शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
5
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
6
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
7
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
8
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
9
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
10
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
11
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
12
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
13
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
14
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
15
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
16
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
17
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
18
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
19
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
20
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र

भाजपच्या मतांची टक्केवारी वाढली

By admin | Updated: May 18, 2014 00:45 IST

गंगाराम आढाव , जालना जालना लोकसभा मतदारसंघात २००४ व २००९ या दोन निवडणुकीपेक्षा २०१४ च्या निवडणुकीत १ लाख १३ हजारांनी मतदारांची संख्या वाढली.

गंगाराम आढाव , जालना जालना लोकसभा मतदारसंघात २००४ व २००९ या दोन निवडणुकीपेक्षा २०१४ च्या निवडणुकीत १ लाख १३ हजारांनी मतदारांची संख्या वाढली. गेल्या निवडणुकीपेक्षा भाजपाचे २ लाख ४० हजार तर काँग्रेस आघाडीचे ४२ हजार मतदार वाढले आहे. जालना लोकसभा मतदारसंघात २००४ च्या निवडणुकीत भाजपाला ३ लाख ७९ हजार ६३० मते तर काँग्रेसला ३ लाख ८ हजार २९८ मते मिळाली होती. ६१ हजार ३३२ मतांनी भाजपा उमेदवार रावसाहेब दानवे पाटील यांचा विजय झाला होता. तर काँग्रेसचे उत्तमसिंह पवार यांना पराभव पत्करावा लागला. २००९ च्या निवडणुकीत भाजपाला ३ लाख ५० हजार ७१० मते मिळाली तर काँग्रेस पक्षाला ३ लाख ४२ हजार २२८ मते मिळाली होती. सुमारे ८ हजार मतांनी भाजपा उमेदवार दानवे यांचा विजय झाला. या पार्श्वभूमीवर २०१४ च्या निवडणुकीत भाजपाला ५ लाख ७९ हजार ११३ मते मिळाली तर काँग्रेसला ३ लाख ८७ हजार ४०६ इतकी मते मिळाली. म्हणजेच काँग्रेसच्या पारड्यात मागील निवडणुकीपेक्षा ४५ हजार मते अधिक पडली. विशेष म्हणजे या निवडणुकीत मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी पाच मतदारसंघ काँग्रेस आघाडीकडे होते. त्यामुळे काँग्रेची बाजू भक्कम समजली जात होती. मात्र प्रत्यक्षात काँग्रेसला विधानसभांमध्ये आघाडी घेता आली नाही. त्यामुळे पराभवाला समोरे जावे लागले. भाजपा क्रमांक १ चा पक्ष ठरला आहे. तर काँग्रेस दुसर्‍या क्रमांकावर राहिला आहे. तिसर्‍या क्रमाकांवर बहुजन समाज पक्ष राहिला. मात्र, मतदारांत मोठी घट झाली आहे. मागील निवडणुकीत ३५ हजार ९७६ मते या पक्षाने घेतली होती. तर त्याआधी २००४ च्या निवडणुकीत १७ हजार मते घेतली होती. परंतू या निवडणुकीत दुरंगी लढत झाल्याने अन्य उमेदवारांना कमी प्रमाणात मते मिळाली. जालना लोकसभा मतदारसंघात या निवडणुकीत सुमारे एक लाख नवीन मतदार वाढले होते. या मतदारांत मतदानाच्या हक्काविषयी कमालीच्या जाणीवा निर्माण झाल्या होत्या. तसेच मतदान करण्यासंबधी जिल्हा प्रशासनाने तसेच सामाजिक संघटनांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्याने मतदानाची टक्केवारीही वाढली. याचा फायदा भाजपाला मिळणार हे स्पष्ट होते. मतमोजणीतून ते चित्र समोर आले असून नव्या पिढीने भाजपालाच पसंती दिली. या दोन्ही निवडणुकीत या पक्षाला पडलेल्या मतांचा फटका काँग्रेस पक्षाला बसला होता. यावेळेस २०१४ च्या निवडणुकीत या पक्षाला २३ हजार म्हणजे मागील निवडणुकीपेक्षा कमी मते मिळाली आहे. त्यांना मिळालेल्या मतांचा कुठलाही राजकीय परिणाम झालेला नाही. समाजवादी पार्टीच्या मताही थोडी झाली आहे. या पार्टी २००९ मध्ये १५५४ मते मिळाली होती.