शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

दानवे-खोतकरांमध्ये शस्त्रसंधी की, आमना-सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 00:52 IST

गेल्या सहा महिन्यांपासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकरांमधून अडवा विस्तवही जात नव्हता, परंतु रविवारी हे दोघेजण युती धर्म पाळतांना दिसून आले. ही दानवे आणि खोतकरांमधील शस्त्रसंधी म्हणावी की, आगामी लोकसभा निवडणुकीत ते आमने-सामने उभे राहून सरळ दोन हात करतात याकडे भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गेल्या सहा महिन्यांपासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकरांमधून अडवा विस्तवही जात नव्हता, परंतु रविवारी हे दोघेजण युती धर्म पाळतांना दिसून आले. ही दानवे आणि खोतकरांमधील शस्त्रसंधी म्हणावी की, आगामी लोकसभा निवडणुकीत ते आमने-सामने उभे राहून सरळ दोन हात करतात याकडे भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे. आज आ. सत्तार यांनी देखील पशुसंवर्धन प्रदर्शनास भेट देऊन खा. दानवेंचा नामोल्लेख न करता थेट हम आपे साथ साथ असल्याचे सांगितले. तर परभणीचे खा. बूंडभाऊ जाधव यांनी देखील आता खोतकर मैदानात उतरले असून, त्यांना आमचीही साथ राहील असे सांगितल्याने रविवार हा जालनेकरांसाठी राजकीय तर्कविर्तकांचा ठरला.संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या जालना लोकसभेच्या निवडणुकीत आजच्या दानवे आणि खोतकरांच्या एका व्यासपीठावर येण्याने दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आवाक् झाले. एकूणच दानेवेंच्या विरोधात शड्डू ठोकणारे अर्जुन खोतकर यांच्या लोकसभा निवडणुकीत दानवेंना आव्हान देण्याच्या वल्गनांनी जालना जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. दानवे आणि खोतकरांमध्ये राजकीय मुद्यांवरून यापूर्वीही बरेचदा वाद झाले होते. मात्र नंतर पुन्हा दोघांनीही दोन पावले मागे येत ते दूर केले. परंतु गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून राज्यमंत्री खोतकर यांनी थेट लोकसभेची तयारी केल्याने दानवेंकडूनही त्यांच्यापेक्षा जास्त जमवा-जमव केली जात आहे. आजच्या भेटीतून मनोमिलन झाले काय असे राज्यमंत्री खोतकरांना विचारले असता, तसे काहीही नसल्याचे सांगून ज्या पशु प्रदर्शनाला लाखो लोक भेट असल्याने दानवेंना येणे क्रमप्राप्त झाल्याचे ते म्हणाले. परंतु असे असले तरी दानवेंनकडूनही या वृत्ताला दुजोरा देण्यात आला असून, आगामी काळात खोतकर हे काँग्रेसमध्ये जाऊन दानेवेंना आव्हान देणार या दृष्टीनेच खा. दानवेंकडून मोर्चेबांधणी करण्यात येणार आहे. काँग्रेसकडून सध्या कुठल्या नवीन नावाची चर्चा देखील सुरू नसल्याने दानवेंच्या अंदाजाला बळ मिळत असल्याचे दिसून येते. तसेच अर्जुन खोतकरांचे निकटवर्तीय देखील खासगीत भेटल्यावर एकमेकांना जय हो... करतांना दिसत असल्याने आता खोतकरांच्या काँग्रेस प्रवेशाची केवळ एक औपचारिकता शिल्लक असल्याचे भाजपच्या गोटातून सांगितले जात आहे.गुपित कधी एकदा बाहेर पडते ?खोतकरांच्या पोटातील पाणी सध्या हलत नसल्याने शिवसेना तसेच काँग्रेस आणि भाजपही संभ्रमित झाला आहे. खोतकरांचे पत्ते कधी खूले होणार या बाबत वेट अँड वॉच चे धोरण त्यांच्याकडून स्विकारले जात आहे. त्यातील गुपित कधी एकदा बाहेर पडते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहेत. खोतकरांनी गेल्या तीन महिन्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा, भीम महोत्सव, आणि आता राष्ट्रीय पातळीवरील पशू-पक्षी प्रदर्शनाचे आयोजन करून मोठी प्रसिध्दी आणि आपुलकी मिळविली आहे. त्यामुळे अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातील वाद राजकीय युध्दात बदलतो की, भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधी सारखाच ठरतो याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :JalanaजालनाRaosaheb Danweरावसाहेब दानवेArjun Khotkarअर्जुन खोतकरAditya Thackreyआदित्य ठाकरे