शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

अंजली दमानिया यांना दिलासा, न्यायालयाकडून जामीन मंजूर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2017 22:07 IST

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शनिवारी परतूर न्यायालात हजेरी लावली. न्याययालयाने त्यांना वैयक्तिक बंधपत्रावर जामीन मंजूर केला. बागेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजी जाधव यांनी दमानिया यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. 

परतूर (जालना) : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शनिवारी परतूर न्यायालात हजेरी लावली. न्याययालयाने त्यांना वैयक्तिक बंधपत्रावर जामीन मंजूर केला. बागेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजी जाधव यांनी दमानिया यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. 

दमानिया यांनी बागेश्वरी कारखान्यासचे चेअरमन शिवाजीराव जाधव व त्यांच्या काही संस्थावर आरोप केले होते. यामध्ये श्रद्धा एनर्जीचे सीएमडी यांनी दहा हजार एकर जमीन खरेदीसाठी पैसा कोठून आणला. तसेच काही सिंचन प्रकल्पात  घोटाळा झाल्याचे आरोप, श्रद्धा कंपनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांची असून, ती शिवाजी जाधव चलवत आहेत. सिंचन प्रकल्पाच्या ठेकेदारीतून चेअरमन जाधव यांनी जळगावचा मुक्ताई कारखाना घेतला, अशा प्रकारचे हे आरोप आहेत.

विविध वृत्तपत्र व वाहिन्यांना याबाबत माहिती देऊन चेअरमन शिवाजी जाधव व त्यांच्या संस्थाची बदनामी केल्या प्रकरणी परतूर येथे १९ आक्टोबर २०१६ रोजी अंजली दमानीया यांच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली होती.  या प्रकरणात शनिवारी न्यायालयाच्या नोटिसीनुसार दमानिया सकाळी अकरा वाजता परतूर न्यायालयात हजर झाल्या. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.

फौजदारी गुन्हा नोंदवणार आहे- दमानिया 

न्यायालयात उपस्थित पत्रकारांशी दमानिया यांनी चर्चा केली. श्रद्धा एनर्जी ग्रुपने संकेतस्थळावरील दहा हजार एकर जमिनीचा उल्लेख काढून टाकला आहे. त्याचे आपल्याकडे पुरावे आहेत. याप्रकरणी आपण फौजदारी गुन्हा दाखल करणार आहोत.  मी अभ्यासपूर्ण बोलत असून, केलेल्या आरोपावर ठाम आहे. हा खटला परतूर ऐवजी जळगाव किंवा इतरत्र दाखल करायला हवा होता. केवळ मला त्रास देण्यासाठी हा खटला परतूरला दाखल करण्यात आला. आपण हे प्रकरण शेवटपर्यंत लढत राहणार असल्याचे अंजली दमानिया यांनी सांगितले. 

आरोपात तथ्य नाही- जाधव 

बागेश्वरीचे चेअरमन शिवाजीराव जाधव म्हणाले की, अंजली दमानिया यांनी केलेल्या खोट्या आरोंपामुळे आमच्या संस्थांची बदनामी झाली. बँकानी आम्हाला कर्ज नाकारले. दमानिया यांनी केलेल्या आरोपात काही तथ्य नाही. संकेत स्थळावरील माहिती आमची आहे. काढली काय, आणि ठेवली काय, शेतक-यांच्या दहा हजार एकरवर आम्ही ठिबक केले. जमीन आमची नाही. शेवटपर्यंत खटला हा लढू.