शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

बेरोजगारांना कर्ज देण्यास बँका उदासिन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 00:12 IST

मराठा समाजातील सुशिक्षित बेरोजगारांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी अण्णासाहेब पाटील अर्थिक मागास महामंडळामार्फेत कर्ज देण्याचे धोरण ठरले. परंतु, वर्षभरापासून बँका उदासिन असल्याने २ हजार ७५२ लाभार्थ्यांपैकी केवळ ९० जणांची कर्जप्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मराठा समाजातीलसुशिक्षित बेरोजगारांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठीअण्णासाहेब पाटील अर्थिक मागास महामंडळामार्फेत कर्ज देण्याचे धोरण ठरले. परंतु, वर्षभरापासून बँका उदासिन असल्याने २ हजार ७५२ लाभार्थ्यांपैकी केवळ ९० जणांची कर्जप्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत.आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मराठा समाजातील बेरोजगार तरुणांना रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे, त्यांना स्वयंरोजगार करता यावा. यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळामार्फत योजना सुरु करण्यात आली आहे. बेरोजगार युवकांना रोजगार सुरु करण्यासाठी दहा लाखांपर्यंत कर्ज देण्याचे धोरण ठरविण्यात आले आहे. योजनेंतर्गत जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांकडून अर्ज मागविण्यात आले. मागील वर्षभरात जिल्ह्यातील युवकांचाही बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला. त्यानुसार आतापर्यंत महामंडळाकडे २७५२ प्रस्ताव प्राप्त झाले. महामंडळाने सर्व प्रस्ताव बँकांकडे पाठविले आहेत. त्यातील केवळ ९० प्रस्तावाला बँकांनी ‘ग्रीन सिग्नल’ दिला. उर्वरित अनेक प्रस्ताव बँकामध्ये पडून आहेत. शासनाने चांगल्या हेतूने सुरु केलेली योजना बँकांच्या उदासिन धोरणामुळे फोल ठरत असल्याचे दिसून येत आहे. मराठा समाजातील अनेक युवक व्यवसाय करुन स्वत:च्या पायावर उभे होण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु, कर्ज वाटपात बँका उदासिन असल्याने या ठिकाणी तरुणांच्या हाती निराशाच आली आहे. नोक-या नसल्याने व्यवसाय करुन कुटुंबाचा गाडा चालविण्याची तयारी तरुणांची आहे. बँकांचे कर्ज वाटपाचे धोरण तसेच कीचकट नियमामुळे अनेकजण‘वेटिंगवर’ आहे. मराठा युवकांसाठी योजना शासनाने जाहीर केली मात्र, अंमलबजावणी कासवगतीने होत असल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे.युवकांची पाठ : योजनेचे स्वरुपअण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यामातून व्यवसायासाठी बँकेमार्फेत कर्ज उपलब्ध करुन दिले जाते. त्यात कृषी संलग्न व पारंपरिक उपक्रम, लघु व मध्यम उद्योग, व्यापार, विक्री आदी व्यवसायासाठी एक ते दहा लाखांपर्यंत कर्जांची सुविधा महामंडळाने उपलब्ध करुन दिली आहे. पाच वर्षांच्या परतफेडीच्या अटीवर १२ टक्के दराने कर्जपुरवठा केला जातो. बँकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने युवकांनी याकडे पाठ फिरवली आहे.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रgovernment schemeसरकारी योजना