शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

कोणीही उठतो...खासदार व्हायचे म्हणतो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 00:53 IST

लोकसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे कोणीही उठतो अन खासदार व्हायचे म्हणतो. परंतु त्यांना हे माहिती नाही की, खासदार होण्यासाठी आधी जनतेला विकास कामे कोणती केली हे दाखवावे लागते. तरच जनता विश्वास ठेवते, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या खास शैलीत लगावला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे कोणीही उठतो अन खासदार व्हायचे म्हणतो. परंतु त्यांना हे माहिती नाही की, खासदार होण्यासाठी आधी जनतेला विकास कामे कोणती केली हे दाखवावे लागते. तरच जनता विश्वास ठेवते, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या खास शैलीत लगावला.जालना शहरासाठी विकास कामे करत असताना अनेक नवनवीन प्रकल्प आणले. शहरातील पथदिवे बंद होते, त्यासाठी पैसे दिले तसेच ड्रायपोर्ट, आयसीटी, सिडको प्रकल्प, सीडस्पार्क, विद्यापीठाचे कौशल्य विकास केंद्र, अंतर्गत जलवाहीनी, शहरातील सिमेंट रस्ते आदी कामांसाठी भरीव निधी देऊन जालन्याचा विकास एक हजार ४०० एकरावर नवीन जालना उभे राहणार असल्याचे खा. दानवे यांनी सांगितले.सोमवारी भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीनंतर सायंकाळी येथील मामा चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीवर टीका करतानाच आगामी लोकसभा निवडणुकीत जनता भाजपलाच साथ देईल असा विश्वास व्यक्त केला. एकूणच या सभेत दानवे यांनी त्यांच्या खास शैलीत भाषण करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी ते म्हणाले की, जालना शहराच्या विकासाठी पूर्वी इच्छा असूनही, विकास कामे करता आली नाहीत, कारण केंद्र आणि राज्यात आमचे सरकार नव्हते. आता परिस्थिती बदलली आहे. दोन्ही ठिकाणी आमचे सरकार आहे. त्यामुळे जालनेकरांनी केवळ सांगावे आणि आम्ही निधी आणावा अशी स्थिती आहे. मी घेऊन गेलेला कुठालाही विकास प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने मंजूर करतात असे सांगून, जालन्यातील निजाम कालीन लोखंडी पुलासाठी १३ कोटी रूपयांचा निधी मंजूर असून, पुढील आठवड्यात त्याचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचे खा.दानवे यांनी सांगितले.यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा हा कॉग्रेस, राष्ट्रवादीने झुलवत ठेवला होता . मात्र मराठा समाजाची खरी स्थिती किती हलाखीची आहे, हे ब्राह्मण असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती होती, त्यामुळेच त्यांनी या प्रश्नाला हात घालून १६ टक्के आरक्षण दिल्याचे सांगितले. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीवर टीका करतानाच राष्ट्रवादी काँग्रेस म्हणेच भ्रष्टवादी काँग्रेस असल्याचे सांगून त्यांचे नामकरण करून भ्रष्टवादी काँग्रेस केले पाहिजे असेही त्या म्हणाल्या. यावेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.यावेळी व्यासपीठावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आ. संतोष दानवे, आ. नारायण कुचे, भाजपचे जिल्हाध्यक्ष रामेवर ा भांदरगे, माजी आ. अ‍ॅड. विलास खरात, देविदास देशमुख, शालकीराम म्हस्के, सिध्दिविनायक मुळे, भास्कर दानवे, अशोक पांगारकर यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देविदास देशमुख यांनी केले. यावेळी जि.प. सदस्य, राहुल लोणीकर, नगरसेवक सतीश जाधव आदी उपस्थित होते.मराठवाड्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी वॉटरग्रीड प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. त्यासाठी दहा हजार कोटी रुपयांची गरज आहे. प्रथमदर्शनी या योजनेला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखविला आहे. यासाठी आणखी तरतूद हवी असून, ती मुख्यमंत्री देतील, असा विश्वास पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी भाषणादरम्यान व्यक्त केला.आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा संधी द्यायची आहे. त्यामुळे तुमचे मत हे आता रावसाहेब दानवे या खासदाराला नसून, तुमचे मत हे भाजपचे प्रदेशाध्यक्षाला असल्याचे सांगितले.यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्याचे स्वागत केले. निवडणुका तोंडावर आल्या असल्याने आता आळस झटकून विजयासाठीच कामाला लागण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

टॅग्स :Raosaheb Danweरावसाहेब दानवेBJPभाजपाPoliticsराजकारण