शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

दानवे-खोतकरांमध्ये शस्त्रसंधी की, आमना-सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 00:52 IST

गेल्या सहा महिन्यांपासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकरांमधून अडवा विस्तवही जात नव्हता, परंतु रविवारी हे दोघेजण युती धर्म पाळतांना दिसून आले. ही दानवे आणि खोतकरांमधील शस्त्रसंधी म्हणावी की, आगामी लोकसभा निवडणुकीत ते आमने-सामने उभे राहून सरळ दोन हात करतात याकडे भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गेल्या सहा महिन्यांपासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकरांमधून अडवा विस्तवही जात नव्हता, परंतु रविवारी हे दोघेजण युती धर्म पाळतांना दिसून आले. ही दानवे आणि खोतकरांमधील शस्त्रसंधी म्हणावी की, आगामी लोकसभा निवडणुकीत ते आमने-सामने उभे राहून सरळ दोन हात करतात याकडे भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे. आज आ. सत्तार यांनी देखील पशुसंवर्धन प्रदर्शनास भेट देऊन खा. दानवेंचा नामोल्लेख न करता थेट हम आपे साथ साथ असल्याचे सांगितले. तर परभणीचे खा. बूंडभाऊ जाधव यांनी देखील आता खोतकर मैदानात उतरले असून, त्यांना आमचीही साथ राहील असे सांगितल्याने रविवार हा जालनेकरांसाठी राजकीय तर्कविर्तकांचा ठरला.संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या जालना लोकसभेच्या निवडणुकीत आजच्या दानवे आणि खोतकरांच्या एका व्यासपीठावर येण्याने दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आवाक् झाले. एकूणच दानेवेंच्या विरोधात शड्डू ठोकणारे अर्जुन खोतकर यांच्या लोकसभा निवडणुकीत दानवेंना आव्हान देण्याच्या वल्गनांनी जालना जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. दानवे आणि खोतकरांमध्ये राजकीय मुद्यांवरून यापूर्वीही बरेचदा वाद झाले होते. मात्र नंतर पुन्हा दोघांनीही दोन पावले मागे येत ते दूर केले. परंतु गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून राज्यमंत्री खोतकर यांनी थेट लोकसभेची तयारी केल्याने दानवेंकडूनही त्यांच्यापेक्षा जास्त जमवा-जमव केली जात आहे. आजच्या भेटीतून मनोमिलन झाले काय असे राज्यमंत्री खोतकरांना विचारले असता, तसे काहीही नसल्याचे सांगून ज्या पशु प्रदर्शनाला लाखो लोक भेट असल्याने दानवेंना येणे क्रमप्राप्त झाल्याचे ते म्हणाले. परंतु असे असले तरी दानवेंनकडूनही या वृत्ताला दुजोरा देण्यात आला असून, आगामी काळात खोतकर हे काँग्रेसमध्ये जाऊन दानेवेंना आव्हान देणार या दृष्टीनेच खा. दानवेंकडून मोर्चेबांधणी करण्यात येणार आहे. काँग्रेसकडून सध्या कुठल्या नवीन नावाची चर्चा देखील सुरू नसल्याने दानवेंच्या अंदाजाला बळ मिळत असल्याचे दिसून येते. तसेच अर्जुन खोतकरांचे निकटवर्तीय देखील खासगीत भेटल्यावर एकमेकांना जय हो... करतांना दिसत असल्याने आता खोतकरांच्या काँग्रेस प्रवेशाची केवळ एक औपचारिकता शिल्लक असल्याचे भाजपच्या गोटातून सांगितले जात आहे.गुपित कधी एकदा बाहेर पडते ?खोतकरांच्या पोटातील पाणी सध्या हलत नसल्याने शिवसेना तसेच काँग्रेस आणि भाजपही संभ्रमित झाला आहे. खोतकरांचे पत्ते कधी खूले होणार या बाबत वेट अँड वॉच चे धोरण त्यांच्याकडून स्विकारले जात आहे. त्यातील गुपित कधी एकदा बाहेर पडते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहेत. खोतकरांनी गेल्या तीन महिन्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा, भीम महोत्सव, आणि आता राष्ट्रीय पातळीवरील पशू-पक्षी प्रदर्शनाचे आयोजन करून मोठी प्रसिध्दी आणि आपुलकी मिळविली आहे. त्यामुळे अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातील वाद राजकीय युध्दात बदलतो की, भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधी सारखाच ठरतो याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :JalanaजालनाRaosaheb Danweरावसाहेब दानवेArjun Khotkarअर्जुन खोतकरAditya Thackreyआदित्य ठाकरे