शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महत्वाच्या बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:31 IST

जालना : शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी जालन्यात वर्षभरापूर्वी स्वयंचलित सिग्नल व्यवस्था बसविण्यात आली होती. ही व्यवस्था मामा चौक, शनिमंदिर चौक, ...

जालना : शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी जालन्यात वर्षभरापूर्वी स्वयंचलित सिग्नल व्यवस्था बसविण्यात आली होती. ही व्यवस्था मामा चौक, शनिमंदिर चौक, मुथा बिल्डिंग यासह अन्य चौकामध्ये बसविली होती; परंतु याकडे शहर वाहतूक शाखेसह पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. विशेष म्हणजे शनिमंदिरसह पाणीवेस भागात वाहतूक कोंडी सर्वांची डोकेदुखी ठरत आहे. या दोन्ही भागात एकेरी वाहतूक व्यवस्थेची गरज व्यक्त होत आहे.

--------------------------------------------------

पीकविमा संदर्भात लोणीकरांचा आरोप

जालना : पीकविमा संदर्भात खासगी विमा कंपन्या या शेतकऱ्यांची लूट करत आहेत. ही लूट थांबविण्यासाठी सरकारनेच विमा कंपनी स्थापन करावी अशी मागणी आ. बबनराव लोणीकर यांनी केली आहे. गेल्यावर्षी रिलायन्स कंपनीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून कोट्यवधी रुपये विमा हप्ता म्हणून भरून घेतला होता. त्या तुलनेत केवळ साडेतीन कोटी रुपयांचीच मदत दिली आहे. शेतकऱ्यांनी विमा हप्ता म्हणून जवळपास ३१८ कोटी रुपये भरले असल्याची माहिती लोणीकर यांनी दिली. ही एक प्रकारे विमा कंपन्यांची पठाणी वसुली असल्याचेही लोणीकरांनी नमूद केले आहे.

----------------------------------------------

शहरातील तीनही बंधारे ओसंडले

जालना : गेल्या आठवड्यात दमदार पावसाने जालनेकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटवली आहे. जालना शहरातील कुंडलिका नदीवर रामतीर्थ स्मशानभूमीजवळ तसेच निधोना आणि अन्य एका ठिकाणी हे बंधारे २०१२ च्या दुष्काळात बांधले होते. ते बंधारे या पावसामुळे ओसंडून वाहत असून, यामुळे शहरातील संभाजीनगर तसेच बसस्थानक परिसरासह अन्य भागातील पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. कुंडलिका नदीला पूर आल्याने हे बंधारे भरल्याची माहिती देण्यात आली आहे.

-------------------------------------------

अंबड चौफुलीवर अपघातांचे सत्र

जालना : शहरातील अत्यंत वर्दळीचे ठिकाण म्हणून अंबड चौफुली ओळखली जाते. या चौफुलीवर गेल्या सहा महिन्यात जवळपास २३ जणांचे बळी गेले असून, अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रस्ता चकचकीत झाल्याने वाहने वेगात येत आहेत. ही वाहने कुठून कुठे जाणार याचा अंदाज वाहनचालकांना येत नसल्याने हे अपघात वाढले आहेत. हे अपघात टाळण्यासाठी तातडीने या चौफुलीवर गतिरोधक बसविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. परंतु त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने अपघातांचे सत्र दररोज सुरूच आहे.