शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

सावधान! जमिनीचा पोत खालावतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 00:09 IST

‘धरणी माता तुम्हाला घालती साद, आरोग्य तिचे रक्षुनिया द्या तिला प्रतिसाद’, असे शेतकºयांना सांगण्याची वेळ आता कृषी विभागावर आली आहे. रासायनिक खतांचा असंतुलित वापर, जमीन सतत पिकांखाली राहणे, पाण्याचा अयोग्य वापर यामुळे जिल्ह्यातील जमिनीचा पोत खालावत चालला आहे.

ठळक मुद्देजागतिक मृदा दिन विशेष : सेंद्रीय घटकांचा वापर करण्याचा सल्ला, पोषक मूल्य आणि सुक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण घटले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : ‘धरणी माता तुम्हाला घालती साद, आरोग्य तिचे रक्षुनिया द्या तिला प्रतिसाद’, असे शेतकºयांना सांगण्याची वेळ आता कृषी विभागावर आली आहे. रासायनिक खतांचा असंतुलित वापर, जमीन सतत पिकांखाली राहणे, पाण्याचा अयोग्य वापर यामुळे जिल्ह्यातील जमिनीचा पोत खालावत चालला आहे.जमिनीत पिकांसाठी पोषक मूल्य व सुक्ष्म अन्न घटकांचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी पिकांची वाढ खुंटणे, उत्पादनाच्या गुणवत्तेची घट, जमीन नापिक होणे, उत्पादनात घट येण्याच्या समस्या वाढल्या असून, ही धोक्याची घंटा असल्याचे मृद तज्ज्ञ सांगत आहेत.जालना जिल्ह्यातील जमीन मध्यम प्रकारची काळ्या मातीची आहे. ६२ टक्के जमीन ७५ टक्क्यांपेक्षा कमी खोलीची आहे. त्यामुळे पिके लवकर पाण्यावर येतात. जमिनीत पिकांसाठी आवश्यक असलेले स्फुरद, नत्र व पालाश या मुख्य अन्नद्रव्यांचे प्रमाण १-१४० किलोग्रम प्रति हेक्टर असणे आवश्यक आहे.मात्र, माती परिक्षणामध्ये जिल्ह्यातील जमिनीमध्ये या अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी आढळून आले आहे. त्याचबरोबर लोह, जस्त, मॅग्निज, तांबे, बोरॉन, सल्फर या पिकांना आवश्यक असलेल्या सुक्ष्म अन्नद्रव्यांचे जमिनीतील प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे जमिनीतील सेंद्रीय कर्बाचे प्रमाण कमी झाले असून, पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेवरही परिणाम होत आहे. मातीची धूप वाढली आहे. त्यातच माती परीक्षणाशिवाय रासायनिक खतांचा केला जाणार भरमसाठ वापर जमिनीसाठी हानिकारक ठरत आहे. शेतकºयांनी खालावलेला जमिनीचा पोत सुधारण्यासाठी शेणखत, गांडूळ खतांबरोबर सेंद्रीय खतांचा वापर वाढवावा, माती परिक्षण करून मृदा आरोग्य पत्रिकेच्या आधारे पिकांना खते द्यावीत, असा निकरीचा सल्ला मृद तज्ज्ञांकडून दिला जात आहे.दोन लाख मृदा आरोग्य पत्रिकांचे वाटप४जालना येथील खरपुडी कृषी विज्ञान केंद्रातील भूमी आरोग्य चिकित्सालय आणि कृषी विभागाच्या माध्यमातून मागील काही वर्षांमध्ये जिल्ह्यातील शेतकºयांमध्ये मृदा परीक्षणाबाबत व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. कृषी विज्ञान केंद्रामार्फत दोन लाख शेतकºयांना मृदा आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात आले आहे.४या आरोग्य पत्रिकेतील सल्ल्यानुसारच शेतकºयांना कोणत्या पिकांसाठी किती प्रमाणात खतांचा वापर करावा, याची शास्त्रशुद्ध माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे विज्ञान केंद्राचे विषय तज्ज्ञ राहुल चौधरी यांनी सांगितले.