टॅग्स :FarmerशेतकरीJalanaजालना