शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

दानवेनंतर खोतकरांनी घेतली सत्तारांची गळाभेट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 00:47 IST

जालना येथे शनिवारी खा. रावसाहेब दानवे आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यात झालेल्या गळाभेटीची चर्चा सुरु असतानाच रविवारी खोतकर यांनी सिल्लोड येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. अब्दुल सत्तार यांचीही गळाभेट घेतल्याने चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.

सिल्लोड/ जालना : जालना येथे शनिवारी खा. रावसाहेब दानवे आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यात झालेल्या गळाभेटीची चर्चा सुरु असतानाच रविवारी खोतकर यांनी सिल्लोड येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. अब्दुल सत्तार यांचीही गळाभेट घेतल्याने चर्चेला पुन्हा उधाण आले आहे. मी अजून रणांगण सोडले नसल्याचे खोतकर यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. तर दुसरीकडे खोतकर यांचे मन वळविण्यासाठी सोमवारी सहकार मंत्री सुभाष देशमुख हे मुख्यमंत्र्यांचे खास दूत म्हणून जालन्यात येत आहेत. यामुळे खोतकरांची यापुढील राजकीय वाटचाल कशी असेल, याचीच सर्वांना उत्सुकता लागून आहे.सिल्लोड न.प. च्या नवनिर्वाचित काँग्रेस नगरसेवकांच्या सत्कारानिमित्त रविवारी आ. अब्दुल सत्तार यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास खोतकर येथे आले होते. लोकसभा निवडणुकीत खा. दानवे यांच्या विरोधात ‘अर्जुनास्त्र’ तयार असल्याचे संकेत खोतकर यांनी दिले. यावेळी दोघांची गळाभेट बघून पुन्हा नवीन चर्चेला सुरुवात झाली आहे.शनिवारी जालना येथे दीर्घ काळानंतर दानवे व खोतकर एका व्यासपीठावर आले होते. मध्यंतरीच्या काळात दोघांमधून विस्तवही आडवा जात नसताना शनिवारी मात्र दोघे घनिष्ठ स्नेही असल्यागत भेटल्याने खोतकरांमधील ‘बंडोबा’ थंड झाला असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर दुसऱ्याच दिवशी खोतकर चक्क काँग्रेसच्या व्यासपीठावर दिसल्याने मराठवाड्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ उडाली आहे. दानवे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असून त्यांना विजयी करणे भाजपसाठी प्रतिष्ठेचे बनले आहे. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात लक्ष घातले आहे. त्यामुळे भाजपचे नेतृत्व कुठलाच धोका पत्करण्यास तयार नाही. येन-केन प्रकारे खोतकर यांचे मन वळवून त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यापासून रोखणे हा एकमेव ‘अजेंडा’ सध्या भाजप नेतृत्वासमोर आहे.एकीकडे खोतकर यांना काँग्रेसकडून खुली आॅफर आहे. मात्र गेली ३० वर्ष कट्टर हिंदुत्ववादी नेता म्हणून बनलेली ओळख सोडून सेनेतून ‘सेक्युलर’ पार्टीत प्रवेश करून लोकसभेची निवडणूक लढविणे म्हणजे एक मोठे आव्हान असेल. त्यामुळे ते देखील काँग्रेसची आॅफर स्वीकारण्याबाबत द्विधा मनस्थितीत असल्याचे दिसून येते. खोतकर काँग्रेसमध्ये आल्यास त्यांचे जालन्यातील कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी काँग्रेस पक्षाबाबत विचार करण्याची सूचक भाषा वापरली आहे, त्यामुळे काँग्रेस नेतृत्वही संभ्रमावस्थेत सापडले आहे.सहकारमंत्री देशमुख यांना खोतकरांकडे पाठविण्यामागे देखील भाजप नेतृत्वाचे राजकारण आहे. खोतकर हे जालना बाजार समितीचे २००७ पासून सभापती आहेत. तसेच रामनगर येथील जालना साखर कारखान्याचा मुद्दाही तेवत राहिलेला आहे. त्यामुळे मुद्दाम देशमुख यांनाच खोतकरांकडे पाठवून भाजप नेतृत्व एका प्रकारे चाणक्य नीतीचाही अवलंब करत असल्याचे बोलले जात आहे. 

टॅग्स :Arjun Khotkarअर्जुन खोतकरAbdul Sattarअब्दुल सत्तारPoliticsराजकारण