शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

अंबड शहराला पाणी देणार नाही -संगीता गोरंट्याल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 01:03 IST

दररोज सहा एमएलडी पाणी अंबड पालिकेला मिळवण्याचा आ. नारायण कुचे यांचा प्रयत्न आहे. जालनेकरांवर हा अन्याय असून, याविरोधात आपण मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार असल्याचे नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : युडीआयच्या विशेष योजनेतून केंद्र सरकार, राज्य सरकार आणि जालना पालिकेच्या आर्थिक सहभागातून जायकवाडी -जालना ही नवीन जलवाहिनी योजना राबविण्यात आली. मात्र, सत्तेचा गैरवापर करुन या योजनेवर हक्क सांगत तब्बल दहा टक्के म्हणजेच दररोज सहा एमएलडी पाणी अंबड पालिकेला मिळवण्याचा आ. नारायण कुचे यांचा प्रयत्न आहे. जालनेकरांवर हा अन्याय असून, याविरोधात आपण मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार असल्याचे नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.नगराध्यक्षा गोरंट्याल म्हणाल्या की, जालना शहर व परिसरात ड्रायपोर्ट, आयसीटी, सिडको वसाहत या व अन्य प्रस्तावित विकास प्रकल्पांमुळे पाण्याची गरज मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. सध्या शहराची ८० एमएलडी पाण्याची गरज असताना ६० एमएलडी पाण्यावर भागवावे लागत आहे. त्यातच अंतर्गत जलवाहिनी अंथरण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर व विविध ठिकाणचे जलकुंभ उभारणीनंतर नियोजनबद्ध वितरणासाठी पाण्याची गरज वाढणार आहे. मलनिस्सारण प्रकल्पही लवकरच सुरु होणार आहे. यामुळे आगामी काळात जालना शहर व परिसराचीच पाण्याची गरज अधिक राहील. त्यातच अंबड पालिकेच्यावतीने आ. नारायण कुचे यांनी या योजनेवर अंबड पालिकेचा हिस्सा दाखवत दररोज तब्बल सहा एमएलडी पाण्याची मागणी राज्य शासनाकडे केली आहे. सध्या अंबड पालिकेला अडीच एमएलडी पाणी दिले जात आहे.जालन्याच्या हिश्श्याचे पाणी अंबड पालिकेने पळवले तर शहरावर पुन्हा एक महिना अंतराने पाणी पुरवठा करण्याची वेळ येण्याची भिती माजी आ. गोरंट्याल यांनी व्यक्त केली. २०१२ मध्ये जशी स्थिती होती तीच पुन्हा निर्माण होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. जालनेकरांच्या हितासाठी लोकप्रतिनिधींनी याप्रश्नी सहकार्य करुन शहराच्या हिश्श्याचे इतरांना घेऊ देऊ नये, अशी अपेक्षाही माजी आ. गोरंट्याल यांनी व्यक्त केली.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईgovernment schemeसरकारी योजना