शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

वृद्धेचा गळा चिरून मृतदेह शेतात फेकला, पिशवीतील चिट्ठीवरून पटली ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2022 19:06 IST

पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता, गळ्याला दोरी बांधलेली होती. धारदारशस्त्राने महिलेचा गळा व मानेवर वार करण्यात आले होते. 

जालना : एका ६५ वर्षीय महिलेचा गळा आवळून व धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना बदनापूर तालुक्यातील साखरवाडी येथे गुरूवारी रात्री उघडकीस आली. सुमनबाई माणिक जिगे (६५ रा. पानशेंद्रा, ता.जि. जालना) असे मयत महिलेचे नाव आहे. 

या प्रकरणी शुक्रवारी सकाळी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरूवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास  बदनापूर तालुक्यातील कंडारी ते चिखली रोडवरील साखरवाडी जवळील एका  शेतातील लिंबाच्या झाडाखाली  महिलेचा मृतदेह ग्रामस्थांना दिसून आला. ग्रामस्थांनी याची माहिती बदनापूर पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता, गळ्याला दोरी बांधलेली होती. धारदारशस्त्राने महिलेचा गळा व मानेवर वार करण्यात आले होते. 

शिवाय, महिलेच्या कंबरेला असलेल्या पिशवीतील  कागदावर एका व्यक्तीचा मोबाईल क्रमांक दिसून आला.त्यानंतर महिलेची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी बदनापूर येथील ग्रामीण रूग्णालयात पाठविला. या प्रकरणी मयत महिलेचा पुतण्या चंद्रकांत जिगे यांच्या  फिर्यादीवरून बदनापूर पोलीस ठाण्यात शुक्रवारी सकाळी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळाला पोनि. शिवाजी बंटेवाड यांनी भेट दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना