शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

चार खांबांवर आधारित अण्णा भाऊ साठेंचे साहित्य आजही प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 00:13 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व जेईएस महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यामाने ‘अण्णा भाऊ साठे जीवन व कार्य’ या विषयावर शनिवारी एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन जेईएस महाविद्यालयात करण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : देशाचं स्वातंत्र्य, स्त्रीचं शील, पुरूषाचा स्वाभिमान आणि मानवाची प्रतिष्ठा या चार खांबांवर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य उभे आहे. आज असभ्यतेचे तांडव सर्वत्र पसरले आहे. यामुळे अण्णा भाऊ साठे यांची आज खरी गरज होती. असे मत महात्मा जोतीराव फुले चरित्र साधने प्रकाशन समिती सदस्य सचिव डॉ. श्यामा घोणसे यांनी व्यक्त केले आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व जेईएस महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यामाने ‘अण्णा भाऊ साठे जीवन व कार्य’ या विषयावर शनिवारी एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन जेईएस महाविद्यालयात करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून घोणसे बोलत होत्या.स्वागतपर भाषणात डॉ. जवाहर काबरा यांनी जालन्याची भूक भागविण्याचे कार्य महाविद्यालयाने केले असल्याचे सांगितले. साहित्यिक डॉ. माधव गादेकर यांनी अण्णा भाऊ साठे आंतरराष्ट्रीय दर्जाचे लेखक आहेत. सामान्य, उपेक्षित, वंचित आदींचे जीवन अण्णांच्या साहित्यातून पहायला मिळते असे सांगितले. त्यांच्या साहित्यात स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मुल्य असून ती मानवाचे जीवन सुखकर करते, असेही त्यांनी सांगितले. बाबासाहेब वाघ यांनी श्यामा घोणसे यांचा परिचय करून दिला.

टॅग्स :literatureसाहित्यcollegeमहाविद्यालयSocialसामाजिक