शहरं
Join us  
Trending Stories
1
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
2
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
3
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
4
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
5
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
6
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
7
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
8
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
9
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
10
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
11
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
12
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
13
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
14
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
15
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
16
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
17
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
18
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
19
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
20
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले

गॅस सिलिंडर वापराबाबत जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:27 IST

ओबीसी मोर्चाची पूर्वतयारी; वडीगोद्रीत बैठक वडीगोद्री : ओबीसी समाजाच्या वतीने जालना येथे काढण्यात येत असलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वडीगोद्री (ता. ...

ओबीसी मोर्चाची पूर्वतयारी; वडीगोद्रीत बैठक

वडीगोद्री : ओबीसी समाजाच्या वतीने जालना येथे काढण्यात येत असलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वडीगोद्री (ता. अंबड) येथे मंगळवारी बैठक घेण्यात आली. यावे‌ळी देविदास खटके, बळीराम खटके, पंढरीनाथ खटके, बाबासाहेब गावडे, सत्संग मुंढे, बाबासाहेब बोंबले, संजय काळबांडे, ज्ञानेश्वर गावडे आदींची उपस्थिती होती.

सात जागांवर विजय

घनसावंगी : सिंदखेड येथील ग्रामपंचायत निवडणुकीत कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ ग्रामविकास पॅनलने सात जागांवर विजय मिळविला आहे. विजयी उमेदवारांमध्ये दिगंबर आधुडे, महानंदा पांढरे, मंदाकिनी आधुडे, शशिकला सावंत, बबिता पवार आदींचा समावेश आहे.

झाडाचा वाढदिवस

बदनापूर : शहरातील पर्यावरणप्रेमी प्रकाशचंद्र लड्डा यांनी मागील वर्षी लागवड केलेल्या झाडाचा वाढदिवस साजरा केला. यावेळी झाडाला फुलांच्या माळा आणि रोषणाईने सुशोभित करण्यात आले. याप्रसंगी तापडिया, राजेंद्र दुधानी, रामस्वरूप गेलडा आदींची उपस्थिती होती.

जिनिंगला आग

जालना : शहरातील औद्योगिक वसाहत परिसरातील मुलचंद फुलचंद जिनिंगला बुधवारी रात्री आग लागली होती. अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी वेळीच दाखल झाल्याने आगीवर नियंत्रण मिळविता आले, अशी माहिती चंदनझिरा पोलिसांनी दिली आहे.

आष्टी गावात निधी संकलनास प्रारंभ

आष्टी : अयोध्या येथे उभारण्यात येत असलेल्या श्रीराम मंदिराच्या उभारणीत देशभरातील रामभक्तांचा खारीचा वाटा असावा. यासाठी मागील काही दिवसांपासून गावोगाव निधी समर्पण अभियान राबविले जात आहे. याच अनुषंगाने आष्टी (ता. परतूर) येथे बुधवारी रक्तदान शिबिर व महाआरतीने अभियानास प्रारंभ करण्यात आला.

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव कार्यक्रम

जालना : मकर संक्रांतीनिमित्त बाथ्री तेली एकता महिला मंडळाच्या वतीने तीळगूळ कार्यक्रमासह समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम २४ जानेवारी रोजी होणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी २३ जानेवारी रोजीपर्यंत नाव नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले.

अनेक पुलांचे काम अर्धवट अवस्थेत

अंबड : मागील अनेक दिवसांपासून अंबड - जालना रस्त्याचे काम सुरू आहे. यात रस्त्याचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. असे असले तरी अनेक ठिकाणी पुलांचे काम अधुरे आहे. त्यामुळे रस्त्याला अनेक ठिकाणी वळणांचा वापर केला जात असल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.