शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

आरटीई प्रवेश प्रक्रियेतील शासनाकडील प्रतिपूर्तीची रक्कम गत दीड वर्षापासून अप्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:03 IST

जालना : वंचित दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शिक्षण संस्थेत प्रवेश मिळावा, यासाठी शासनाने आरटीई प्रवेश प्रक्रियेला चालना दिली. परंतु, ...

जालना : वंचित दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शिक्षण संस्थेत प्रवेश मिळावा, यासाठी शासनाने आरटीई प्रवेश प्रक्रियेला चालना दिली. परंतु, गत दीड वर्षापासून आरटीई अंतर्गत प्रवेश दिलेल्या संस्थांना शासनाकडील देय असलेली प्रतिपूर्तीची रक्कम अद्याप मिळालेली नाही.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार वंचित दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये प्रवेश मिळावा, यासाठी शासनस्तरावरून आरटीई ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. या प्रवेश प्रक्रियेनंतर शासन संस्थांना प्रतिपूर्तीची रक्कम अदा करीत असते. परंतु, २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील अर्ध्याहून अधिक व २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील पूर्ण रक्कम अद्याप शासनाकडून प्राप्त झालेली नाही. निधी मिळावा यासाठी संस्थाचालकांचा पाठपुरावा सुरू आहे.

किती अपेक्षित होते, प्रत्यक्षात किती मिळाले?

२०१७-१८ या वर्षात मिळाली पूर्ण रक्कम

२०१७-१८ या वर्षात आरटीई अंतर्गत २१४ शाळांमध्ये १५४६ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता. या प्रवेशाच्या अनुषंगाने शासनाने ठरवून दिलेल्या प्रतिपूर्ती रकमेनुसार जवळपास अडीच कोटींहून अधिकची रक्कम देण्यात आली आहे.

२०१८-१९ या वर्षातील अर्धी रक्कम रखडली

२०१८-१९ या वर्षात आरटीई अंतर्गत जिल्ह्यातील २४३ शाळांमध्ये १८६८ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. त्यापोटी जवळपास चार कोटी रुपये शासनाकडून देण्यात आले आहेत. अद्याप उर्वरित अर्ध्याहून अधिक प्रतिपूर्ती रक्कम मिळालेली नाही.

२०१९-२० या वर्षात किती मिळाले?

कोरोनापूर्वीच्या शैक्षणिक वर्षात २०१९-२० मध्ये आरटीई अंतर्गत जिल्ह्यातील २९५ शाळांमध्ये ३२९५ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. या प्रक्रियेंतर्गत संस्थांना जवळपास १५ कोटी रुपयांची प्रतिपूर्ती रक्कम शासनाकडून प्राप्त होणे अपेक्षित आहे. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही रक्कम मिळालेली नाही. दरम्यान, कोरोनामुळे खासगी शाळांचेही आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यामुळे शासनाने जिल्ह्यातील शाळांची रखडलेली प्रतिपूर्ती रक्कम त्वरित आणि एकाच टप्प्यात द्यावी, अशी मागणी मेस्को संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गजानन वाळके यांनी केली.

शासनाकडे पाठपुरावा

जिल्ह्यात चालू शैक्षणिक वर्षातील आटीई प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यापूर्वीच्या प्रवेशाची संस्थांची रक्कम मिळावी, यासाठी शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.

- कैलास दातखीळ, शिक्षणाधिकारी

जिल्ह्यात आरटीई नोंदणीकृत शाळा २९०

२०१७-१८ १५४६

२०१८-१९ १८६८

२०१९-२० ३१७७