शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भारत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 00:31 IST

केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या निषेधार्थ अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी पुकारलेल्या भारत बंदला जालना जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने यशस्वी करण्यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचे माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी आयोजित एका बैठकीत सांगीतले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या निषेधार्थ अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी पुकारलेल्या भारत बंदला जालना जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने यशस्वी करण्यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचे माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी आयोजित एका बैठकीत सांगीतले.जालना शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रितीसुधानगर येथे शनिवारी ायोजीत बैठकीत अध्यक्षस्थानावरून गोरंट्याल बोलत होते. या प्रसंगी जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष भीमराव डोंगरे, प्रदेश सरचिटणीस कल्याणराव दळे, प्रदेश सचिव विजय कामड, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, गटनेते गणेश राऊत, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष विमल आगलावे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र राख, युवानेते अक्षय गोरंट्याल, राम सावंत, बदर चाऊस, दिनकर घेवंदे, शेख शमशु, महाविर ढक्का आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी गोरंट्याल यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या एकूणच निर्णयाचा त्यांच्या खास शैलित समाचार घेतला. महागाई कमी करून अच्छे दिन हे कागदावरच राहिले असून, आज जनता हैराण झाली आहे. पेट्रोल, डिझेलचे दर हे गगनाला भिडल्याचे गोरंट्याल यांनी सांगितले. त्यामुळे बंदमध्ये जास्तीत जास्त व्यापाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी भीमराव डोंगरे, कल्याण दळे, विजय कामड आदींनी सविस्तर मार्गदर्शन केले.या बैठकीस राजेंद्र जैस्वाल, नगरसेवक जीवन सले, रमेश गौरक्षक, बालकृष्ण कोताकोंडा, नगरसेवीका संगीता पाजगे, विना सामलेट, संजय भगत, अशोक भगत, राजस्वामी, विनोद रत्नपारखे, वैभव उगले, शिवराज जाधव, शमीम कुरेशी, आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शेख महेमूद यांनी केले. सूत्रसंचालन राम सावंत यांनी केले. वसंत जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.

टॅग्स :congressकाँग्रेसBharat Bandhभारत बंद