शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

शॉर्टसर्किटमुळे स्वप्नांची राख; पूर्ण वाढलेला ११ हेक्टर ऊस जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2021 14:00 IST

Fire in farm field : आगीने रौद्ररूप धारण करून परिसरातील ४ ते ५ गटातील जवळपास ११.७२ हेक्टर उसाला आपल्या कवेत घेतले.

ठळक मुद्देमहावितरणने गंभीर न घेतल्याने आग लागल्याचा आरोप शासनाने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी

टेंभुर्णी (जि.जालना) : जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरी येथे शुक्रवारी शॉर्टसर्किटमुळे उसाला आग (11 hectares of fully grown sugarcane burn ) लागली. या आगीत कुंभारझरी शिवारातील १४ शेतकऱ्यांचा ११.७२ हेक्टर ऊस जळून खाक झाला आहे. दरम्यान, वेळोवेळी सांगूनही विजेची तारे सरळ न करणाऱ्या वीज वितरण प्रशासनाविरुद्ध शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे.

शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास येथील गट क. ९२ मधील शेतकरी विनायक चव्हाण यांच्या उसाला विजेच्या शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. बघता बघता या आगीने रौद्ररूप धारण करून परिसरातील ४ ते ५ गटातील जवळपास ११.७२ हेक्टर उसाला आपल्या कवेत घेतले. यावेळी संपूर्ण गावकऱ्यांनी या शेतांकडे आग नियंत्रित आणण्यासाठी धाव घेतली. मोठ्या प्रयत्नानंतर गावकऱ्यांना ही आग नियंत्रित आणण्यात यश आले. या आगीत जवळपास १ हजार ५०० टनांपेक्षा अधिक ऊस जळून खाक झाल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला असून, त्यात ३० ते ३५ लाखांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे अद्याप परिसरात कुठेही साखर कारखाने सुरू नसल्याने या संपूर्ण उसाचे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागणार आहे. दरम्यान, या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.

तीन वर्षांपूर्वीही लागली होती आगतीन वर्षांपूर्वीही याच ठिकाणी विजेच्या शॉर्टसर्किटमुळे उसाला लागलेल्या आगीत ६० ते ७० एकर ऊस जळून खाक झाला होता. तेव्हा ऊस जळूनही वीज वितरणाने या प्रकरणाला गांभीर्याने न घेतल्याने पुन्हा ही दुर्घटना घडली, अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकरी बोलून दाखवित आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीJalanaजालना