शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
2
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
3
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
4
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
5
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
6
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
7
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
8
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
9
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
10
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
11
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
12
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
13
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
14
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
15
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
16
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
17
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
18
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
19
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
20
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )

बियाणे उत्पादक कंपन्यांचा दगा; मोजक्याच शेतकऱ्यांना बोगस बियाणांची भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 19:23 IST

आजवर जिल्ह्यातील बोटावर मोजण्या इतपतच शेतकऱ्यांना निकृष्ट बियाणांची भरपाई मिळालेली आहे.  

ठळक मुद्देयंदा जिल्ह्यात १ लाख ४१ हजार ६१७ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. माहितीच्या अभावीपोटी केवळ २ हजार ७४० शेतकऱ्यांची तक्रार

जालना : मागील काही वर्षात यंदा प्रथमच जून महिन्याच्या प्रारंभी निसर्ग शेतकऱ्यांवर मेहरबान झाला होता. परंतु, बियाणे उत्पादक कंपन्यांनी सोयाबीनचे निकृष्ट बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्याने जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागलेली आहे. दुबार पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा आदेश कृषी विभागाने काढला होता. परंतु, आजवर जिल्ह्यातील बोटावर मोजण्या इतपतच शेतकऱ्यांना निकृष्ट बियाणांची भरपाई मिळालेली आहे.  

यंदा जिल्ह्यात १ लाख ४१ हजार ६१७ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. यात हजारो शेतकऱ्यांनी घेतलेले सोयाबीनचे बियाणे निकृष्ट निघाल्याने त्याची उगवण क्षमता चांगली झाली नाही. माहितीच्या अभावीपोटी केवळ २ हजार ७४० शेतकऱ्यांनी बियाणांची उगवण झाली नसल्याची तक्रार केली होती. यात आजवर महाबीजच्या वतीने ७८ शेतकऱ्यांना ४ लाख १५ हजार १४० रूपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. तर काही खासगी कंपन्यांनी ५८ बियाणांच्या बॅगांचे वाटप करून ८७ शेतकऱ्यांना ३ लाख २५ हजार ६१० रूपयांची भरपाई दिली आहे. तर काही प्रकरणे प्रक्रीयेमध्ये असून, तेही लवकरच निकाली निघतील, अशी माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. 

या बियाणांसंदर्भात तक्रारी दाखलयंदा जिल्ह्यात कापसाची लागवड ३ लाख ८ हजार २६८ हेक्टरवर झाली होती. तर मका ४२ हजार १७३ तर सोयाबीनचा पेरा १ लाख ४१ हजार ६१७ हेक्टरवर झाला होता. परंतु, अनेक ठिकाणी सोयाबीनचे बियाणे निकृष्ट दर्जाचे निघाले होते. याबाबत २ हजार ७४० शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. 

बियाणे कंपन्यांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल सोयाबीनचे बोगस बियाणे विकल्याचा ठपका ठेवत आजवर जिल्ह्यात १५ कंपन्यांवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात सालासर कृषी ग्रोअर कंपनी, पिपलीयामंडी (म.प्र), पतंजली बायो रिसर्च, उत्तराखंड, अंकुर सिडस् प्रा.लि., यशोदा हायब्रीड सिडस् प्रा.लि. वर्धा, इगल सिडस ॲण्ड बायोटेक लि. इंदौर, ग्रीन गोल्ड सिडस् कंपनी औरंगाबाद, दिव्य क्रांती सिडस् कंपनी जालना, हरित क्रांती सिडस् कंपनी देऊळगाव राजा, मे. ओस्वी सिडस् इंदाैर, म. प्र, सागर ॲग्रो इनपूट जगदेवगंज, आलोटे, रतमाल म.प्र. आदी कंपन्यांचा समावेश आहे. 

सोयाबीनच्या बोगस बियाणांसदर्भात अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या होत्या. यातील काही शेतकऱ्यांना महाबिजच्या वतीने नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे. तर काही शेतकऱ्यांनी दिलेल्या पावतीवरील लॉट नंबर मॅच होत नाही. त्यामुळे बियाणांची भरपाई देण्यास विलंब लागत आहे. तसेच अनेक कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून, सदरील प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. - बी. आर. शिंदे, कृषी अधिकारी 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र