शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

कुस्ती कितीही खेळवा, बाजी मी मारणार- दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 00:57 IST

कुस्ती स्पर्धा कितीही झाल्या तरी त्यात शेवटचे बक्षीस हे आपणच जिंकणार, असा टोला खा. दानवेंनी लगावल्याने सभागृहात एकच हशा पिकाला

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहराच्या विकासासाठी आपण गेल्या चार वर्षात कोट्यवधी रूपये आणले आहेत, आणखी निधी हवा असल्यास तो आपण खेचून आणू. कुस्ती स्पर्धा कितीही झाल्या तरी त्यात शेवटचे बक्षीस हे आपणच जिंकणार, असा टोला खा. दानवेंनी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे नाव न घेता लगावल्याने सभागृहात एकच हशा पिकाला. रामेश्वर साखर कारखान्याचे जेंव्हा नाव घेता तेव्हा रामनगर कारखान्याचे काय त्याबद्दल मात्र ब्र बोलले जात नाही. असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी केले. ते गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात बोलत होते.शहरातील प्रभाग क्रमांक २२, २३ मधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव खा. दानवे यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, उपनराध्यक्ष राजेश राऊत, भाजपचे उपाध्यक्ष भास्कर दानवे, नगरसेवक विष्णू पाचफुले, प्रशांत गाढे, सिध्दीविनायक मुळे, संजय देठे, नगरसेविका संध्या देठे यांच्यासह गुणवंत विद्यार्थी, पालकांची यावेळी उपस्थिती होती.आपले शहर कोणत्याच बाबतीत मागे नाही, गुणवत्ता आहे, स्टील उद्योग आणि बियाणांचे हब म्हणून आपल्या शहराची ओळख दिल्लीपर्यंत आहे. मात्र शहरात म्हणावा तसा विकास झालेला नव्हता. शहरात, पाणी नाही, लाईट नाही, रस्ते नीट नाही. शहराच्या विकासासाठी चांगले नागरिक आपले तोंड उघडत नसल्याने शहराचा विकास खुंटत चालला असल्याची खंत दानवे यांनी व्यक्त केली. गेल्या चार वर्षात राज्य शासनाकडून कोट्यवधी निधी सिमेंट रस्त्यासाठी , पथदिव्यांसाठी आणल्याने शहरात उजेड तरी दिसत आहे. नाही तर आठवर्षापासून शहर अंधारात होते. याकडे सत्ताधाऱ्यांनी जाणिवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा संताप दानवे यांनी व्यक्त केला. मला सेटलमेंटचे राजकारण जमत नाही. सेटेलमेंटच्या राजकारणामुळे शहराचे वाटोळे केले आहे. राज्यातील अनेक शहरांनी कात टाकली आहे.मात्र शहराला जुनी ओळख असतांना आपण मागे का ... यासाठी जिम्मेदार असलेल्यांना जनतेने जाब विचारण्याची गरज असल्याचे यावेळी दानवे म्हणाले. केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर शहराच्या विकासाठी जे - जे करता येईल ते केले, ड्रायपोर्ट, सिडकोचा प्रकल्प, आयसीटी महाविद्यालय लोखंडीपुलासाठी निधी, शहराच सुसज्ज वाचनालय बनविण्यात येणार असल्याचे दानवे म्हणाले. पत्रिकेवर नाव न टाकल्याने काही फरक पडत नाही. पहिलवानाचा गड हा कुस्तीचे मैदान असल्याचा टोलाही दानवे यांनी राज्यमंत्री खोतकर यांचे नाव न घेता लावला. पैशाची कमी नाही. कामे करुन घ्या, असे दानवे म्हणाले.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेPoliticsराजकारणEducation Sectorशिक्षण क्षेत्र