शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

कोरोनाच्या सूचनांचे पालन करताना दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:03 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क जालना : जिल्ह्यातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. कोरोनातील सूचनांचे अंमलबजावणी करून ज्ञानदान करावे, ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

जालना : जिल्ह्यातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. कोरोनातील सूचनांचे अंमलबजावणी करून ज्ञानदान करावे, अशा सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. परंतु, विद्यार्थ्यांनी सुरक्षित अंतराचे पालन आणि मास्कचा वापर करावा, अशा सूचना देताना शिक्षकांच्या नाकीनव येत आहेत. अशात अधिकाधिक प्रमाणात सूचनांचे पालन व्हावे, यासाठी शिक्षक प्रयत्नशील आहेत.

लॉकडाऊन शिथिलतेनंतर प्रारंभी नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले होते. या वर्गात जवळपास ७० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी उपस्थित राहत आहेत. गत चार दिवसांपासून पाचवी ते आठवीचे वर्गही सुरू झाले आहेत. कोरोना तपासणीत आजवर जिल्ह्यातील ३१ शिक्षकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. संबंधित शिक्षकांवर उपचार सुरू आहेत. सध्या ६१ हजारांवर विद्यार्थी शाळेत येत आहेत. परंतु, ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी मास्कचा वापर करीत नाहीत. शिवाय शाळेत सुरक्षित अंतराचे पालन करण्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी सूचनांचे पालन करावे, यासाठी शिक्षक धडपड करीत आहेत.

शाळेत येणाऱ्या प्रत्येक मुलांनी कोरोनातील सूचनांचे पालन करावे, याकडे विशेष लक्ष दिले जाते. विशेषत: शाळेकडून पालकांनाही याबाबत सूचना देण्यात आल्या असून, सूचनांचे पालन करून ज्ञानदान केले जात आहे.

- सुनील सोनटक्के, शिक्षक

शाळेत येणाऱ्या प्रत्येक मुलांनी कोरोनातील सूचनांचे पालन करावे, याकडे शाळेतील सर्व सहकरी लक्ष ठेवून असतो. कोरोनातील सर्व सूचनांचे पालन करूनच विद्यार्थ्यांना ज्ञानदान केले जात आहे.

- शहाजी देवकर, शिक्षक

शाळेच्या पहिल्या दिवशी काही मुलांनी कोरोनातील सूचनांकडे दुर्लक्ष केले होते. परंतु, आम्ही विद्यार्थ्यांना कोरोनाची माहिती देऊन सूचनांचे पालन करण्यास सांगितले. त्यामुळे विद्यार्थी सूचनांचे पालन करीत आहेत.

- रामनाथ शेवाळे, शिक्षक

एकूण शाळा

१८५४

विद्यार्थी उपस्थिती

६१,९८७

शिक्षक उपस्थिती

९,९६०