शहरं
Join us  
Trending Stories
1
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
2
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
3
8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार, नवीन नियम जाणून घ्या
4
दिल्ली स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे एवढा पैसा आला कुठून? आता सगळ्यांची कुंडली काढणार
5
पगारदार कर्मचाऱ्यांसाठी EPFO ची खास योजना; 'VPF' द्वारे मिळवा FD पेक्षा जास्त सुरक्षित परतावा
6
सूर्य गोचर २०२५: १६ नोव्हेंबर, बुधादित्य योगात 'या' ७ राशींच्या व्यक्तिमत्त्वाला मिळेल नवी झळाळी!
7
फक्त ६ महिन्यांत पैसा डबल! कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 3 वर्षांत दिला 2300% परतावा!
8
निर्मात्यांकडे ना बजेट आहे ना पेैसा, प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, आजही करावा लागतो संघर्ष
9
बाई हा काय प्रकार? लिप फिलरने हवा होता एकदम ग्लॅमरस लूक, पण ओठ इतके सुजले की...
10
VIDEO: बिबट्याच्या धाडसाला सलाम! ना घाबरला, ना शरण गेला... ५ मगरींना बिनधास्त एकटा भिडला !
11
एका श्वानामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा, रोमान्स करताना नको ते घडले; पतीने मागितला घटस्फोट
12
दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र अन् अमितही अडकणार? चौकशी होणार? 'असं' आहे या दोघांच कनेक्शन 
13
Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरणात मोठी अपडेट, चौथी संशयित कार जप्त, कुठं सापडली? 
14
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकाणी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
15
बिहार विधानसभा निकालापूर्वी गुंतवणूकदार सावध? बाजार सपाट बंद; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
16
Vastu Tips: तिजोरीत स्थिर लक्ष्मी हवी? घरात करा हे ६ बदल, पैसा टिकेल आणि वाढेलही!
17
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
18
एसबीआयला ४,४०० रुपयांचा चुकीचा दंड लावणे महागात! आता द्यावी लागणार १.७० लाख रुपये भरपाई
19
IPL 2026: शेन वॉटसनचे आयपीएलमध्ये पुनरागमन, 'या' संघाशी जुडलं नाव!
Daily Top 2Weekly Top 5

महत्वाच्या बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:31 IST

जालना : शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी जालन्यात वर्षभरापूर्वी स्वयंचलित सिग्नल व्यवस्था बसविण्यात आली होती. ही व्यवस्था मामा चौक, शनिमंदिर चौक, ...

जालना : शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी जालन्यात वर्षभरापूर्वी स्वयंचलित सिग्नल व्यवस्था बसविण्यात आली होती. ही व्यवस्था मामा चौक, शनिमंदिर चौक, मुथा बिल्डिंग यासह अन्य चौकामध्ये बसविली होती; परंतु याकडे शहर वाहतूक शाखेसह पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. विशेष म्हणजे शनिमंदिरसह पाणीवेस भागात वाहतूक कोंडी सर्वांची डोकेदुखी ठरत आहे. या दोन्ही भागात एकेरी वाहतूक व्यवस्थेची गरज व्यक्त होत आहे.

--------------------------------------------------

पीकविमा संदर्भात लोणीकरांचा आरोप

जालना : पीकविमा संदर्भात खासगी विमा कंपन्या या शेतकऱ्यांची लूट करत आहेत. ही लूट थांबविण्यासाठी सरकारनेच विमा कंपनी स्थापन करावी अशी मागणी आ. बबनराव लोणीकर यांनी केली आहे. गेल्यावर्षी रिलायन्स कंपनीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून कोट्यवधी रुपये विमा हप्ता म्हणून भरून घेतला होता. त्या तुलनेत केवळ साडेतीन कोटी रुपयांचीच मदत दिली आहे. शेतकऱ्यांनी विमा हप्ता म्हणून जवळपास ३१८ कोटी रुपये भरले असल्याची माहिती लोणीकर यांनी दिली. ही एक प्रकारे विमा कंपन्यांची पठाणी वसुली असल्याचेही लोणीकरांनी नमूद केले आहे.

----------------------------------------------

शहरातील तीनही बंधारे ओसंडले

जालना : गेल्या आठवड्यात दमदार पावसाने जालनेकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटवली आहे. जालना शहरातील कुंडलिका नदीवर रामतीर्थ स्मशानभूमीजवळ तसेच निधोना आणि अन्य एका ठिकाणी हे बंधारे २०१२ च्या दुष्काळात बांधले होते. ते बंधारे या पावसामुळे ओसंडून वाहत असून, यामुळे शहरातील संभाजीनगर तसेच बसस्थानक परिसरासह अन्य भागातील पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. कुंडलिका नदीला पूर आल्याने हे बंधारे भरल्याची माहिती देण्यात आली आहे.

-------------------------------------------

अंबड चौफुलीवर अपघातांचे सत्र

जालना : शहरातील अत्यंत वर्दळीचे ठिकाण म्हणून अंबड चौफुली ओळखली जाते. या चौफुलीवर गेल्या सहा महिन्यात जवळपास २३ जणांचे बळी गेले असून, अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रस्ता चकचकीत झाल्याने वाहने वेगात येत आहेत. ही वाहने कुठून कुठे जाणार याचा अंदाज वाहनचालकांना येत नसल्याने हे अपघात वाढले आहेत. हे अपघात टाळण्यासाठी तातडीने या चौफुलीवर गतिरोधक बसविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. परंतु त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने अपघातांचे सत्र दररोज सुरूच आहे.