शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

गोळ्या झाडण्याचे आदेश देणाऱ्या नेत्यांना मराठवाडा बंदी करा, राज ठाकरेंचे आवाहन

By विजय मुंडे  | Updated: September 4, 2023 11:51 IST

''गेंड्याची कातडी पांघरलेल्या राजकारण्यांसाठी जीव गमवू नका''

जालना : तुम्ही पोलिसांना दोष देवू नका. त्यांना आदेश कोणी दिले त्यांना दोष द्या. ज्यांनी लाठीमार केला त्यांना मराठवाडा बंदी करा. माफी मागत नाहीत तोपर्यंत इकडे फिरकू देवू नका. मराठा आरक्षणासाठी आपण मुख्यमंत्र्यांसह तज्ज्ञांशी बोलू. प्रश्न सुटण्यासारखा असेल तर नक्की त्यासाठी प्रयत्न करू. गेंड्याची कातडी असलेल्या या लोकांसाठी जीव गमवू नका, असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.

अंतरवाली सराटी येथील उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्याशी सोमवारी सकाळी राज ठाकरे यांनी संवाद साधून माहिती घेतली. त्यानंतर उपोषणस्थळी उपस्थित नागरिकांसामोर ठाकरे बोलत होते. ज्या ज्या वेळी मी काही गोष्टी सांगितल्या त्या त्या वेळी त्या तुमच्यापर्यंत चुकीच्या पोहोचविण्यात आल्या. मोर्चे निघत होते तेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही असे सांगितलं होते. ते सगळे राजकारणी तुमचा वापर करून घेतील, मते घेतील दुर्लक्ष करतील असे सांगितले. सुप्रिम कोर्टाने आरक्षणाबाबत निकाल दिला आहे. विरोधात असले की मोर्चे काढायचे आणि सत्तेत गेले की गोळीबार करायचा, लाठ्या मारायच्या. तुम्ही पोलिसांना दोष देवू नका. पोलिसांना कोणी आदेश कोणी दिले त्यांना दोष द्या. पोलिस काय करणार ते तुमच्या आमच्यातले आहेत. जे वरून सांगितले ती गोष्ट करावी लागणार. त्यामुळे तुमच्यावर ज्या लोकांनी लाठ्या बरसावल्या, गोळीबार केला. त्यांना मराठवाडा बंदी करा. जोपर्यंत ते माफी मागत नाहीत तोपर्यंत इकडे पाऊल टाकू देवू नका. असे आवाहनही ठाकरे यांनी केले. 

मुख्यमंत्र्यांची भेट घेणार मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी मी मुख्यमंत्री आणि तज्ज्ञांशी बोलतो. प्रश्न सुटण्यासारखा असेल तर नक्की सोडविला जाईल. तुम्ही गेंड्यांच्या कातडीच्या लोकांसाठी आपला जीव गमावू नका. एकजण मेला तर त्यांना फरक पडत नाही. पण जीव आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. निवडणूक येतील तेव्हा अशा काही गोष्टी समोर आणतील. तेव्हा काठीचे पाठीवरील वळ लक्षात ठेवा, असे आवाहनही ठाकरे यांनी केले. यावेळी अमित ठाकरे यांची उपस्थिती होती.

फडणवीस यांच्यावर हल्लाबोलमाता-भगिनींवर झालेला लाठीमार पाहून मी येथे आलो आहे. मला राजकारण करायचे नाही. परंतु, देवेंद्र फडणवीस राजकारण करू नये म्हणतात. तुम्ही विरोधी पक्षात असते तर काय केले असते असा सवाल करीत देवेंद्र फडणवीस यांच्यावरही ठाकरे यांनी हल्लाबोल केला.

गडकिल्ले महाराजांचे स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा समुद्रात उभा करायचा म्हणत त्यांनी मते मागितली. समुद्रात जावून फुलं टाकली. तेव्हापासून सांगतोय हा पुतळा होवू शकत नाही. समुद्रात पुतळा उभा करणे अशक्य गोष्ट आहे. महाराजांचे स्मारक हे आपले गडकिल्ले आहेत. त्यांना टिकवा. आपला राजा कसा होवून गेला ते पुढच्या पिढ्याला दाखिवले पाहिजे. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेJalanaजालनाMaratha Reservationमराठा आरक्षण