शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
3
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
4
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
5
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
6
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
7
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
8
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
9
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
10
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
11
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
12
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
13
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
14
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
15
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...
16
Pranjal Khewalkar Arrest : मोबाईलमधून हाऊस पार्टीतील महिलांशी केलेली चॅटिंग व पार्टीचे व्हिडिओ सापडले
17
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
18
Sonam Raghuvanshi : बेवफा सोनमवर चित्रपट येणार, 'हे' नाव असणार; दिग्दर्शकाने घेतली राजा रघुवंशीच्या भावाची भेट
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
शेजारी राहणाऱ्या महिलेवर केले वार, गुप्तांगावरही ओरबाडलं अन् जंगलात फेकून दिलं! तरुण का झाला हैवान?

महत्वाच्या बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:31 IST

जालना : शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी जालन्यात वर्षभरापूर्वी स्वयंचलित सिग्नल व्यवस्था बसविण्यात आली होती. ही व्यवस्था मामा चौक, शनिमंदिर चौक, ...

जालना : शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी जालन्यात वर्षभरापूर्वी स्वयंचलित सिग्नल व्यवस्था बसविण्यात आली होती. ही व्यवस्था मामा चौक, शनिमंदिर चौक, मुथा बिल्डिंग यासह अन्य चौकामध्ये बसविली होती; परंतु याकडे शहर वाहतूक शाखेसह पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. विशेष म्हणजे शनिमंदिरसह पाणीवेस भागात वाहतूक कोंडी सर्वांची डोकेदुखी ठरत आहे. या दोन्ही भागात एकेरी वाहतूक व्यवस्थेची गरज व्यक्त होत आहे.

--------------------------------------------------

पीकविमा संदर्भात लोणीकरांचा आरोप

जालना : पीकविमा संदर्भात खासगी विमा कंपन्या या शेतकऱ्यांची लूट करत आहेत. ही लूट थांबविण्यासाठी सरकारनेच विमा कंपनी स्थापन करावी अशी मागणी आ. बबनराव लोणीकर यांनी केली आहे. गेल्यावर्षी रिलायन्स कंपनीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून कोट्यवधी रुपये विमा हप्ता म्हणून भरून घेतला होता. त्या तुलनेत केवळ साडेतीन कोटी रुपयांचीच मदत दिली आहे. शेतकऱ्यांनी विमा हप्ता म्हणून जवळपास ३१८ कोटी रुपये भरले असल्याची माहिती लोणीकर यांनी दिली. ही एक प्रकारे विमा कंपन्यांची पठाणी वसुली असल्याचेही लोणीकरांनी नमूद केले आहे.

----------------------------------------------

शहरातील तीनही बंधारे ओसंडले

जालना : गेल्या आठवड्यात दमदार पावसाने जालनेकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटवली आहे. जालना शहरातील कुंडलिका नदीवर रामतीर्थ स्मशानभूमीजवळ तसेच निधोना आणि अन्य एका ठिकाणी हे बंधारे २०१२ च्या दुष्काळात बांधले होते. ते बंधारे या पावसामुळे ओसंडून वाहत असून, यामुळे शहरातील संभाजीनगर तसेच बसस्थानक परिसरासह अन्य भागातील पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. कुंडलिका नदीला पूर आल्याने हे बंधारे भरल्याची माहिती देण्यात आली आहे.

-------------------------------------------

अंबड चौफुलीवर अपघातांचे सत्र

जालना : शहरातील अत्यंत वर्दळीचे ठिकाण म्हणून अंबड चौफुली ओळखली जाते. या चौफुलीवर गेल्या सहा महिन्यात जवळपास २३ जणांचे बळी गेले असून, अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रस्ता चकचकीत झाल्याने वाहने वेगात येत आहेत. ही वाहने कुठून कुठे जाणार याचा अंदाज वाहनचालकांना येत नसल्याने हे अपघात वाढले आहेत. हे अपघात टाळण्यासाठी तातडीने या चौफुलीवर गतिरोधक बसविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. परंतु त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने अपघातांचे सत्र दररोज सुरूच आहे.