शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सरासरी ६६.३३ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 01:17 IST

जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघात सोमवारी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात मतदान झाले

६६.३३ टक्के मतदानलोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघात सोमवारी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात मतदान झाले. पावसाचा व्यत्यय वगळता मतदान शांततेत पार पडले. सकाळी ११ वाजल्यानंतर पाऊस थांबल्याने मतदानात उत्साह दिसून आला.जालना शहर आणि ग्रामीण भागात पाहिजे तसेच मतदान झाले नसले तरी जिल्ह्यात सायंकाळपर्यंत सरासरी ६६.३३ टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले. २०१४ च्या निवडणुकीत ६० टक्के मतदान जालना विधानसभेत झाले होते. भोकरदन विधानसभेत जाफराबाद आणि भोकरदन या दोन तालुक्यांचा समावेश होतो. यात दोन्ही तालुक्यातून मतदानासाठी उत्साही वातावरण दिसून आले. मतदानासाठी सर्वत्र रांगा लागल्याचे चित्र होते. परतूर मतदार संघातही अशीच स्थिती कायम होती. तांडे आणि वाड्यांवर होणाऱ्या मतदानावरच बरेच काही अवलंबून राहणार आहे. युती असल्याने खोतकरांना या युतीचा लाभ मिळेल, असा अंदाज वर्तविला जात आहे.परतूर विधानसभेत मंठा आणि परतूर हे दोन तालुके येतात. त्यात मंठा तालुक्यातही उत्साही वातावरणात मतदान झाले. तळणी, जयपुर, उस्वद, वाटूरफाटा तसेच श्रीष्टी, आष्टी येथे मतदानाला महिला आणि युवकांनी रांगा लावून मतदान केले. जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघात अनेकांची नावे मतदार यादीत नसल्याने अडचणी निर्माण झाल्या. मध्यंतरी मतदान यादीचे नव्याने सर्वेक्षण करतांना निवडणूक विभागाने मतदारांना आहवान करून मतदार यादीतील नावांमध्ये दुरूस्तीची संधी दिली होती. परंतु ्याकडे दुर्लक्ष झाल्याने आजची ही स्थिती निर्माण झाल्याचे सांगितले. जालना विधानसभा वगळता अन्य चारही मतदारसंघात सरासरी ६० टक्के मतदान झाले. मतदानाचा टक्का वाढावा म्हणून जवळपास दोन लााख विद्यार्थ्यांकडून त्यांच्या पालकांचे संकल्पपत्र भरून घेण्यात आले होते. तसेच मतदार जागृतीसाठी विविध गावांमध्ये पथनाट्य आणि लोकगीतातून जागृती केल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी दीपाली मोतीयाळे यांनी दिली.नवमतदारांनी बजावला मतदानाचा हक्कमतदानाचा हक्क पहिल्यांदाच बजावणा-या युवक- युवतींमध्ये मोठा उत्साह दिसून आला. लोकशाही प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाची घटना म्हणून मतदानाकडे पाहिले जाते. नव मतदारांनी मतदान केल्यानंतर सेल्फी पॉइंटवर जाऊन छायाचित्र काढले. तर केलेल्या मतदानाचा फोटो अनेकांनी सोशल मीडियावरही अपलोड केला होता.पायाने केली सहीदिव्यांगांनी मतदान करावे, यासाठी निवडणूक विभागाच्या वतीने ठिकठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या. भोकरदन तालुक्यातील करजगाव येथील चोरंगी प्रभाकर लोखंडे या दोन्ही हात नसलेल्या दिव्यांग युवकाने पायाने स्वाक्षरी करून मतदानाचा हक्क बजावला. लोखंडेसह इतर अनेक दिव्यांगांनीही मतदान केले.पाऊस, चिखलाचाही परिणामलोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात पावसाळा संपल्यानंतर परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावून मोठा दिलासा दिला आहे. हा परतीचा पाऊस गेल्या आठवडाभरापासून कधी हलका तर कधी मध्यम स्वरूपाचा पडला. मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजेच रविवारी जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. सोमवारी सकाळीही पाऊस सुरू होता.जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या ८७ टक्क्यांपर्यंत पाऊस झाला आहे. परतीच्या पावसाने दिलासा दिल्याने रबी हंगामातील शाळू ज्वारीला याचा चांगला परिणाम दिसून येईल. तर या पावसाचा फटका कापूस आणि सोयाबीनच्या सोंगणीला बसला आहे. मतदानाच्या दिवशी सोमवारी सकाळपासूनच रिमझिम पाऊस असल्याने अनेक मतदान केंद्रांमध्ये गळती लागली होती. भोकरदन तालुक्यात जवळपास १२ केंद्रांवर ताडपत्रीचे अच्छादन टाकून पावसापासून मशीनचा बचाव करण्याचा प्रयत्न झाला. जालना विधानसभा मतदार संघातील काही गावांमध्ये देखील मतदान केंद्रावर गळती लागल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या.अनेक मतदान केंद्रांवर पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्याचे दिसून आले. काही ठिकाणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या मोबाईलच्या बॅटरीचा उपयोग करून मतदार यादीतील नावे शोधून काढली. तर काही मतदान केंद्रांवर रविवारीच विद्युत पुरवठा खंडित झाल्याने कर्मचा-यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.काही केंद्रांवर रात्री ९ वाजेपर्यंत चालली मतदान प्रक्रिया...भोकरदन तालुक्यातील कठोरा बाजार, आव्हाना, वालसावंगी, आसई, बरंजळा साबळे या गावातील सहा मतदान केंद्रांवर रात्री ७ ते ८ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. तर जालना तालुक्यातील खणेपुरी येथेही रात्री ९ वाजेपर्यंत मतदान सुरू असल्याचे सांगण्यात आले.घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथेही रात्री ८ वाजेपर्यंत मतदान सुरू होते. मंठा तसेच परतूर तालुक्यातही काही मतदान केंद्रांवर मशिनमध्ये बिघाड होणे तसेच सायंकाळी सहा नंतर मतदान केंद्राबाहेर रांगेत असलेल्या मतदारांमुळे हा उशीर झाल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Votingमतदानjalna-acजालना