शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
7
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
8
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
9
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
10
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
11
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
12
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
13
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
14
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
15
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
16
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
17
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
18
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
19
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
20
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार

औरंगाबादेत पानतावणे संशोधन केंद्र स्थापन व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:59 IST

येथे दोन दिवस सुरू असलेल्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाची रविवारी रात्री सांगता झाली. यात एकूण १० ठराव मंजूर करण्यात आले.

ठळक मुद्देसाहित्य संमेलनात ठरावअस्मितादर्श साहित्य संमेलनाची सांगता

लोकमत न्यूज नेटवर्कजालना (पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे साहित्यनगरी) : येथे दोन दिवस सुरू असलेल्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाची रविवारी रात्री सांगता झाली. यात एकूण १० ठराव मंजूर करण्यात आले. त्यात प्रामुख्याने औरंगाबाद येथे पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे संशोधन केंद्र स्थापन करण्याच्या ठरावाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात संमती देऊन स्वागत केले.मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात ३५ वे अस्मितादर्श साहित्य संमेलन पार पडले. समारोप कार्यक्रमास आ. राजेश टोपे, स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवी तूपकर, प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर, सुधाकर गायकवाड, संमेलनाचे अध्यक्ष डी.बी. जगत्पुरीया, स्वागताध्यक्ष डॉ. संजय लाखे पाटील, निवेदीता पानतावने, राम गायकवाड, प्रा. विजय कुमठेकर यांच्यासह संयोजन समितीचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी राजेश टोपे, रवी तूपकर तसेच लुलेकर आणि गायकवाड यांनी मार्गदर्शन करून अस्मितादर्श साहित्य संमेलनातून समाजाला एक नवीन दिशा मिळते. साहित्यातून समाजाचे खरे प्रतिबिंब चित्रित होते असे सांगण्यात आले. या संमेलनात विविध ठराव संमत करण्यात आले आहे.या ठरावाचे वाचन साहित्य संमेलनाचे सचिव राम गायकवाड यांनी केले.या ठरावांमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र शासनातर्फे पद्मश्री डॉ.गंगाधर पानतावणे साहित्य संशोधन केंद्राची स्थापना औरंगाबादेत व्हावी, भारतीय संविधानाचा समावेश शालेय ते उच्च शिक्षणापर्यंतच्या अभ्यासक्रमात करण्यात व्हावा, अस्मितादर्श साहित्य संमेलनास शासकीय अनुदान देण्यात यावे, अजिंठा लेणी परिसरात होवू घातलेल्या पाली विद्यापीठाची स्थापना तातडीने करण्यात यावी, महाराष्ट्र लोकसेवा आयोग व यूपीएससीच्या परीक्षा अभ्यासक्रमामध्ये पाली भाषेचा पुनश्च समावेश करावा, समतेची शिकवण देणाऱ्या बौद्ध संस्कृती व साहित्याचे सांस्कृतिक वारसा म्हणून संवर्धन व जतन शासनाने करावे, प्रसारमाध्यमे, साहित्यिक, पत्रकार, अल्पसंख्यांक, महिला, विचारवंत यांच्यावर होणारे हल्ले आणि अत्याचाराचा निषेध यावेळी करण्यात आला. संविधानाचा अपमान करणा-या प्रवृत्ती व संघटनांचा यावेळी निषेध नोंदविला. मराठवाडा हा कायमस्वरूपी दुष्काळवाडा बनत चालला आहे. तरी शासनाने दुष्काळ निवारणार्थ कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात, मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळावे यावरही चर्चा करण्यात येऊन ठराव मंजूर करण्यात आला.ग्रंथ विक्रीला चांगला प्रतिसादएकीकडे वाचन संस्कृती लोप पावत असल्याचे बोलले जात आहे. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आणि लॅपटॉप दिसत आहे. अशाही स्थितीत जालना येथे दोन दिवस अस्मितादर्श साहित्यसंमेलनलनानिमित्त वेगवेगळ्या प्रकाशकांचे गं्रथ विक्रीची दालने उभारली होती. या दालनांमध्ये नागरिकांनी उत्फूर्त प्रतिसाद दिला.

टॅग्स :literatureसाहित्यAsmitadarsh Sahitya Sammelanअस्मितादर्श साहित्य संमेलन