शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बँकाचे उदासीन धोरण; कर्ज वाटपचा टक्का वाढेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 01:10 IST

गजानन वानखडे । लोकमत न्यूज नेटवर्क जालना : खरिपाचा हंगाम तोंडावर असतांना राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास तयार नाहीत. ...

ठळक मुद्देखरीप हंगाम तोंडावर : पीककर्ज वाटपात बँकांची संथगती, १० टक्केच कर्ज वाटप, गती वाढविण्याची गरज

गजानन वानखडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : खरिपाचा हंगाम तोंडावर असतांना राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास तयार नाहीत. विशेष म्हणजे खरिप आढावा बैठकीत मु्ख्यमं्त्र्यांनी बँकाना खडेबोल सुनावले होते. तरीही बँकाच्या कर्ज वितरण धोरणात बदल केला नाही. जिल्ह्यातील सर्वच बँकानी आतापर्यंत फक्त १० टक्केच पीककर्ज वाटप केले. नवीन सभासदांना बँका कर्ज देण्यास तयार नाहीत तर जिल्हा बँकेकडे कर्ज वितरणासाठी पैसेच नसल्याने पेरणी करावी कशी असा टाहो शेतकºयानी फोडला आहे.पेरणी पूर्वी पीककर्ज वाटप होणे अपेक्षीत आहे. मात्र दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकानी कर्ज वाटपाला नाममात्र प्रारंभ केला आहे. तर काही बँकानी कर्ज वितरण प्रक्रियेला सुरुवातच केली नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात सहा लाख हेक्टरवर खरिपाची लागवड करण्यात येते. जिल्ह्यात ५ लाखाच्या आसपास खातेदार आहेत. गतवर्षी १४६८ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे बँकाना दिले होते. प्रत्यक्षात बँकानी १ हजार ९७ कोटीचे वाटप केले. यावर्षी १ हजार ४०० कोटी ९१ लाख रुपयांचे उद्दिष्ट बँकाना देण्यात आले आहे.मात्र बँकाच्या मनमानीपणामुळे आता फक्त १०० कोटी रुपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले आहे. हे प्रमाण १० टक्केच आहे. विशेष म्हणजे नवीन सभासदांना कर्ज वाटप करण्यासाठी राज्य बँकाने कर्ज उपलब्ध करुन दिले नाही. राष्ट्रीयकृत बँका नवीन सभासद खातेदारांना जिल्हा बँकेकडे जाण्याचा सल्ला देत आहेत.शासनाच्या गोलमाल धोरणामुळे संभ्रमराज्य शासनाने २०१६- १७- १८ या वर्षाचे कर्ज भरण्यास मुदत वाढ देण्याची कबुली दिली होती. मात्र अद्यापही तशा सूचना जिल्ह्यातील बँकाना दिलेल्या नाहीत. येणाºया काळात निवडणुका असल्याने आपले कर्ज माफ होईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे.त्यामुळे शेतकरी कर्ज नवीन - जुने करण्यास कानाडोळा करत असल्याचे बँकेचे वरिष्ठ अधिकारी सांगत आहे.मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. शासनाच्या धोरणाचा फटका शेतकºयांसह बँकाना अडचणीचा ठरु लागला आहे. कारण आतापर्यत जिल्हात ३०० कोटी पर्यंत कर्ज वाटप होणे अपेक्षित होते. असे जिल्हा अग्रणी बँकेच्या वतीने सांगण्यात आले.

टॅग्स :JalanaजालनाBanking Sectorबँकिंग क्षेत्रCrop Loanपीक कर्ज