शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
6
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
7
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
8
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
9
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
10
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
11
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
12
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
13
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
14
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
15
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
16
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
17
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
18
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
19
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
20
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य

बँकाचे उदासीन धोरण; कर्ज वाटपचा टक्का वाढेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 01:10 IST

गजानन वानखडे । लोकमत न्यूज नेटवर्क जालना : खरिपाचा हंगाम तोंडावर असतांना राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास तयार नाहीत. ...

ठळक मुद्देखरीप हंगाम तोंडावर : पीककर्ज वाटपात बँकांची संथगती, १० टक्केच कर्ज वाटप, गती वाढविण्याची गरज

गजानन वानखडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : खरिपाचा हंगाम तोंडावर असतांना राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास तयार नाहीत. विशेष म्हणजे खरिप आढावा बैठकीत मु्ख्यमं्त्र्यांनी बँकाना खडेबोल सुनावले होते. तरीही बँकाच्या कर्ज वितरण धोरणात बदल केला नाही. जिल्ह्यातील सर्वच बँकानी आतापर्यंत फक्त १० टक्केच पीककर्ज वाटप केले. नवीन सभासदांना बँका कर्ज देण्यास तयार नाहीत तर जिल्हा बँकेकडे कर्ज वितरणासाठी पैसेच नसल्याने पेरणी करावी कशी असा टाहो शेतकºयानी फोडला आहे.पेरणी पूर्वी पीककर्ज वाटप होणे अपेक्षीत आहे. मात्र दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकानी कर्ज वाटपाला नाममात्र प्रारंभ केला आहे. तर काही बँकानी कर्ज वितरण प्रक्रियेला सुरुवातच केली नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात सहा लाख हेक्टरवर खरिपाची लागवड करण्यात येते. जिल्ह्यात ५ लाखाच्या आसपास खातेदार आहेत. गतवर्षी १४६८ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे बँकाना दिले होते. प्रत्यक्षात बँकानी १ हजार ९७ कोटीचे वाटप केले. यावर्षी १ हजार ४०० कोटी ९१ लाख रुपयांचे उद्दिष्ट बँकाना देण्यात आले आहे.मात्र बँकाच्या मनमानीपणामुळे आता फक्त १०० कोटी रुपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले आहे. हे प्रमाण १० टक्केच आहे. विशेष म्हणजे नवीन सभासदांना कर्ज वाटप करण्यासाठी राज्य बँकाने कर्ज उपलब्ध करुन दिले नाही. राष्ट्रीयकृत बँका नवीन सभासद खातेदारांना जिल्हा बँकेकडे जाण्याचा सल्ला देत आहेत.शासनाच्या गोलमाल धोरणामुळे संभ्रमराज्य शासनाने २०१६- १७- १८ या वर्षाचे कर्ज भरण्यास मुदत वाढ देण्याची कबुली दिली होती. मात्र अद्यापही तशा सूचना जिल्ह्यातील बँकाना दिलेल्या नाहीत. येणाºया काळात निवडणुका असल्याने आपले कर्ज माफ होईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे.त्यामुळे शेतकरी कर्ज नवीन - जुने करण्यास कानाडोळा करत असल्याचे बँकेचे वरिष्ठ अधिकारी सांगत आहे.मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. शासनाच्या धोरणाचा फटका शेतकºयांसह बँकाना अडचणीचा ठरु लागला आहे. कारण आतापर्यत जिल्हात ३०० कोटी पर्यंत कर्ज वाटप होणे अपेक्षित होते. असे जिल्हा अग्रणी बँकेच्या वतीने सांगण्यात आले.

टॅग्स :JalanaजालनाBanking Sectorबँकिंग क्षेत्रCrop Loanपीक कर्ज