शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकीसाठी भाजप सज्ज-रावसाहेब दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 00:38 IST

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदार संघात भाजपाने निवडणुकीची तयारी पूर्ण केली असून, ही निवडणुक पक्ष विकासाच्या मुद्यावर लढविणार असल्याचे सांगून अयोध्येतील राममंदिराचा मुद्दा देखील भाजपाच्या समोर असल्याचे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष खा़रावसाहेब दानवे यांनी भोकरदन येथील निवास्थानी पत्रकाराशी बोलताना सांगितले़

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदार संघात भाजपाने निवडणुकीची तयारी पूर्ण केली असून, ही निवडणुक पक्ष विकासाच्या मुद्यावर लढविणार असल्याचे सांगून अयोध्येतील राममंदिराचा मुद्दा देखील भाजपाच्या समोर असल्याचे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष खा़रावसाहेब दानवे यांनी भोकरदन येथील निवास्थानी पत्रकाराशी बोलताना सांगितले़दिपावली स्रेहमिलनाच्या कार्यक्रमानंतर खा़ दानवे यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले की पंतप्रधान नरेद्र मोदी व अमीत शहा यांच्या नेत्तृत्वाखाली लोकसभेच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढविण्यात येणार आहेत, मोदी यांना दुस-यांदा पंतप्रधान करण्यासाठी राज्यातून जास्तीत जास्त खासदार निवडूण जाण्यासाठी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने केलेल्या चांगल्या कामाचा मुद्दा निवडणुकीत समोर ठेऊन पक्ष संघटन कामाला लागले आहे. गेल्या निवडणुकीमध्ये भाजप, सेनेची युती होती मात्र त्यानंतर विधानसभेच्यावेळी युती तुटली होती या वेळी निवडणुक युतीने लढवावी ही भाजपाची इच्छा आहे, मात्र मित्रपक्षाची आद्याप भूमीका स्पष्ट नाही. त्यामुळे आम्ही राज्यातील सर्व ४८ मतदार संघामध्ये तयारी केली आहे. युती झाली तर आम्ही केलेली तयारी त्यांच्यासाठी उपयोगी पडेल जर नाही झाली तर मात्र आम्हांला लढण्याची तयारी करणे आवश्यक आहे, असे दानवे यांनी सांगून आपण गेल्या आठवड्यामध्ये गडचिरोली, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती या मतदार संघाचा दौरा केला असून, सध्या जळगाव, धुळे, नंदूरबार, दिंडोरी, रावेर, नाशिक, पालघर, ठाणे या लोकसभा मतदार संघात आपला पक्ष संघटनाच्या माध्यमातून लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने दौरा सुरू असल्याचे दानवे यांनी सांगितले़ संध्या दुष्काळी परिस्थीती असल्यामुळे सरकार हे शेतक-याच्या पाठीमागे खंभीरपणे उभे असुन वेळ प्रंसगी सरकारची तिजोरी रिकामी करावी लागली तरी सरकार मागे हटणार नाही असे दानवे यांनी सांगुन या निवडणुकीत भाजप विकास कामावर निवडणुक जिंंकेल मात्र त्याच बरोबर पक्षाने राम मंदिराचा प्रश्न सुध्दा सोडला नसल्याचे ते म्हणाले.समोरून कोण उमेदवार येईल यांची चिंंता नाही़पत्रकारानी आपण राज्याच्या दौ-यावर असतात मग जालना लोकसभा मतदार संघाकडे कसे लक्ष देणार अशी विचारणा केली असता, दानवे म्हणाले की आपण जमीनीवर पाय ठेऊन चालणारे कार्यकर्ता आहोत. त्यामुळे आपण कोठेही असलो तरी लक्ष मात्र जालना लोकसभा मतदार संघावरच असते. या मतदार संघात ६ हजार कोटीच्या रस्त्याची कामे सुरू आहेत, अनेक महत्वाचे प्रकल्प मंजुर झाले आहेत, शिवाय आपण मतदारांच्या कायम संपर्कात असतो त्यामुळे समोरून कोण उमेदवार येईल यांची आपल्याचा चिंंता नाही, या मतदार संघातील ८० टक्के निवडणुकीचे काम पूर्णत्वाकडे आल्याचे दानवे यांनी सांगितले़

टॅग्स :Raosaheb Danweरावसाहेब दानवेElectionनिवडणूक