शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या मतांची टक्केवारी वाढली

By admin | Updated: May 18, 2014 00:45 IST

गंगाराम आढाव , जालना जालना लोकसभा मतदारसंघात २००४ व २००९ या दोन निवडणुकीपेक्षा २०१४ च्या निवडणुकीत १ लाख १३ हजारांनी मतदारांची संख्या वाढली.

गंगाराम आढाव , जालना जालना लोकसभा मतदारसंघात २००४ व २००९ या दोन निवडणुकीपेक्षा २०१४ च्या निवडणुकीत १ लाख १३ हजारांनी मतदारांची संख्या वाढली. गेल्या निवडणुकीपेक्षा भाजपाचे २ लाख ४० हजार तर काँग्रेस आघाडीचे ४२ हजार मतदार वाढले आहे. जालना लोकसभा मतदारसंघात २००४ च्या निवडणुकीत भाजपाला ३ लाख ७९ हजार ६३० मते तर काँग्रेसला ३ लाख ८ हजार २९८ मते मिळाली होती. ६१ हजार ३३२ मतांनी भाजपा उमेदवार रावसाहेब दानवे पाटील यांचा विजय झाला होता. तर काँग्रेसचे उत्तमसिंह पवार यांना पराभव पत्करावा लागला. २००९ च्या निवडणुकीत भाजपाला ३ लाख ५० हजार ७१० मते मिळाली तर काँग्रेस पक्षाला ३ लाख ४२ हजार २२८ मते मिळाली होती. सुमारे ८ हजार मतांनी भाजपा उमेदवार दानवे यांचा विजय झाला. या पार्श्वभूमीवर २०१४ च्या निवडणुकीत भाजपाला ५ लाख ७९ हजार ११३ मते मिळाली तर काँग्रेसला ३ लाख ८७ हजार ४०६ इतकी मते मिळाली. म्हणजेच काँग्रेसच्या पारड्यात मागील निवडणुकीपेक्षा ४५ हजार मते अधिक पडली. विशेष म्हणजे या निवडणुकीत मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी पाच मतदारसंघ काँग्रेस आघाडीकडे होते. त्यामुळे काँग्रेची बाजू भक्कम समजली जात होती. मात्र प्रत्यक्षात काँग्रेसला विधानसभांमध्ये आघाडी घेता आली नाही. त्यामुळे पराभवाला समोरे जावे लागले. भाजपा क्रमांक १ चा पक्ष ठरला आहे. तर काँग्रेस दुसर्‍या क्रमांकावर राहिला आहे. तिसर्‍या क्रमाकांवर बहुजन समाज पक्ष राहिला. मात्र, मतदारांत मोठी घट झाली आहे. मागील निवडणुकीत ३५ हजार ९७६ मते या पक्षाने घेतली होती. तर त्याआधी २००४ च्या निवडणुकीत १७ हजार मते घेतली होती. परंतू या निवडणुकीत दुरंगी लढत झाल्याने अन्य उमेदवारांना कमी प्रमाणात मते मिळाली. जालना लोकसभा मतदारसंघात या निवडणुकीत सुमारे एक लाख नवीन मतदार वाढले होते. या मतदारांत मतदानाच्या हक्काविषयी कमालीच्या जाणीवा निर्माण झाल्या होत्या. तसेच मतदान करण्यासंबधी जिल्हा प्रशासनाने तसेच सामाजिक संघटनांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्याने मतदानाची टक्केवारीही वाढली. याचा फायदा भाजपाला मिळणार हे स्पष्ट होते. मतमोजणीतून ते चित्र समोर आले असून नव्या पिढीने भाजपालाच पसंती दिली. या दोन्ही निवडणुकीत या पक्षाला पडलेल्या मतांचा फटका काँग्रेस पक्षाला बसला होता. यावेळेस २०१४ च्या निवडणुकीत या पक्षाला २३ हजार म्हणजे मागील निवडणुकीपेक्षा कमी मते मिळाली आहे. त्यांना मिळालेल्या मतांचा कुठलाही राजकीय परिणाम झालेला नाही. समाजवादी पार्टीच्या मताही थोडी झाली आहे. या पार्टी २००९ मध्ये १५५४ मते मिळाली होती.