शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

बेरोजगारांना कर्ज देण्यास बँका उदासिन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 00:12 IST

मराठा समाजातील सुशिक्षित बेरोजगारांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी अण्णासाहेब पाटील अर्थिक मागास महामंडळामार्फेत कर्ज देण्याचे धोरण ठरले. परंतु, वर्षभरापासून बँका उदासिन असल्याने २ हजार ७५२ लाभार्थ्यांपैकी केवळ ९० जणांची कर्जप्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मराठा समाजातीलसुशिक्षित बेरोजगारांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठीअण्णासाहेब पाटील अर्थिक मागास महामंडळामार्फेत कर्ज देण्याचे धोरण ठरले. परंतु, वर्षभरापासून बँका उदासिन असल्याने २ हजार ७५२ लाभार्थ्यांपैकी केवळ ९० जणांची कर्जप्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत.आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मराठा समाजातील बेरोजगार तरुणांना रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे, त्यांना स्वयंरोजगार करता यावा. यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळामार्फत योजना सुरु करण्यात आली आहे. बेरोजगार युवकांना रोजगार सुरु करण्यासाठी दहा लाखांपर्यंत कर्ज देण्याचे धोरण ठरविण्यात आले आहे. योजनेंतर्गत जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांकडून अर्ज मागविण्यात आले. मागील वर्षभरात जिल्ह्यातील युवकांचाही बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला. त्यानुसार आतापर्यंत महामंडळाकडे २७५२ प्रस्ताव प्राप्त झाले. महामंडळाने सर्व प्रस्ताव बँकांकडे पाठविले आहेत. त्यातील केवळ ९० प्रस्तावाला बँकांनी ‘ग्रीन सिग्नल’ दिला. उर्वरित अनेक प्रस्ताव बँकामध्ये पडून आहेत. शासनाने चांगल्या हेतूने सुरु केलेली योजना बँकांच्या उदासिन धोरणामुळे फोल ठरत असल्याचे दिसून येत आहे. मराठा समाजातील अनेक युवक व्यवसाय करुन स्वत:च्या पायावर उभे होण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु, कर्ज वाटपात बँका उदासिन असल्याने या ठिकाणी तरुणांच्या हाती निराशाच आली आहे. नोक-या नसल्याने व्यवसाय करुन कुटुंबाचा गाडा चालविण्याची तयारी तरुणांची आहे. बँकांचे कर्ज वाटपाचे धोरण तसेच कीचकट नियमामुळे अनेकजण‘वेटिंगवर’ आहे. मराठा युवकांसाठी योजना शासनाने जाहीर केली मात्र, अंमलबजावणी कासवगतीने होत असल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे.युवकांची पाठ : योजनेचे स्वरुपअण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यामातून व्यवसायासाठी बँकेमार्फेत कर्ज उपलब्ध करुन दिले जाते. त्यात कृषी संलग्न व पारंपरिक उपक्रम, लघु व मध्यम उद्योग, व्यापार, विक्री आदी व्यवसायासाठी एक ते दहा लाखांपर्यंत कर्जांची सुविधा महामंडळाने उपलब्ध करुन दिली आहे. पाच वर्षांच्या परतफेडीच्या अटीवर १२ टक्के दराने कर्जपुरवठा केला जातो. बँकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने युवकांनी याकडे पाठ फिरवली आहे.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रgovernment schemeसरकारी योजना