शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
7
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
8
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
9
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
10
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
11
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
13
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
14
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
15
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
16
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
17
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
18
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
19
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

"मराठा समाजास मदत न करता आमदार बनू, या आविर्भावात राहू नका"; मनोज जरांगेंचा इशारा

By शिवाजी कदम | Updated: July 13, 2024 16:36 IST

''मी सरकारला सावध करतोय, आरक्षणाबाबत निर्णय न घेतल्यास...''; मनोज जरांगेंचा इशारा

जालना: मराठा समाजास मदत न करता आपण आमदार राहू, अशा आविर्भावात कोणीही राहू नये, राज्यातले २८८ आमदार पाडण्याची ताकद मराठा समाजात आहे. शनिवारी सकाळी  छत्रपती संभाजीनगर येथे शांतता रॅलीस निघण्यापूर्वी त्यानी जालना येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

विरोधकांनी सरकारने बोलावलेल्या बैठकीला जायलाच हवे होते. पण ते गेले नाही. म्हणून तुम्ही ते कारण आम्हाला सांगणार का? तुम्ही सरकार आहात. विरोधक नाही आले तरी तुम्ही सांगितले पाहिजे, त्यांचे कारण सांगून तुम्हाला द्यायचे आहे नाही का? तुम्ही का रोष अंगावर घेत आहात. सरकारला मराठ्यांचा रोष परवडणार नाही. मी सरकारला सावध करतोय, आरक्षणाबाबत निर्णय न घेतल्यास २८८ उमेदवार पाडण्याची ताकद मराठा समाजात असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. सध्याच्या राज्य सरकारला मराठ्यांच्या आमदारांनीच सत्तेवर बसवले आहे. विधान परिषद निवडणुकीत जे आमदार निवडून आले आहेत. त्यांना मराठ्यांनी आमदार केले आहे. यामुळेच समाजावर अन्याय झाला तर, ज्यांना निवडून दिले ते पुन्हा निवडून येणार नाहीत. ज्यांनी या आमदारांना मतदान केलं त्यांची जबाबदारी आहे आता जातीयवाद होऊ नये. अशी अपेक्षा मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली.

सध्या लबाड सरकार सत्तेवर बसले आहे. कुणबी नोंदी शोधण्याचे काम थंडावले आहे. ज्यांना प्रमाणपत्र मिळाले आहे त्यांना व्हॅलिडिटी प्रमाणपत्र मिळण्यासाठी अडचणी येत आहे. यामुळेच अभ्यासक्रमास  निश्चित झाले तरी व्हॅलिडिटी प्रमाणपत्र मिळत नसल्याने दिसत आहे. मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे.असे मनोज जरांगे यांनी सांगितले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना