शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील पीडित महिलांना ‘मनोधैर्य’चा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:55 IST

जालना : अत्याचारपीडित महिला, मुलींचे पुनर्वसन करण्यासाठी शासनाकडून ‘मनोधैर्य’ योजना राबविली जात आहे. कोरोनातील पहिले दोन महिने वगळता जिल्हा ...

जालना : अत्याचारपीडित महिला, मुलींचे पुनर्वसन करण्यासाठी शासनाकडून ‘मनोधैर्य’ योजना राबविली जात आहे. कोरोनातील पहिले दोन महिने वगळता जिल्हा विधि सेवा प्राधिकरणअंतर्गत असलेल्या समितीच्या सर्वच बैठका नियमित घेण्यात आल्या असून, शासनाची ही मनोधैर्य योजना पीडित महिला, मुलींसाठी आधार ठरत आहे.

अत्याचारपीडित, ॲसिड हल्ल्यातील जखमी महिला, मुलींचे पुनर्वसन करण्यासाठी शासनस्तरावरून मनोधैर्य योजनेची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेंतर्गत दाखल अर्जानुसार पीडित महिलांच्या पुनर्वसनासाठी आर्थिक मदत केली जाते. केंद्र व राज्य शासनाच्या वतीने हा निधी दिला जातो. शासनाने या योजनेची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केल्यानंतर प्रारंभीच्या कालावधीत ही योजना महिला व बालविकास विभागाच्या वतीने राबविण्यात आली. या विभागाकडे येणाऱ्या अर्जांची छाननी करून पीडितांना शासकीय नियमानुसार मदत केली जात होती. त्यानंतर सन २०१७ पासून ही मनोधैर्य योजना जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आली आहे. गतवर्षी कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर पहिले दोन महिने बैठक झाली नाही. मात्र, नंतरच्या काळात या समितीने प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी बैठक घेऊन येणाऱ्या अर्जांची छाननी केली आहे. छाननीनंतर मंजूर अर्जांनुसार पीडितांना विधि सेवा प्राधिकरणाकडून शासकीय निधीचे वितरण करण्यात आले आहे.

...अशी होते मदत

अत्याचारपीडित, ॲसिड हल्ल्यातील जखमी, पोक्सोमधील पीडितांचे पुनर्वनन करणे गरजेचे असते. त्यामुळे शासनाकडून या पीडितांना आर्थिक मदत केली जाते. घटनेनंतर त्यांचे पुनर्वसन करणे, आरोग्याची सुविधा पुरविणे, समुपदेशन करणे याबाबीही महत्त्वाच्या असतात. त्यादृष्टीनेही शासनाने विविध स्तरांवर समित्या गठित केल्या आहेत.

पाच सदस्यीय समिती अर्जांची करते छाननी

जिल्हा विधि सेवा प्राधिकरणकडून मनोधैर्य योजनेची अंमलबजावणी केली जाते. यासाठी नियुक्त समितीत प्राधिकरणाचे अध्यक्ष, पोलीस अधीक्षक, आरोग्य विभागाचे अधिकारी, प्राधिकरणचे सदस्य सचिव व एक सामाजिक संस्थेचे अशासकीय सदस्य असतात. या समितीतील सदस्य बैठकांमध्ये अर्जांची पाहणी करून अंतिम निर्णय घेत असतात.

जिल्हा विधि सेवा प्राधिकरणच्या सदस्यांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोरोना काळातही अनेकांना घरपोच धान्य किटचे वाटप केले आहे. त्याशिवाय बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही किटचे वाटप करण्यात आले आहे. कोरोनात राज्यातील सर्वांत चांगले काम करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये जालना जिल्ह्याचाही समावेश होतो.

अत्याचारपीडित, ॲसिड हल्ल्यातील पीडितांसाठी शासनाकडून मनोधैर्य योजना राबविली जात आहे. जिल्हा विधि सेवा प्राधिकरणकडे ही योजना हस्तांतरित करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय नियुक्त समिती सदस्यांची प्रत्येक महिन्याला नियमित बैठक होत आहे. शासनाने दिलेले निर्देश व कायद्यांचे पालन करून समितीचे कामकाज सुरू आहे. त्याशिवाय जिल्हा विधि सेवा प्राधिकरणने कोरोनाच्या काळातही अनेकांना धान्य किटचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासल्याचे समिती सचिवांनी सांगितले.