शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

दानवेनंतर खोतकरांनी घेतली सत्तारांची गळाभेट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 00:47 IST

जालना येथे शनिवारी खा. रावसाहेब दानवे आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यात झालेल्या गळाभेटीची चर्चा सुरु असतानाच रविवारी खोतकर यांनी सिल्लोड येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. अब्दुल सत्तार यांचीही गळाभेट घेतल्याने चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.

सिल्लोड/ जालना : जालना येथे शनिवारी खा. रावसाहेब दानवे आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यात झालेल्या गळाभेटीची चर्चा सुरु असतानाच रविवारी खोतकर यांनी सिल्लोड येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. अब्दुल सत्तार यांचीही गळाभेट घेतल्याने चर्चेला पुन्हा उधाण आले आहे. मी अजून रणांगण सोडले नसल्याचे खोतकर यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. तर दुसरीकडे खोतकर यांचे मन वळविण्यासाठी सोमवारी सहकार मंत्री सुभाष देशमुख हे मुख्यमंत्र्यांचे खास दूत म्हणून जालन्यात येत आहेत. यामुळे खोतकरांची यापुढील राजकीय वाटचाल कशी असेल, याचीच सर्वांना उत्सुकता लागून आहे.सिल्लोड न.प. च्या नवनिर्वाचित काँग्रेस नगरसेवकांच्या सत्कारानिमित्त रविवारी आ. अब्दुल सत्तार यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास खोतकर येथे आले होते. लोकसभा निवडणुकीत खा. दानवे यांच्या विरोधात ‘अर्जुनास्त्र’ तयार असल्याचे संकेत खोतकर यांनी दिले. यावेळी दोघांची गळाभेट बघून पुन्हा नवीन चर्चेला सुरुवात झाली आहे.शनिवारी जालना येथे दीर्घ काळानंतर दानवे व खोतकर एका व्यासपीठावर आले होते. मध्यंतरीच्या काळात दोघांमधून विस्तवही आडवा जात नसताना शनिवारी मात्र दोघे घनिष्ठ स्नेही असल्यागत भेटल्याने खोतकरांमधील ‘बंडोबा’ थंड झाला असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर दुसऱ्याच दिवशी खोतकर चक्क काँग्रेसच्या व्यासपीठावर दिसल्याने मराठवाड्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ उडाली आहे. दानवे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असून त्यांना विजयी करणे भाजपसाठी प्रतिष्ठेचे बनले आहे. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात लक्ष घातले आहे. त्यामुळे भाजपचे नेतृत्व कुठलाच धोका पत्करण्यास तयार नाही. येन-केन प्रकारे खोतकर यांचे मन वळवून त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यापासून रोखणे हा एकमेव ‘अजेंडा’ सध्या भाजप नेतृत्वासमोर आहे.एकीकडे खोतकर यांना काँग्रेसकडून खुली आॅफर आहे. मात्र गेली ३० वर्ष कट्टर हिंदुत्ववादी नेता म्हणून बनलेली ओळख सोडून सेनेतून ‘सेक्युलर’ पार्टीत प्रवेश करून लोकसभेची निवडणूक लढविणे म्हणजे एक मोठे आव्हान असेल. त्यामुळे ते देखील काँग्रेसची आॅफर स्वीकारण्याबाबत द्विधा मनस्थितीत असल्याचे दिसून येते. खोतकर काँग्रेसमध्ये आल्यास त्यांचे जालन्यातील कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी काँग्रेस पक्षाबाबत विचार करण्याची सूचक भाषा वापरली आहे, त्यामुळे काँग्रेस नेतृत्वही संभ्रमावस्थेत सापडले आहे.सहकारमंत्री देशमुख यांना खोतकरांकडे पाठविण्यामागे देखील भाजप नेतृत्वाचे राजकारण आहे. खोतकर हे जालना बाजार समितीचे २००७ पासून सभापती आहेत. तसेच रामनगर येथील जालना साखर कारखान्याचा मुद्दाही तेवत राहिलेला आहे. त्यामुळे मुद्दाम देशमुख यांनाच खोतकरांकडे पाठवून भाजप नेतृत्व एका प्रकारे चाणक्य नीतीचाही अवलंब करत असल्याचे बोलले जात आहे. 

टॅग्स :Arjun Khotkarअर्जुन खोतकरAbdul Sattarअब्दुल सत्तारPoliticsराजकारण