शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
पाकच्या नापाक कारवाया थांबेनात; आयएसआयने हेरगिरी करण्यासाठी निवडला नेपाळचा रस्ता! काय केलं बघाच...
4
अद्भूत आणि जादूई! रणबीर कपूरच्या 'रामायण' सिनेमाची पहिली झलक, डोळ्यांचं पारणं फेडणारा टीझर
5
सोशल मीडियावर एक पोस्ट आणि गेली २२ लाखांची नोकरी, कंपनीच्या मालकांनी स्वतः सांगितलं कारण
6
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
7
लाखो रुपयांचा IT जॉब सोडून जोडप्याचा शेती करण्याचा निर्णय; आज १ कोटींची उलाढाल; नेमकं काय करतात?
8
बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना! टिन शेड कोसळल्याने एका भाविकाचा मृत्यू, ८ जण जखमी
9
Chaturmas 2025: चतुर्मासात करा 'हा' संकल्प आणि व्यक्तिमत्त्वाला द्या नवीन आकार!
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
11
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
12
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
13
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
14
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
15
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
16
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
17
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
18
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
19
४ महिन्यांत ६० रुपयांवरून २५२ वर आला 'हा' शेअर; गुंतवणूकदार मालामाल, तुमच्याकडे आहे का?
20
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...

दोघींनी टोचली २४ हजार नागरिकांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:31 IST

जालना : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट पाहता जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण करून घेण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यातील ...

जालना : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट पाहता जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण करून घेण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यातील शंभरावर केंद्रांमधून लसीकरण केले जात आहे. या मोहिमेत जालना येथील महिला रूग्णालयाचे केंद्र अव्वल असून, या केंद्रावरील दोन परिचारिकांनी शनिवारपर्यंत तब्बल २४ हजार ५३० जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचली आहे.

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व ती तयारी केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून लसीकरणावर अधिकचा भर देण्यात आला आहे. जिल्ह्यात दैनंदिन जवळपास शंभर केंद्रावर लसीचा पुरवठा करून पहिला आणि दुसरा डोस दिला जात आहे. काही ठिकाणी वयोगटानुसार लसीकरण केले जात आहे. या केंद्रांमध्ये जालना शहरातील महिला रूग्णालयातील केंद्र अव्वल आहे. अधीक्षक डॉ. आर. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. केतन चव्हाण, डॉ. नारायण धुमाळ, औषध निर्माण अधिकारी मनिष जाधव, लसीकरणकर्त्या कुसुम सोळंके, सुनीता भाले, विलास शेलकर, श्रीकांत करडखेडे, डॉ. अक्रम, डॉ. तौर यांच्यासह अंगणवाडी कर्मचारी, सुरक्षा रक्षकांची टीम काम करीत आहे. या केंद्रावरील लसीकरणकर्त्या कुसुम सोळुंके, सुनीता भाले या दोघींनी शनिवारपर्यंत तब्बल २४ हजार ५३० जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

या केंद्रांवर अधिक लसीकरण

जिल्ह्यातील केवळ सहा केंद्रांवर शनिवारपर्यंत दहा हजारांपेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये जिल्हा महिला रूग्णालय केंद्रावर २४ हजार ५३०, अंबड येथील मत्स्योदरी केंद्रावर १४ हजार १२९, भोकरदन येथील केंद्रावर १३ हजार २०३, जालना शहरातील पाणीवेस केंद्रावर १२ हजार ४५, परतूर येथील केंद्रावर ११ हजार ८२९, व्यंकटेश सेवाभावी ट्रस्टच्या केंद्रावर ११ हजार ३०५ जणांचे लसीकरण झाले आहे.

साडेचार लाख नागरिकांना पहिला डोस

जिल्ह्याची लोकसंख्या २० लाखावर आहे. परंतु, शनिवारपर्यंत केवळ ४ लाख ६७ हजार ४०० जणांनी पहिला आणि १ लाख ११ हजार ३५ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. यात ३ लाख १० हजार ६७८ पुरूषांनी व २ लाख ६७ हजार ६८४ महिलांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

कोट

कोरोना बाधितांची संख्या घटली असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविला जात आहे. त्यामुळे कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून नागरिकांनी वेळेवर लसीकरण करून घ्यावे. लसीकरणानंतरही मास्क वापरासह इतर सूचनांचे पालन करावे.

मनीष जाधव, औषध निर्माण अधिकारी