शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

"मराठा समाजास मदत न करता आमदार बनू, या आविर्भावात राहू नका"; मनोज जरांगेंचा इशारा

By शिवाजी कदम | Updated: July 13, 2024 16:36 IST

''मी सरकारला सावध करतोय, आरक्षणाबाबत निर्णय न घेतल्यास...''; मनोज जरांगेंचा इशारा

जालना: मराठा समाजास मदत न करता आपण आमदार राहू, अशा आविर्भावात कोणीही राहू नये, राज्यातले २८८ आमदार पाडण्याची ताकद मराठा समाजात आहे. शनिवारी सकाळी  छत्रपती संभाजीनगर येथे शांतता रॅलीस निघण्यापूर्वी त्यानी जालना येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

विरोधकांनी सरकारने बोलावलेल्या बैठकीला जायलाच हवे होते. पण ते गेले नाही. म्हणून तुम्ही ते कारण आम्हाला सांगणार का? तुम्ही सरकार आहात. विरोधक नाही आले तरी तुम्ही सांगितले पाहिजे, त्यांचे कारण सांगून तुम्हाला द्यायचे आहे नाही का? तुम्ही का रोष अंगावर घेत आहात. सरकारला मराठ्यांचा रोष परवडणार नाही. मी सरकारला सावध करतोय, आरक्षणाबाबत निर्णय न घेतल्यास २८८ उमेदवार पाडण्याची ताकद मराठा समाजात असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. सध्याच्या राज्य सरकारला मराठ्यांच्या आमदारांनीच सत्तेवर बसवले आहे. विधान परिषद निवडणुकीत जे आमदार निवडून आले आहेत. त्यांना मराठ्यांनी आमदार केले आहे. यामुळेच समाजावर अन्याय झाला तर, ज्यांना निवडून दिले ते पुन्हा निवडून येणार नाहीत. ज्यांनी या आमदारांना मतदान केलं त्यांची जबाबदारी आहे आता जातीयवाद होऊ नये. अशी अपेक्षा मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली.

सध्या लबाड सरकार सत्तेवर बसले आहे. कुणबी नोंदी शोधण्याचे काम थंडावले आहे. ज्यांना प्रमाणपत्र मिळाले आहे त्यांना व्हॅलिडिटी प्रमाणपत्र मिळण्यासाठी अडचणी येत आहे. यामुळेच अभ्यासक्रमास  निश्चित झाले तरी व्हॅलिडिटी प्रमाणपत्र मिळत नसल्याने दिसत आहे. मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे.असे मनोज जरांगे यांनी सांगितले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना