शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
2
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
3
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
4
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
5
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
6
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
7
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
8
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
9
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
10
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
11
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
12
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
14
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
15
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
16
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
17
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
18
मर्मबंध! आईच्या दुधाचा स्वाद, ब्रेस्ट मिल्क फ्लेव्हर्ड आईस्क्रीमची तुफान चर्चा, पण हे आहे तरी काय?
19
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
20
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी

वातावरणातील बदलांमुळे बळिराजा चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:32 IST

विष्णू वाकडे जालना : तालुक्यात खरीप हंगामात ८७ हजार ११९ हेक्टरवर खरिपाचा पेरा झाला आहे. परंतु, वातावरणातील बदलाचा फटका ...

विष्णू वाकडे

जालना : तालुक्यात खरीप हंगामात ८७ हजार ११९ हेक्टरवर खरिपाचा पेरा झाला आहे. परंतु, वातावरणातील बदलाचा फटका कापूस, सोयाबीनसह इतर पिकांना बसू लागला आहे. औषधांची फवारणी करूनही रोगराई आटोक्यात येत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

जालना तालुक्यामध्ये कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार सरासरी ८८ हजार ४७७ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी अपेक्षित होती. जून महिन्याच्या सुरुवातीलाच सर्वत्र दमदार पाऊस झाल्याने तालुक्यामध्ये ८७ हजार ११९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. बाजरी, मका, खरीप ज्वारीचे उद्दिष्ट पूर्ण झाले नसले तरी ३१४० हेक्टरवर पेरणी झाली. तूर, मूग, उडीद या पिकाची सरासरीच्या तुलनेत ५० टक्क्यांच्यावर १६ हजार ९८१ हेक्टरवर पेरणी झाली. तुरीच्या क्षेत्रांमध्ये सरासरीच्या तुलनेत ४ हजार ३५३ हेक्टर पेरा झाला, तर मुगाच्या पेरणीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. मुगाचे सरासरी क्षेत्र १६ हजार २८५ हेक्टर असताना अवघ्या २ हजार ८०४ हेक्टरवर मुगाची पेरणी झाली. एकूण गळीत धान्याचा विचार केला तर १६ हजार ४२२ हेक्टर सरासरी क्षेत्र पेरणीचे निश्चित असताना तब्बल ३४ हजार ५२७ हेक्टरवर पेरणी झाली. यामध्ये सोयाबीनचे १६ हजार १९१ सरासरी पेरणी क्षेत्र दुपटीने वाढून ३४ हजार ६५ हेक्टर झाले. सरासरीच्या तुलनेत हे क्षेत्र १७ हजार ८७८४ हेक्टरने वाढले. मागील काही वर्षांचा अनुभव पाहता यावर्षी खरीप हंगामात चांगले उत्पन्न मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु, बदलत्या वातावरणाचा पिकांना फटका बसू लागला आहे. कापूस पिकांनी माना टाकल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. काढणीस आलेल्या मुगाचे नुकसान होत आहे. शिवाय सोयाबीनच्या पिकातही पाणी साचल्याने या ठिकाणी सोयाबीनचे नुकसान होत आहे.

कोट

गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून पशुधनाच्या बळावर, तसेच सध्या आधुनिक यंत्राच्या साह्याने आपण शेती करीत आहोत. शेती व्यवसायामध्ये अनेक संकटे असतात. जोपर्यंत शेतातील माल घरात येत नाही तोपर्यंत काहीच खात्री नसते.

विनायकराव आटोळे, हातवन

गतवर्षीचा अनुभव वाईट आहे. गतवर्षी काढणीस आलेल्या मुगाला जागेवरच कोंब फुटले होते. कापसाचे बोंडेसुद्धा सडले होते. निसर्गाच्या भरवशावर असणारा शेती व्यवसाय असून, हातातोंडाशी आलेले कधी हिरावून घेईल सांगता येत नाही. त्यामुळे पीक हातात आल्याशिवाय समाधान नाहीच.

प्रल्हादराव गायकवाड, खणेपुरी

मी आधुनिक पद्धतीने शेती कसतो. परंतु, तरीही फळपिके असो अथवा खरिपातील पिके असोत अनेकदा केलेला खर्चही वसूल होत नाही. गतवर्षी पाईपलाईनवर झालेला खर्चसुद्धा निघाला नाही. विविध संकटांमुळे शेती व्यवसाय अनिश्चित स्वरुपाचा बनत चालला आहे.

संदीप घारे, साळेगाव