शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

कोणीही उठतो...खासदार व्हायचे म्हणतो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 00:53 IST

लोकसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे कोणीही उठतो अन खासदार व्हायचे म्हणतो. परंतु त्यांना हे माहिती नाही की, खासदार होण्यासाठी आधी जनतेला विकास कामे कोणती केली हे दाखवावे लागते. तरच जनता विश्वास ठेवते, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या खास शैलीत लगावला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे कोणीही उठतो अन खासदार व्हायचे म्हणतो. परंतु त्यांना हे माहिती नाही की, खासदार होण्यासाठी आधी जनतेला विकास कामे कोणती केली हे दाखवावे लागते. तरच जनता विश्वास ठेवते, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या खास शैलीत लगावला.जालना शहरासाठी विकास कामे करत असताना अनेक नवनवीन प्रकल्प आणले. शहरातील पथदिवे बंद होते, त्यासाठी पैसे दिले तसेच ड्रायपोर्ट, आयसीटी, सिडको प्रकल्प, सीडस्पार्क, विद्यापीठाचे कौशल्य विकास केंद्र, अंतर्गत जलवाहीनी, शहरातील सिमेंट रस्ते आदी कामांसाठी भरीव निधी देऊन जालन्याचा विकास एक हजार ४०० एकरावर नवीन जालना उभे राहणार असल्याचे खा. दानवे यांनी सांगितले.सोमवारी भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीनंतर सायंकाळी येथील मामा चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीवर टीका करतानाच आगामी लोकसभा निवडणुकीत जनता भाजपलाच साथ देईल असा विश्वास व्यक्त केला. एकूणच या सभेत दानवे यांनी त्यांच्या खास शैलीत भाषण करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी ते म्हणाले की, जालना शहराच्या विकासाठी पूर्वी इच्छा असूनही, विकास कामे करता आली नाहीत, कारण केंद्र आणि राज्यात आमचे सरकार नव्हते. आता परिस्थिती बदलली आहे. दोन्ही ठिकाणी आमचे सरकार आहे. त्यामुळे जालनेकरांनी केवळ सांगावे आणि आम्ही निधी आणावा अशी स्थिती आहे. मी घेऊन गेलेला कुठालाही विकास प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने मंजूर करतात असे सांगून, जालन्यातील निजाम कालीन लोखंडी पुलासाठी १३ कोटी रूपयांचा निधी मंजूर असून, पुढील आठवड्यात त्याचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचे खा.दानवे यांनी सांगितले.यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा हा कॉग्रेस, राष्ट्रवादीने झुलवत ठेवला होता . मात्र मराठा समाजाची खरी स्थिती किती हलाखीची आहे, हे ब्राह्मण असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती होती, त्यामुळेच त्यांनी या प्रश्नाला हात घालून १६ टक्के आरक्षण दिल्याचे सांगितले. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीवर टीका करतानाच राष्ट्रवादी काँग्रेस म्हणेच भ्रष्टवादी काँग्रेस असल्याचे सांगून त्यांचे नामकरण करून भ्रष्टवादी काँग्रेस केले पाहिजे असेही त्या म्हणाल्या. यावेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.यावेळी व्यासपीठावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आ. संतोष दानवे, आ. नारायण कुचे, भाजपचे जिल्हाध्यक्ष रामेवर ा भांदरगे, माजी आ. अ‍ॅड. विलास खरात, देविदास देशमुख, शालकीराम म्हस्के, सिध्दिविनायक मुळे, भास्कर दानवे, अशोक पांगारकर यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देविदास देशमुख यांनी केले. यावेळी जि.प. सदस्य, राहुल लोणीकर, नगरसेवक सतीश जाधव आदी उपस्थित होते.मराठवाड्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी वॉटरग्रीड प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. त्यासाठी दहा हजार कोटी रुपयांची गरज आहे. प्रथमदर्शनी या योजनेला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखविला आहे. यासाठी आणखी तरतूद हवी असून, ती मुख्यमंत्री देतील, असा विश्वास पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी भाषणादरम्यान व्यक्त केला.आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा संधी द्यायची आहे. त्यामुळे तुमचे मत हे आता रावसाहेब दानवे या खासदाराला नसून, तुमचे मत हे भाजपचे प्रदेशाध्यक्षाला असल्याचे सांगितले.यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्याचे स्वागत केले. निवडणुका तोंडावर आल्या असल्याने आता आळस झटकून विजयासाठीच कामाला लागण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

टॅग्स :Raosaheb Danweरावसाहेब दानवेBJPभाजपाPoliticsराजकारण