शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
3
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
4
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
5
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
7
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
8
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
9
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
10
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
11
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
12
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
13
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
14
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
15
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
16
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
18
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
19
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
20
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री

भाजपच्या मतांची टक्केवारी वाढली

By admin | Updated: May 18, 2014 00:45 IST

गंगाराम आढाव , जालना जालना लोकसभा मतदारसंघात २००४ व २००९ या दोन निवडणुकीपेक्षा २०१४ च्या निवडणुकीत १ लाख १३ हजारांनी मतदारांची संख्या वाढली.

गंगाराम आढाव , जालना जालना लोकसभा मतदारसंघात २००४ व २००९ या दोन निवडणुकीपेक्षा २०१४ च्या निवडणुकीत १ लाख १३ हजारांनी मतदारांची संख्या वाढली. गेल्या निवडणुकीपेक्षा भाजपाचे २ लाख ४० हजार तर काँग्रेस आघाडीचे ४२ हजार मतदार वाढले आहे. जालना लोकसभा मतदारसंघात २००४ च्या निवडणुकीत भाजपाला ३ लाख ७९ हजार ६३० मते तर काँग्रेसला ३ लाख ८ हजार २९८ मते मिळाली होती. ६१ हजार ३३२ मतांनी भाजपा उमेदवार रावसाहेब दानवे पाटील यांचा विजय झाला होता. तर काँग्रेसचे उत्तमसिंह पवार यांना पराभव पत्करावा लागला. २००९ च्या निवडणुकीत भाजपाला ३ लाख ५० हजार ७१० मते मिळाली तर काँग्रेस पक्षाला ३ लाख ४२ हजार २२८ मते मिळाली होती. सुमारे ८ हजार मतांनी भाजपा उमेदवार दानवे यांचा विजय झाला. या पार्श्वभूमीवर २०१४ च्या निवडणुकीत भाजपाला ५ लाख ७९ हजार ११३ मते मिळाली तर काँग्रेसला ३ लाख ८७ हजार ४०६ इतकी मते मिळाली. म्हणजेच काँग्रेसच्या पारड्यात मागील निवडणुकीपेक्षा ४५ हजार मते अधिक पडली. विशेष म्हणजे या निवडणुकीत मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी पाच मतदारसंघ काँग्रेस आघाडीकडे होते. त्यामुळे काँग्रेची बाजू भक्कम समजली जात होती. मात्र प्रत्यक्षात काँग्रेसला विधानसभांमध्ये आघाडी घेता आली नाही. त्यामुळे पराभवाला समोरे जावे लागले. भाजपा क्रमांक १ चा पक्ष ठरला आहे. तर काँग्रेस दुसर्‍या क्रमांकावर राहिला आहे. तिसर्‍या क्रमाकांवर बहुजन समाज पक्ष राहिला. मात्र, मतदारांत मोठी घट झाली आहे. मागील निवडणुकीत ३५ हजार ९७६ मते या पक्षाने घेतली होती. तर त्याआधी २००४ च्या निवडणुकीत १७ हजार मते घेतली होती. परंतू या निवडणुकीत दुरंगी लढत झाल्याने अन्य उमेदवारांना कमी प्रमाणात मते मिळाली. जालना लोकसभा मतदारसंघात या निवडणुकीत सुमारे एक लाख नवीन मतदार वाढले होते. या मतदारांत मतदानाच्या हक्काविषयी कमालीच्या जाणीवा निर्माण झाल्या होत्या. तसेच मतदान करण्यासंबधी जिल्हा प्रशासनाने तसेच सामाजिक संघटनांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्याने मतदानाची टक्केवारीही वाढली. याचा फायदा भाजपाला मिळणार हे स्पष्ट होते. मतमोजणीतून ते चित्र समोर आले असून नव्या पिढीने भाजपालाच पसंती दिली. या दोन्ही निवडणुकीत या पक्षाला पडलेल्या मतांचा फटका काँग्रेस पक्षाला बसला होता. यावेळेस २०१४ च्या निवडणुकीत या पक्षाला २३ हजार म्हणजे मागील निवडणुकीपेक्षा कमी मते मिळाली आहे. त्यांना मिळालेल्या मतांचा कुठलाही राजकीय परिणाम झालेला नाही. समाजवादी पार्टीच्या मताही थोडी झाली आहे. या पार्टी २००९ मध्ये १५५४ मते मिळाली होती.