शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

लोकसभा निवडणुकीसाठी भाजप सज्ज-रावसाहेब दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 00:38 IST

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदार संघात भाजपाने निवडणुकीची तयारी पूर्ण केली असून, ही निवडणुक पक्ष विकासाच्या मुद्यावर लढविणार असल्याचे सांगून अयोध्येतील राममंदिराचा मुद्दा देखील भाजपाच्या समोर असल्याचे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष खा़रावसाहेब दानवे यांनी भोकरदन येथील निवास्थानी पत्रकाराशी बोलताना सांगितले़

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदार संघात भाजपाने निवडणुकीची तयारी पूर्ण केली असून, ही निवडणुक पक्ष विकासाच्या मुद्यावर लढविणार असल्याचे सांगून अयोध्येतील राममंदिराचा मुद्दा देखील भाजपाच्या समोर असल्याचे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष खा़रावसाहेब दानवे यांनी भोकरदन येथील निवास्थानी पत्रकाराशी बोलताना सांगितले़दिपावली स्रेहमिलनाच्या कार्यक्रमानंतर खा़ दानवे यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले की पंतप्रधान नरेद्र मोदी व अमीत शहा यांच्या नेत्तृत्वाखाली लोकसभेच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढविण्यात येणार आहेत, मोदी यांना दुस-यांदा पंतप्रधान करण्यासाठी राज्यातून जास्तीत जास्त खासदार निवडूण जाण्यासाठी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने केलेल्या चांगल्या कामाचा मुद्दा निवडणुकीत समोर ठेऊन पक्ष संघटन कामाला लागले आहे. गेल्या निवडणुकीमध्ये भाजप, सेनेची युती होती मात्र त्यानंतर विधानसभेच्यावेळी युती तुटली होती या वेळी निवडणुक युतीने लढवावी ही भाजपाची इच्छा आहे, मात्र मित्रपक्षाची आद्याप भूमीका स्पष्ट नाही. त्यामुळे आम्ही राज्यातील सर्व ४८ मतदार संघामध्ये तयारी केली आहे. युती झाली तर आम्ही केलेली तयारी त्यांच्यासाठी उपयोगी पडेल जर नाही झाली तर मात्र आम्हांला लढण्याची तयारी करणे आवश्यक आहे, असे दानवे यांनी सांगून आपण गेल्या आठवड्यामध्ये गडचिरोली, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती या मतदार संघाचा दौरा केला असून, सध्या जळगाव, धुळे, नंदूरबार, दिंडोरी, रावेर, नाशिक, पालघर, ठाणे या लोकसभा मतदार संघात आपला पक्ष संघटनाच्या माध्यमातून लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने दौरा सुरू असल्याचे दानवे यांनी सांगितले़ संध्या दुष्काळी परिस्थीती असल्यामुळे सरकार हे शेतक-याच्या पाठीमागे खंभीरपणे उभे असुन वेळ प्रंसगी सरकारची तिजोरी रिकामी करावी लागली तरी सरकार मागे हटणार नाही असे दानवे यांनी सांगुन या निवडणुकीत भाजप विकास कामावर निवडणुक जिंंकेल मात्र त्याच बरोबर पक्षाने राम मंदिराचा प्रश्न सुध्दा सोडला नसल्याचे ते म्हणाले.समोरून कोण उमेदवार येईल यांची चिंंता नाही़पत्रकारानी आपण राज्याच्या दौ-यावर असतात मग जालना लोकसभा मतदार संघाकडे कसे लक्ष देणार अशी विचारणा केली असता, दानवे म्हणाले की आपण जमीनीवर पाय ठेऊन चालणारे कार्यकर्ता आहोत. त्यामुळे आपण कोठेही असलो तरी लक्ष मात्र जालना लोकसभा मतदार संघावरच असते. या मतदार संघात ६ हजार कोटीच्या रस्त्याची कामे सुरू आहेत, अनेक महत्वाचे प्रकल्प मंजुर झाले आहेत, शिवाय आपण मतदारांच्या कायम संपर्कात असतो त्यामुळे समोरून कोण उमेदवार येईल यांची आपल्याचा चिंंता नाही, या मतदार संघातील ८० टक्के निवडणुकीचे काम पूर्णत्वाकडे आल्याचे दानवे यांनी सांगितले़

टॅग्स :Raosaheb Danweरावसाहेब दानवेElectionनिवडणूक