शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

वातावरणातील बदलांमुळे बळिराजा चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:32 IST

विष्णू वाकडे जालना : तालुक्यात खरीप हंगामात ८७ हजार ११९ हेक्टरवर खरिपाचा पेरा झाला आहे. परंतु, वातावरणातील बदलाचा फटका ...

विष्णू वाकडे

जालना : तालुक्यात खरीप हंगामात ८७ हजार ११९ हेक्टरवर खरिपाचा पेरा झाला आहे. परंतु, वातावरणातील बदलाचा फटका कापूस, सोयाबीनसह इतर पिकांना बसू लागला आहे. औषधांची फवारणी करूनही रोगराई आटोक्यात येत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

जालना तालुक्यामध्ये कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार सरासरी ८८ हजार ४७७ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी अपेक्षित होती. जून महिन्याच्या सुरुवातीलाच सर्वत्र दमदार पाऊस झाल्याने तालुक्यामध्ये ८७ हजार ११९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. बाजरी, मका, खरीप ज्वारीचे उद्दिष्ट पूर्ण झाले नसले तरी ३१४० हेक्टरवर पेरणी झाली. तूर, मूग, उडीद या पिकाची सरासरीच्या तुलनेत ५० टक्क्यांच्यावर १६ हजार ९८१ हेक्टरवर पेरणी झाली. तुरीच्या क्षेत्रांमध्ये सरासरीच्या तुलनेत ४ हजार ३५३ हेक्टर पेरा झाला, तर मुगाच्या पेरणीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. मुगाचे सरासरी क्षेत्र १६ हजार २८५ हेक्टर असताना अवघ्या २ हजार ८०४ हेक्टरवर मुगाची पेरणी झाली. एकूण गळीत धान्याचा विचार केला तर १६ हजार ४२२ हेक्टर सरासरी क्षेत्र पेरणीचे निश्चित असताना तब्बल ३४ हजार ५२७ हेक्टरवर पेरणी झाली. यामध्ये सोयाबीनचे १६ हजार १९१ सरासरी पेरणी क्षेत्र दुपटीने वाढून ३४ हजार ६५ हेक्टर झाले. सरासरीच्या तुलनेत हे क्षेत्र १७ हजार ८७८४ हेक्टरने वाढले. मागील काही वर्षांचा अनुभव पाहता यावर्षी खरीप हंगामात चांगले उत्पन्न मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु, बदलत्या वातावरणाचा पिकांना फटका बसू लागला आहे. कापूस पिकांनी माना टाकल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. काढणीस आलेल्या मुगाचे नुकसान होत आहे. शिवाय सोयाबीनच्या पिकातही पाणी साचल्याने या ठिकाणी सोयाबीनचे नुकसान होत आहे.

कोट

गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून पशुधनाच्या बळावर, तसेच सध्या आधुनिक यंत्राच्या साह्याने आपण शेती करीत आहोत. शेती व्यवसायामध्ये अनेक संकटे असतात. जोपर्यंत शेतातील माल घरात येत नाही तोपर्यंत काहीच खात्री नसते.

विनायकराव आटोळे, हातवन

गतवर्षीचा अनुभव वाईट आहे. गतवर्षी काढणीस आलेल्या मुगाला जागेवरच कोंब फुटले होते. कापसाचे बोंडेसुद्धा सडले होते. निसर्गाच्या भरवशावर असणारा शेती व्यवसाय असून, हातातोंडाशी आलेले कधी हिरावून घेईल सांगता येत नाही. त्यामुळे पीक हातात आल्याशिवाय समाधान नाहीच.

प्रल्हादराव गायकवाड, खणेपुरी

मी आधुनिक पद्धतीने शेती कसतो. परंतु, तरीही फळपिके असो अथवा खरिपातील पिके असोत अनेकदा केलेला खर्चही वसूल होत नाही. गतवर्षी पाईपलाईनवर झालेला खर्चसुद्धा निघाला नाही. विविध संकटांमुळे शेती व्यवसाय अनिश्चित स्वरुपाचा बनत चालला आहे.

संदीप घारे, साळेगाव