शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

कोणीही उठतो...खासदार व्हायचे म्हणतो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 00:53 IST

लोकसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे कोणीही उठतो अन खासदार व्हायचे म्हणतो. परंतु त्यांना हे माहिती नाही की, खासदार होण्यासाठी आधी जनतेला विकास कामे कोणती केली हे दाखवावे लागते. तरच जनता विश्वास ठेवते, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या खास शैलीत लगावला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे कोणीही उठतो अन खासदार व्हायचे म्हणतो. परंतु त्यांना हे माहिती नाही की, खासदार होण्यासाठी आधी जनतेला विकास कामे कोणती केली हे दाखवावे लागते. तरच जनता विश्वास ठेवते, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या खास शैलीत लगावला.जालना शहरासाठी विकास कामे करत असताना अनेक नवनवीन प्रकल्प आणले. शहरातील पथदिवे बंद होते, त्यासाठी पैसे दिले तसेच ड्रायपोर्ट, आयसीटी, सिडको प्रकल्प, सीडस्पार्क, विद्यापीठाचे कौशल्य विकास केंद्र, अंतर्गत जलवाहीनी, शहरातील सिमेंट रस्ते आदी कामांसाठी भरीव निधी देऊन जालन्याचा विकास एक हजार ४०० एकरावर नवीन जालना उभे राहणार असल्याचे खा. दानवे यांनी सांगितले.सोमवारी भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीनंतर सायंकाळी येथील मामा चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीवर टीका करतानाच आगामी लोकसभा निवडणुकीत जनता भाजपलाच साथ देईल असा विश्वास व्यक्त केला. एकूणच या सभेत दानवे यांनी त्यांच्या खास शैलीत भाषण करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी ते म्हणाले की, जालना शहराच्या विकासाठी पूर्वी इच्छा असूनही, विकास कामे करता आली नाहीत, कारण केंद्र आणि राज्यात आमचे सरकार नव्हते. आता परिस्थिती बदलली आहे. दोन्ही ठिकाणी आमचे सरकार आहे. त्यामुळे जालनेकरांनी केवळ सांगावे आणि आम्ही निधी आणावा अशी स्थिती आहे. मी घेऊन गेलेला कुठालाही विकास प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने मंजूर करतात असे सांगून, जालन्यातील निजाम कालीन लोखंडी पुलासाठी १३ कोटी रूपयांचा निधी मंजूर असून, पुढील आठवड्यात त्याचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचे खा.दानवे यांनी सांगितले.यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा हा कॉग्रेस, राष्ट्रवादीने झुलवत ठेवला होता . मात्र मराठा समाजाची खरी स्थिती किती हलाखीची आहे, हे ब्राह्मण असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती होती, त्यामुळेच त्यांनी या प्रश्नाला हात घालून १६ टक्के आरक्षण दिल्याचे सांगितले. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीवर टीका करतानाच राष्ट्रवादी काँग्रेस म्हणेच भ्रष्टवादी काँग्रेस असल्याचे सांगून त्यांचे नामकरण करून भ्रष्टवादी काँग्रेस केले पाहिजे असेही त्या म्हणाल्या. यावेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.यावेळी व्यासपीठावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आ. संतोष दानवे, आ. नारायण कुचे, भाजपचे जिल्हाध्यक्ष रामेवर ा भांदरगे, माजी आ. अ‍ॅड. विलास खरात, देविदास देशमुख, शालकीराम म्हस्के, सिध्दिविनायक मुळे, भास्कर दानवे, अशोक पांगारकर यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देविदास देशमुख यांनी केले. यावेळी जि.प. सदस्य, राहुल लोणीकर, नगरसेवक सतीश जाधव आदी उपस्थित होते.मराठवाड्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी वॉटरग्रीड प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. त्यासाठी दहा हजार कोटी रुपयांची गरज आहे. प्रथमदर्शनी या योजनेला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखविला आहे. यासाठी आणखी तरतूद हवी असून, ती मुख्यमंत्री देतील, असा विश्वास पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी भाषणादरम्यान व्यक्त केला.आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा संधी द्यायची आहे. त्यामुळे तुमचे मत हे आता रावसाहेब दानवे या खासदाराला नसून, तुमचे मत हे भाजपचे प्रदेशाध्यक्षाला असल्याचे सांगितले.यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्याचे स्वागत केले. निवडणुका तोंडावर आल्या असल्याने आता आळस झटकून विजयासाठीच कामाला लागण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

टॅग्स :Raosaheb Danweरावसाहेब दानवेBJPभाजपाPoliticsराजकारण