शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अंबड शहराला पाणी देणार नाही -संगीता गोरंट्याल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 01:03 IST

दररोज सहा एमएलडी पाणी अंबड पालिकेला मिळवण्याचा आ. नारायण कुचे यांचा प्रयत्न आहे. जालनेकरांवर हा अन्याय असून, याविरोधात आपण मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार असल्याचे नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : युडीआयच्या विशेष योजनेतून केंद्र सरकार, राज्य सरकार आणि जालना पालिकेच्या आर्थिक सहभागातून जायकवाडी -जालना ही नवीन जलवाहिनी योजना राबविण्यात आली. मात्र, सत्तेचा गैरवापर करुन या योजनेवर हक्क सांगत तब्बल दहा टक्के म्हणजेच दररोज सहा एमएलडी पाणी अंबड पालिकेला मिळवण्याचा आ. नारायण कुचे यांचा प्रयत्न आहे. जालनेकरांवर हा अन्याय असून, याविरोधात आपण मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार असल्याचे नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.नगराध्यक्षा गोरंट्याल म्हणाल्या की, जालना शहर व परिसरात ड्रायपोर्ट, आयसीटी, सिडको वसाहत या व अन्य प्रस्तावित विकास प्रकल्पांमुळे पाण्याची गरज मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. सध्या शहराची ८० एमएलडी पाण्याची गरज असताना ६० एमएलडी पाण्यावर भागवावे लागत आहे. त्यातच अंतर्गत जलवाहिनी अंथरण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर व विविध ठिकाणचे जलकुंभ उभारणीनंतर नियोजनबद्ध वितरणासाठी पाण्याची गरज वाढणार आहे. मलनिस्सारण प्रकल्पही लवकरच सुरु होणार आहे. यामुळे आगामी काळात जालना शहर व परिसराचीच पाण्याची गरज अधिक राहील. त्यातच अंबड पालिकेच्यावतीने आ. नारायण कुचे यांनी या योजनेवर अंबड पालिकेचा हिस्सा दाखवत दररोज तब्बल सहा एमएलडी पाण्याची मागणी राज्य शासनाकडे केली आहे. सध्या अंबड पालिकेला अडीच एमएलडी पाणी दिले जात आहे.जालन्याच्या हिश्श्याचे पाणी अंबड पालिकेने पळवले तर शहरावर पुन्हा एक महिना अंतराने पाणी पुरवठा करण्याची वेळ येण्याची भिती माजी आ. गोरंट्याल यांनी व्यक्त केली. २०१२ मध्ये जशी स्थिती होती तीच पुन्हा निर्माण होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. जालनेकरांच्या हितासाठी लोकप्रतिनिधींनी याप्रश्नी सहकार्य करुन शहराच्या हिश्श्याचे इतरांना घेऊ देऊ नये, अशी अपेक्षाही माजी आ. गोरंट्याल यांनी व्यक्त केली.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईgovernment schemeसरकारी योजना