शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

अंजली दमानिया यांना दिलासा, न्यायालयाकडून जामीन मंजूर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2017 22:07 IST

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शनिवारी परतूर न्यायालात हजेरी लावली. न्याययालयाने त्यांना वैयक्तिक बंधपत्रावर जामीन मंजूर केला. बागेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजी जाधव यांनी दमानिया यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. 

परतूर (जालना) : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शनिवारी परतूर न्यायालात हजेरी लावली. न्याययालयाने त्यांना वैयक्तिक बंधपत्रावर जामीन मंजूर केला. बागेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजी जाधव यांनी दमानिया यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. 

दमानिया यांनी बागेश्वरी कारखान्यासचे चेअरमन शिवाजीराव जाधव व त्यांच्या काही संस्थावर आरोप केले होते. यामध्ये श्रद्धा एनर्जीचे सीएमडी यांनी दहा हजार एकर जमीन खरेदीसाठी पैसा कोठून आणला. तसेच काही सिंचन प्रकल्पात  घोटाळा झाल्याचे आरोप, श्रद्धा कंपनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांची असून, ती शिवाजी जाधव चलवत आहेत. सिंचन प्रकल्पाच्या ठेकेदारीतून चेअरमन जाधव यांनी जळगावचा मुक्ताई कारखाना घेतला, अशा प्रकारचे हे आरोप आहेत.

विविध वृत्तपत्र व वाहिन्यांना याबाबत माहिती देऊन चेअरमन शिवाजी जाधव व त्यांच्या संस्थाची बदनामी केल्या प्रकरणी परतूर येथे १९ आक्टोबर २०१६ रोजी अंजली दमानीया यांच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली होती.  या प्रकरणात शनिवारी न्यायालयाच्या नोटिसीनुसार दमानिया सकाळी अकरा वाजता परतूर न्यायालयात हजर झाल्या. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.

फौजदारी गुन्हा नोंदवणार आहे- दमानिया 

न्यायालयात उपस्थित पत्रकारांशी दमानिया यांनी चर्चा केली. श्रद्धा एनर्जी ग्रुपने संकेतस्थळावरील दहा हजार एकर जमिनीचा उल्लेख काढून टाकला आहे. त्याचे आपल्याकडे पुरावे आहेत. याप्रकरणी आपण फौजदारी गुन्हा दाखल करणार आहोत.  मी अभ्यासपूर्ण बोलत असून, केलेल्या आरोपावर ठाम आहे. हा खटला परतूर ऐवजी जळगाव किंवा इतरत्र दाखल करायला हवा होता. केवळ मला त्रास देण्यासाठी हा खटला परतूरला दाखल करण्यात आला. आपण हे प्रकरण शेवटपर्यंत लढत राहणार असल्याचे अंजली दमानिया यांनी सांगितले. 

आरोपात तथ्य नाही- जाधव 

बागेश्वरीचे चेअरमन शिवाजीराव जाधव म्हणाले की, अंजली दमानिया यांनी केलेल्या खोट्या आरोंपामुळे आमच्या संस्थांची बदनामी झाली. बँकानी आम्हाला कर्ज नाकारले. दमानिया यांनी केलेल्या आरोपात काही तथ्य नाही. संकेत स्थळावरील माहिती आमची आहे. काढली काय, आणि ठेवली काय, शेतक-यांच्या दहा हजार एकरवर आम्ही ठिबक केले. जमीन आमची नाही. शेवटपर्यंत खटला हा लढू.