शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
3
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
4
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
5
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
6
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
7
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
8
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
9
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
10
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
11
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
12
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
13
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
14
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
15
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
16
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
17
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
18
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
19
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
20
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! जमिनीचा पोत खालावतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 00:09 IST

‘धरणी माता तुम्हाला घालती साद, आरोग्य तिचे रक्षुनिया द्या तिला प्रतिसाद’, असे शेतकºयांना सांगण्याची वेळ आता कृषी विभागावर आली आहे. रासायनिक खतांचा असंतुलित वापर, जमीन सतत पिकांखाली राहणे, पाण्याचा अयोग्य वापर यामुळे जिल्ह्यातील जमिनीचा पोत खालावत चालला आहे.

ठळक मुद्देजागतिक मृदा दिन विशेष : सेंद्रीय घटकांचा वापर करण्याचा सल्ला, पोषक मूल्य आणि सुक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण घटले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : ‘धरणी माता तुम्हाला घालती साद, आरोग्य तिचे रक्षुनिया द्या तिला प्रतिसाद’, असे शेतकºयांना सांगण्याची वेळ आता कृषी विभागावर आली आहे. रासायनिक खतांचा असंतुलित वापर, जमीन सतत पिकांखाली राहणे, पाण्याचा अयोग्य वापर यामुळे जिल्ह्यातील जमिनीचा पोत खालावत चालला आहे.जमिनीत पिकांसाठी पोषक मूल्य व सुक्ष्म अन्न घटकांचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी पिकांची वाढ खुंटणे, उत्पादनाच्या गुणवत्तेची घट, जमीन नापिक होणे, उत्पादनात घट येण्याच्या समस्या वाढल्या असून, ही धोक्याची घंटा असल्याचे मृद तज्ज्ञ सांगत आहेत.जालना जिल्ह्यातील जमीन मध्यम प्रकारची काळ्या मातीची आहे. ६२ टक्के जमीन ७५ टक्क्यांपेक्षा कमी खोलीची आहे. त्यामुळे पिके लवकर पाण्यावर येतात. जमिनीत पिकांसाठी आवश्यक असलेले स्फुरद, नत्र व पालाश या मुख्य अन्नद्रव्यांचे प्रमाण १-१४० किलोग्रम प्रति हेक्टर असणे आवश्यक आहे.मात्र, माती परिक्षणामध्ये जिल्ह्यातील जमिनीमध्ये या अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी आढळून आले आहे. त्याचबरोबर लोह, जस्त, मॅग्निज, तांबे, बोरॉन, सल्फर या पिकांना आवश्यक असलेल्या सुक्ष्म अन्नद्रव्यांचे जमिनीतील प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे जमिनीतील सेंद्रीय कर्बाचे प्रमाण कमी झाले असून, पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेवरही परिणाम होत आहे. मातीची धूप वाढली आहे. त्यातच माती परीक्षणाशिवाय रासायनिक खतांचा केला जाणार भरमसाठ वापर जमिनीसाठी हानिकारक ठरत आहे. शेतकºयांनी खालावलेला जमिनीचा पोत सुधारण्यासाठी शेणखत, गांडूळ खतांबरोबर सेंद्रीय खतांचा वापर वाढवावा, माती परिक्षण करून मृदा आरोग्य पत्रिकेच्या आधारे पिकांना खते द्यावीत, असा निकरीचा सल्ला मृद तज्ज्ञांकडून दिला जात आहे.दोन लाख मृदा आरोग्य पत्रिकांचे वाटप४जालना येथील खरपुडी कृषी विज्ञान केंद्रातील भूमी आरोग्य चिकित्सालय आणि कृषी विभागाच्या माध्यमातून मागील काही वर्षांमध्ये जिल्ह्यातील शेतकºयांमध्ये मृदा परीक्षणाबाबत व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. कृषी विज्ञान केंद्रामार्फत दोन लाख शेतकºयांना मृदा आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात आले आहे.४या आरोग्य पत्रिकेतील सल्ल्यानुसारच शेतकºयांना कोणत्या पिकांसाठी किती प्रमाणात खतांचा वापर करावा, याची शास्त्रशुद्ध माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे विज्ञान केंद्राचे विषय तज्ज्ञ राहुल चौधरी यांनी सांगितले.