शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

राज्यात सात वर्षांपासून नवीन ग्रंथालयांना मिळेना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 01:07 IST

सोशल मीडियाचे वारे जोरात वाहत असताना शासनाने गत सात वर्षापासून नवीन ग्रंथालयांना मंजुरी देणे बंद केले. अशा स्थितीत वाचन संस्कृती रुजविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची वेळ सुरू असलेल्या ग्रंथालयांवर आली आहे

विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सोशल मीडियाचे वारे जोरात वाहत असताना शासनाने गत सात वर्षापासून नवीन ग्रंथालयांना मंजुरी देणे बंद केले. अशा स्थितीत वाचन संस्कृती रुजविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची वेळ सुरू असलेल्या ग्रंथालयांवर आली आहे. त्यात ‘अ’ वर्गवारीत केवळ ४ तर ‘ब’ वर्गवारीत ५१ ग्रंथालये जिल्ह्यात आहेत. तर क, ड वर्गवारीतील ग्रंथालयांची ग्रंथसंपदा कमीच आहे.देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त १५ आॅक्टोबर हा ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. युवकांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, स्पर्धा परीक्षेत विद्यार्थी टिकावेत, भारत सशक्त व्हावा आदी अनेक उद्देश या दिनामागे आहेत. मात्र, ज्या ग्रंथालयात पुस्तकं, ग्रंथ, कादंबऱ्यांचा खजिना असतो, त्यालाच मागील सात वर्षांपासून मंजुरी मिळणे बंद झालं. सध्या जालना जिल्ह्यात ४१७ ग्रंथालये आहेत. यात अ वर्गवारीत केवळ ४ तर ड वर्गवारीत २५४ ग्रंथालये आहेत.शहरातील शासकीय ग्रंथालयासह इतर ग्रंथालयात येणाºया युवकांची संख्या मोठी आहे. येथे हे युवक स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. वाचनालयात त्यांच्यासाठी सोयी-सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र, अ, ब वर्गवारीतील ग्रंथालये वगळता इतर ग्रंथालयांमध्ये मुबलक पुस्तके, ग्रंथासह इतर साहित्य, सोयी-सुविधांचा अभाव दिसतो. भोकरदन शहरातही अ वर्गवारीची दोन ग्रंथालये आहेत. मात्र, शहरी भाग वगळता ग्रामीण भागातील ग्रंथालयांची अवस्था बिकट आहे.साहित्याचा अभाव, सोयी-सुविधांचा अभाव, मिळणारे अपुरे अनुदान अशा एक ना अनेक समस्या या ग्रंथालयांसमोर आहेत. त्यामुळे ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करताना या ग्रंथालयांमधील विशेषत: ग्रामीण भागातील ग्रंथालये समृध्द करण्यासाठी शासन, प्रशासनस्तरावरून प्रयत्न होणे गरजेचे आहे. ग्रंथालये समृध्द झाली तरच सोशल मीडियाच्या जगात वावरणा-या युवकांसह ज्येष्ठांची पावलं ग्रंथालयाकडे वळणार असून, चांगल्या साहित्याच्या वाचनामुळे समाजही ख-या अर्थाने सशक्त होण्यास मदत होणार आहे.‘ड’ वर्गवारीत जिल्ह्यात २५४ ग्रंथालये आहेत. या ग्रंथालयांना वार्षिक ३० हजार रूपयांचे अनुदान मिळते. यातूनच पुस्तक खरेदी, इमारत भाडे, कर्मचारी पगारासह इतर सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतात. अपु-या अनुदानात ही ग्रंथालये समृध्द होणार कशी, असाच प्रश्न आहे.वेळोवेळी तपासणीज्या ग्रंथालयांना शासनाचे अनुदान मिळते, अशा ग्रंथालयांची वेळोवेळी तपासणी केली जाते. अशा गावस्तरावरील ग्रंथालयांमध्ये युवकांसह ज्येष्ठांनी जाणे गरजेचे आहे. ग्रामस्थांनी लक्ष दिल्यानंतर लोकसहभागातून ही ग्रंथालये समृध्द होण्यास मदत होऊन ख-या अर्थाने सशक्त भारत निर्माण होण्यास मदत मिळणार आहे.

टॅग्स :libraryवाचनालयfundsनिधीgovernment schemeसरकारी योजना