शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
2
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
3
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
4
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
5
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
6
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
7
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल
8
बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम
9
सख्खे शेजारी बनले पक्के वैरी! दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला; हाणामारीत ३ जणांचा मृत्यू
10
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
11
कैलास मानसरोवर यात्रेसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार! चीनशी आहे थेट संबंध
12
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
13
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार
14
राज्यातील तब्बल आठ हजारांहून अधिक गावांत शाळाच नाही; केंद्राने शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे दिले निर्देश
15
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
16
ज्योती मल्होत्रा ​​आणि अरमान यांचा पाकिस्तानशी किती खोल संबंध? हरियाणा पोलिसांचा खुलासा
17
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
18
मुख्य सचिव, पोलिसप्रमुख स्वागताला न आल्याने सरन्यायाधीश गवई नाराज; करून दिली प्रोटोकॉल, अनुच्छेद १४२ची आठवण
19
भीक मागितली, रस्त्यावर झोपला अन्..; अभिनेत्याची अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, काय घडलं नेमकं?
20
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 

गॅस सिलिंडर वापराबाबत जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:27 IST

ओबीसी मोर्चाची पूर्वतयारी; वडीगोद्रीत बैठक वडीगोद्री : ओबीसी समाजाच्या वतीने जालना येथे काढण्यात येत असलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वडीगोद्री (ता. ...

ओबीसी मोर्चाची पूर्वतयारी; वडीगोद्रीत बैठक

वडीगोद्री : ओबीसी समाजाच्या वतीने जालना येथे काढण्यात येत असलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वडीगोद्री (ता. अंबड) येथे मंगळवारी बैठक घेण्यात आली. यावे‌ळी देविदास खटके, बळीराम खटके, पंढरीनाथ खटके, बाबासाहेब गावडे, सत्संग मुंढे, बाबासाहेब बोंबले, संजय काळबांडे, ज्ञानेश्वर गावडे आदींची उपस्थिती होती.

सात जागांवर विजय

घनसावंगी : सिंदखेड येथील ग्रामपंचायत निवडणुकीत कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ ग्रामविकास पॅनलने सात जागांवर विजय मिळविला आहे. विजयी उमेदवारांमध्ये दिगंबर आधुडे, महानंदा पांढरे, मंदाकिनी आधुडे, शशिकला सावंत, बबिता पवार आदींचा समावेश आहे.

झाडाचा वाढदिवस

बदनापूर : शहरातील पर्यावरणप्रेमी प्रकाशचंद्र लड्डा यांनी मागील वर्षी लागवड केलेल्या झाडाचा वाढदिवस साजरा केला. यावेळी झाडाला फुलांच्या माळा आणि रोषणाईने सुशोभित करण्यात आले. याप्रसंगी तापडिया, राजेंद्र दुधानी, रामस्वरूप गेलडा आदींची उपस्थिती होती.

जिनिंगला आग

जालना : शहरातील औद्योगिक वसाहत परिसरातील मुलचंद फुलचंद जिनिंगला बुधवारी रात्री आग लागली होती. अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी वेळीच दाखल झाल्याने आगीवर नियंत्रण मिळविता आले, अशी माहिती चंदनझिरा पोलिसांनी दिली आहे.

आष्टी गावात निधी संकलनास प्रारंभ

आष्टी : अयोध्या येथे उभारण्यात येत असलेल्या श्रीराम मंदिराच्या उभारणीत देशभरातील रामभक्तांचा खारीचा वाटा असावा. यासाठी मागील काही दिवसांपासून गावोगाव निधी समर्पण अभियान राबविले जात आहे. याच अनुषंगाने आष्टी (ता. परतूर) येथे बुधवारी रक्तदान शिबिर व महाआरतीने अभियानास प्रारंभ करण्यात आला.

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव कार्यक्रम

जालना : मकर संक्रांतीनिमित्त बाथ्री तेली एकता महिला मंडळाच्या वतीने तीळगूळ कार्यक्रमासह समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम २४ जानेवारी रोजी होणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी २३ जानेवारी रोजीपर्यंत नाव नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले.

अनेक पुलांचे काम अर्धवट अवस्थेत

अंबड : मागील अनेक दिवसांपासून अंबड - जालना रस्त्याचे काम सुरू आहे. यात रस्त्याचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. असे असले तरी अनेक ठिकाणी पुलांचे काम अधुरे आहे. त्यामुळे रस्त्याला अनेक ठिकाणी वळणांचा वापर केला जात असल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.