शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

महत्वाच्या बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:31 IST

जालना : शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी जालन्यात वर्षभरापूर्वी स्वयंचलित सिग्नल व्यवस्था बसविण्यात आली होती. ही व्यवस्था मामा चौक, शनिमंदिर चौक, ...

जालना : शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी जालन्यात वर्षभरापूर्वी स्वयंचलित सिग्नल व्यवस्था बसविण्यात आली होती. ही व्यवस्था मामा चौक, शनिमंदिर चौक, मुथा बिल्डिंग यासह अन्य चौकामध्ये बसविली होती; परंतु याकडे शहर वाहतूक शाखेसह पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. विशेष म्हणजे शनिमंदिरसह पाणीवेस भागात वाहतूक कोंडी सर्वांची डोकेदुखी ठरत आहे. या दोन्ही भागात एकेरी वाहतूक व्यवस्थेची गरज व्यक्त होत आहे.

--------------------------------------------------

पीकविमा संदर्भात लोणीकरांचा आरोप

जालना : पीकविमा संदर्भात खासगी विमा कंपन्या या शेतकऱ्यांची लूट करत आहेत. ही लूट थांबविण्यासाठी सरकारनेच विमा कंपनी स्थापन करावी अशी मागणी आ. बबनराव लोणीकर यांनी केली आहे. गेल्यावर्षी रिलायन्स कंपनीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून कोट्यवधी रुपये विमा हप्ता म्हणून भरून घेतला होता. त्या तुलनेत केवळ साडेतीन कोटी रुपयांचीच मदत दिली आहे. शेतकऱ्यांनी विमा हप्ता म्हणून जवळपास ३१८ कोटी रुपये भरले असल्याची माहिती लोणीकर यांनी दिली. ही एक प्रकारे विमा कंपन्यांची पठाणी वसुली असल्याचेही लोणीकरांनी नमूद केले आहे.

----------------------------------------------

शहरातील तीनही बंधारे ओसंडले

जालना : गेल्या आठवड्यात दमदार पावसाने जालनेकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटवली आहे. जालना शहरातील कुंडलिका नदीवर रामतीर्थ स्मशानभूमीजवळ तसेच निधोना आणि अन्य एका ठिकाणी हे बंधारे २०१२ च्या दुष्काळात बांधले होते. ते बंधारे या पावसामुळे ओसंडून वाहत असून, यामुळे शहरातील संभाजीनगर तसेच बसस्थानक परिसरासह अन्य भागातील पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. कुंडलिका नदीला पूर आल्याने हे बंधारे भरल्याची माहिती देण्यात आली आहे.

-------------------------------------------

अंबड चौफुलीवर अपघातांचे सत्र

जालना : शहरातील अत्यंत वर्दळीचे ठिकाण म्हणून अंबड चौफुली ओळखली जाते. या चौफुलीवर गेल्या सहा महिन्यात जवळपास २३ जणांचे बळी गेले असून, अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रस्ता चकचकीत झाल्याने वाहने वेगात येत आहेत. ही वाहने कुठून कुठे जाणार याचा अंदाज वाहनचालकांना येत नसल्याने हे अपघात वाढले आहेत. हे अपघात टाळण्यासाठी तातडीने या चौफुलीवर गतिरोधक बसविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. परंतु त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने अपघातांचे सत्र दररोज सुरूच आहे.