शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

मंत्र्यांच्या मतदारसंघातच पीकविमा वाटपात गोंधळ -कैलास गोरंट्याल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2019 1:08 AM

कर आकारणीच्या मुद्यावरून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू असून, त्यात तथ्य नसल्याचा दावा गोरंट्याल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पालिकेच्या मुद्यावरून गेल्या काही महिन्यांपासून राज्यमंत्री अर्जुन खोतकर तसेच उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी घेतलेला पवित्रा हा हास्यास्पद आहे. कर आकारणीच्या मुद्यावरून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू असून, त्यात तथ्य नसल्याचा दावा गोरंट्याल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. तसेच राज्यमंत्री अर्जुन खोतकरांच्या मतदारसंघात पीकविमा वाटप रखडल्याचे सांगून त्यांनी शहरात साडेचार वर्षात औरंगाबाद चौफुली ते विशाल कॉर्नर या एकमेव रस्त्याचे काम केल्याचेही गोरंट्याल यांनी सांगितले.गेल्या दोन महिन्यांपासून जशा विधानसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत, तसे राज्यमंत्री खोतकर तसेच उपनगराध्यक्ष राऊत यांच्याकडून आम्हाला लक्ष्य केले जात आहे. ही बाब चिंतेचा विषय आहे. त्यांनी कुठल्याही चौकशी केल्या तरी त्यांना त्यात काहीच हाती लागणार नाही, अंदाज समितीचा अहवाल त्यांनी जनतेसमोर मांडवा असे आवाहन यावेळी करण्यात आले. कर आकारणीची कोलेब्रो कंपनीची नियुक्ती ही शिवसेना -भाजप युतीच्या ताब्यात पालिका असतानाच करण्यात आली होती. असा दावा करून त्याला आम्ही मुदतवाढ दिली. पालिकेचे उपत्न वाढीचे स्त्रोत हे कर आणि पाणी पट्टी आकारणी हेच असल्याने ते काळानुरूप वाढविणे गरजेचे असल्यानेच आम्ही हा निर्णय घेतला. न्यायालयाच्या निर्णयाची कल्पना आम्हाला नव्हती हे देखील गोरंट्याल यांनी मान्य केले.एकूणच गणेश विसर्जनच्या मुद्यावरून ही पत्र परिषद थेट खोतकर आणि राऊत यांच्या भोवती फिरली. यावेळी आपण अनेक गावात फ्रिलो असता, शेतकऱ्यांचे मोठे हाल आहेत. पीकविमा, पीककर्ज हे अद्यापही अनेकांना मिळाले नाही. जालना तालुक्यात तर गेल्या रबी हंगामातील पीकविमाही वाटप झालेला नाही. याकडे राज्यमंत्र्यांनी लक्ष देणे अपेक्षित आहे. परंतु तसे करता केवळ कामाच्या शुभारंभावर भर देऊन लोकांची दिशाभूल केली जात आहे. अनेक पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टर नाहीत, तसेच अन्य शासकीय विभागात कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. हे शासन म्हणून त्यांनी पाहणे आवश्यक असतसाना नोकरी मेळावा, मनोरंजनाचे विविध कार्यक्रम घेऊन ते विकास कामे करत असल्याचे भासवत असल्याचा आरोपही गोरंट्याल यांनी केला. या पत्रकार परिषदेस नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, शहराध्यक्ष शेख महेमूद, महावीर ढक्का आदींची उपस्थिती होती.गुरूवारी होणा-या गणेश विसर्जनासाठी जालना पालिकेने योग्य ती तयारी केली आहे. यंदा नांदेड येथून ४० जणांचे विशेष पथक तराफ्यांसह तैनात करण्यात आले आहे. तसेच पट्टीचे पोहणारे तरूणही तेथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अग्निशमन दल, क्रेन तसेच घरगुती गणपती विसर्जनाची वेगळी व्यवस्था केली आहे. मोठ्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून, मोठे क्रेन मागवण्यात आले आहे. रस्त्यावरील खड्डे मुरूम टाकून बुजविले असून, विसर्जन स्थळावर १५ सीसीटीव्हीचे कॅमेरे बसविण्यात आले आहेत.- संगीता गोरंट्याल, नगराध्यक्षा

टॅग्स :Jalana Muncipalityजालना नगरपरिषदnagaradhyakshaनगराध्यक्षPoliticsराजकारण