शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

गॅस सिलिंडर वापराबाबत जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:27 IST

ओबीसी मोर्चाची पूर्वतयारी; वडीगोद्रीत बैठक वडीगोद्री : ओबीसी समाजाच्या वतीने जालना येथे काढण्यात येत असलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वडीगोद्री (ता. ...

ओबीसी मोर्चाची पूर्वतयारी; वडीगोद्रीत बैठक

वडीगोद्री : ओबीसी समाजाच्या वतीने जालना येथे काढण्यात येत असलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वडीगोद्री (ता. अंबड) येथे मंगळवारी बैठक घेण्यात आली. यावे‌ळी देविदास खटके, बळीराम खटके, पंढरीनाथ खटके, बाबासाहेब गावडे, सत्संग मुंढे, बाबासाहेब बोंबले, संजय काळबांडे, ज्ञानेश्वर गावडे आदींची उपस्थिती होती.

सात जागांवर विजय

घनसावंगी : सिंदखेड येथील ग्रामपंचायत निवडणुकीत कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ ग्रामविकास पॅनलने सात जागांवर विजय मिळविला आहे. विजयी उमेदवारांमध्ये दिगंबर आधुडे, महानंदा पांढरे, मंदाकिनी आधुडे, शशिकला सावंत, बबिता पवार आदींचा समावेश आहे.

झाडाचा वाढदिवस

बदनापूर : शहरातील पर्यावरणप्रेमी प्रकाशचंद्र लड्डा यांनी मागील वर्षी लागवड केलेल्या झाडाचा वाढदिवस साजरा केला. यावेळी झाडाला फुलांच्या माळा आणि रोषणाईने सुशोभित करण्यात आले. याप्रसंगी तापडिया, राजेंद्र दुधानी, रामस्वरूप गेलडा आदींची उपस्थिती होती.

जिनिंगला आग

जालना : शहरातील औद्योगिक वसाहत परिसरातील मुलचंद फुलचंद जिनिंगला बुधवारी रात्री आग लागली होती. अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी वेळीच दाखल झाल्याने आगीवर नियंत्रण मिळविता आले, अशी माहिती चंदनझिरा पोलिसांनी दिली आहे.

आष्टी गावात निधी संकलनास प्रारंभ

आष्टी : अयोध्या येथे उभारण्यात येत असलेल्या श्रीराम मंदिराच्या उभारणीत देशभरातील रामभक्तांचा खारीचा वाटा असावा. यासाठी मागील काही दिवसांपासून गावोगाव निधी समर्पण अभियान राबविले जात आहे. याच अनुषंगाने आष्टी (ता. परतूर) येथे बुधवारी रक्तदान शिबिर व महाआरतीने अभियानास प्रारंभ करण्यात आला.

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव कार्यक्रम

जालना : मकर संक्रांतीनिमित्त बाथ्री तेली एकता महिला मंडळाच्या वतीने तीळगूळ कार्यक्रमासह समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम २४ जानेवारी रोजी होणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी २३ जानेवारी रोजीपर्यंत नाव नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले.

अनेक पुलांचे काम अर्धवट अवस्थेत

अंबड : मागील अनेक दिवसांपासून अंबड - जालना रस्त्याचे काम सुरू आहे. यात रस्त्याचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. असे असले तरी अनेक ठिकाणी पुलांचे काम अधुरे आहे. त्यामुळे रस्त्याला अनेक ठिकाणी वळणांचा वापर केला जात असल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.