शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

राज्यात सात वर्षांपासून नवीन ग्रंथालयांना मिळेना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 01:07 IST

सोशल मीडियाचे वारे जोरात वाहत असताना शासनाने गत सात वर्षापासून नवीन ग्रंथालयांना मंजुरी देणे बंद केले. अशा स्थितीत वाचन संस्कृती रुजविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची वेळ सुरू असलेल्या ग्रंथालयांवर आली आहे

विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सोशल मीडियाचे वारे जोरात वाहत असताना शासनाने गत सात वर्षापासून नवीन ग्रंथालयांना मंजुरी देणे बंद केले. अशा स्थितीत वाचन संस्कृती रुजविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची वेळ सुरू असलेल्या ग्रंथालयांवर आली आहे. त्यात ‘अ’ वर्गवारीत केवळ ४ तर ‘ब’ वर्गवारीत ५१ ग्रंथालये जिल्ह्यात आहेत. तर क, ड वर्गवारीतील ग्रंथालयांची ग्रंथसंपदा कमीच आहे.देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त १५ आॅक्टोबर हा ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. युवकांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, स्पर्धा परीक्षेत विद्यार्थी टिकावेत, भारत सशक्त व्हावा आदी अनेक उद्देश या दिनामागे आहेत. मात्र, ज्या ग्रंथालयात पुस्तकं, ग्रंथ, कादंबऱ्यांचा खजिना असतो, त्यालाच मागील सात वर्षांपासून मंजुरी मिळणे बंद झालं. सध्या जालना जिल्ह्यात ४१७ ग्रंथालये आहेत. यात अ वर्गवारीत केवळ ४ तर ड वर्गवारीत २५४ ग्रंथालये आहेत.शहरातील शासकीय ग्रंथालयासह इतर ग्रंथालयात येणाºया युवकांची संख्या मोठी आहे. येथे हे युवक स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. वाचनालयात त्यांच्यासाठी सोयी-सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र, अ, ब वर्गवारीतील ग्रंथालये वगळता इतर ग्रंथालयांमध्ये मुबलक पुस्तके, ग्रंथासह इतर साहित्य, सोयी-सुविधांचा अभाव दिसतो. भोकरदन शहरातही अ वर्गवारीची दोन ग्रंथालये आहेत. मात्र, शहरी भाग वगळता ग्रामीण भागातील ग्रंथालयांची अवस्था बिकट आहे.साहित्याचा अभाव, सोयी-सुविधांचा अभाव, मिळणारे अपुरे अनुदान अशा एक ना अनेक समस्या या ग्रंथालयांसमोर आहेत. त्यामुळे ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करताना या ग्रंथालयांमधील विशेषत: ग्रामीण भागातील ग्रंथालये समृध्द करण्यासाठी शासन, प्रशासनस्तरावरून प्रयत्न होणे गरजेचे आहे. ग्रंथालये समृध्द झाली तरच सोशल मीडियाच्या जगात वावरणा-या युवकांसह ज्येष्ठांची पावलं ग्रंथालयाकडे वळणार असून, चांगल्या साहित्याच्या वाचनामुळे समाजही ख-या अर्थाने सशक्त होण्यास मदत होणार आहे.‘ड’ वर्गवारीत जिल्ह्यात २५४ ग्रंथालये आहेत. या ग्रंथालयांना वार्षिक ३० हजार रूपयांचे अनुदान मिळते. यातूनच पुस्तक खरेदी, इमारत भाडे, कर्मचारी पगारासह इतर सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतात. अपु-या अनुदानात ही ग्रंथालये समृध्द होणार कशी, असाच प्रश्न आहे.वेळोवेळी तपासणीज्या ग्रंथालयांना शासनाचे अनुदान मिळते, अशा ग्रंथालयांची वेळोवेळी तपासणी केली जाते. अशा गावस्तरावरील ग्रंथालयांमध्ये युवकांसह ज्येष्ठांनी जाणे गरजेचे आहे. ग्रामस्थांनी लक्ष दिल्यानंतर लोकसहभागातून ही ग्रंथालये समृध्द होण्यास मदत होऊन ख-या अर्थाने सशक्त भारत निर्माण होण्यास मदत मिळणार आहे.

टॅग्स :libraryवाचनालयfundsनिधीgovernment schemeसरकारी योजना