शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

बियाणे उत्पादक कंपन्यांचा दगा; मोजक्याच शेतकऱ्यांना बोगस बियाणांची भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 19:23 IST

आजवर जिल्ह्यातील बोटावर मोजण्या इतपतच शेतकऱ्यांना निकृष्ट बियाणांची भरपाई मिळालेली आहे.  

ठळक मुद्देयंदा जिल्ह्यात १ लाख ४१ हजार ६१७ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. माहितीच्या अभावीपोटी केवळ २ हजार ७४० शेतकऱ्यांची तक्रार

जालना : मागील काही वर्षात यंदा प्रथमच जून महिन्याच्या प्रारंभी निसर्ग शेतकऱ्यांवर मेहरबान झाला होता. परंतु, बियाणे उत्पादक कंपन्यांनी सोयाबीनचे निकृष्ट बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्याने जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागलेली आहे. दुबार पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा आदेश कृषी विभागाने काढला होता. परंतु, आजवर जिल्ह्यातील बोटावर मोजण्या इतपतच शेतकऱ्यांना निकृष्ट बियाणांची भरपाई मिळालेली आहे.  

यंदा जिल्ह्यात १ लाख ४१ हजार ६१७ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. यात हजारो शेतकऱ्यांनी घेतलेले सोयाबीनचे बियाणे निकृष्ट निघाल्याने त्याची उगवण क्षमता चांगली झाली नाही. माहितीच्या अभावीपोटी केवळ २ हजार ७४० शेतकऱ्यांनी बियाणांची उगवण झाली नसल्याची तक्रार केली होती. यात आजवर महाबीजच्या वतीने ७८ शेतकऱ्यांना ४ लाख १५ हजार १४० रूपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. तर काही खासगी कंपन्यांनी ५८ बियाणांच्या बॅगांचे वाटप करून ८७ शेतकऱ्यांना ३ लाख २५ हजार ६१० रूपयांची भरपाई दिली आहे. तर काही प्रकरणे प्रक्रीयेमध्ये असून, तेही लवकरच निकाली निघतील, अशी माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. 

या बियाणांसंदर्भात तक्रारी दाखलयंदा जिल्ह्यात कापसाची लागवड ३ लाख ८ हजार २६८ हेक्टरवर झाली होती. तर मका ४२ हजार १७३ तर सोयाबीनचा पेरा १ लाख ४१ हजार ६१७ हेक्टरवर झाला होता. परंतु, अनेक ठिकाणी सोयाबीनचे बियाणे निकृष्ट दर्जाचे निघाले होते. याबाबत २ हजार ७४० शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. 

बियाणे कंपन्यांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल सोयाबीनचे बोगस बियाणे विकल्याचा ठपका ठेवत आजवर जिल्ह्यात १५ कंपन्यांवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात सालासर कृषी ग्रोअर कंपनी, पिपलीयामंडी (म.प्र), पतंजली बायो रिसर्च, उत्तराखंड, अंकुर सिडस् प्रा.लि., यशोदा हायब्रीड सिडस् प्रा.लि. वर्धा, इगल सिडस ॲण्ड बायोटेक लि. इंदौर, ग्रीन गोल्ड सिडस् कंपनी औरंगाबाद, दिव्य क्रांती सिडस् कंपनी जालना, हरित क्रांती सिडस् कंपनी देऊळगाव राजा, मे. ओस्वी सिडस् इंदाैर, म. प्र, सागर ॲग्रो इनपूट जगदेवगंज, आलोटे, रतमाल म.प्र. आदी कंपन्यांचा समावेश आहे. 

सोयाबीनच्या बोगस बियाणांसदर्भात अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या होत्या. यातील काही शेतकऱ्यांना महाबिजच्या वतीने नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे. तर काही शेतकऱ्यांनी दिलेल्या पावतीवरील लॉट नंबर मॅच होत नाही. त्यामुळे बियाणांची भरपाई देण्यास विलंब लागत आहे. तसेच अनेक कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून, सदरील प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. - बी. आर. शिंदे, कृषी अधिकारी 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र