शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

"मराठा समाजास मदत न करता आमदार बनू, या आविर्भावात राहू नका"; मनोज जरांगेंचा इशारा

By शिवाजी कदम | Updated: July 13, 2024 16:36 IST

''मी सरकारला सावध करतोय, आरक्षणाबाबत निर्णय न घेतल्यास...''; मनोज जरांगेंचा इशारा

जालना: मराठा समाजास मदत न करता आपण आमदार राहू, अशा आविर्भावात कोणीही राहू नये, राज्यातले २८८ आमदार पाडण्याची ताकद मराठा समाजात आहे. शनिवारी सकाळी  छत्रपती संभाजीनगर येथे शांतता रॅलीस निघण्यापूर्वी त्यानी जालना येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

विरोधकांनी सरकारने बोलावलेल्या बैठकीला जायलाच हवे होते. पण ते गेले नाही. म्हणून तुम्ही ते कारण आम्हाला सांगणार का? तुम्ही सरकार आहात. विरोधक नाही आले तरी तुम्ही सांगितले पाहिजे, त्यांचे कारण सांगून तुम्हाला द्यायचे आहे नाही का? तुम्ही का रोष अंगावर घेत आहात. सरकारला मराठ्यांचा रोष परवडणार नाही. मी सरकारला सावध करतोय, आरक्षणाबाबत निर्णय न घेतल्यास २८८ उमेदवार पाडण्याची ताकद मराठा समाजात असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. सध्याच्या राज्य सरकारला मराठ्यांच्या आमदारांनीच सत्तेवर बसवले आहे. विधान परिषद निवडणुकीत जे आमदार निवडून आले आहेत. त्यांना मराठ्यांनी आमदार केले आहे. यामुळेच समाजावर अन्याय झाला तर, ज्यांना निवडून दिले ते पुन्हा निवडून येणार नाहीत. ज्यांनी या आमदारांना मतदान केलं त्यांची जबाबदारी आहे आता जातीयवाद होऊ नये. अशी अपेक्षा मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली.

सध्या लबाड सरकार सत्तेवर बसले आहे. कुणबी नोंदी शोधण्याचे काम थंडावले आहे. ज्यांना प्रमाणपत्र मिळाले आहे त्यांना व्हॅलिडिटी प्रमाणपत्र मिळण्यासाठी अडचणी येत आहे. यामुळेच अभ्यासक्रमास  निश्चित झाले तरी व्हॅलिडिटी प्रमाणपत्र मिळत नसल्याने दिसत आहे. मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे.असे मनोज जरांगे यांनी सांगितले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना