शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

अंबड शहराला पाणी देणार नाही -संगीता गोरंट्याल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 01:03 IST

दररोज सहा एमएलडी पाणी अंबड पालिकेला मिळवण्याचा आ. नारायण कुचे यांचा प्रयत्न आहे. जालनेकरांवर हा अन्याय असून, याविरोधात आपण मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार असल्याचे नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : युडीआयच्या विशेष योजनेतून केंद्र सरकार, राज्य सरकार आणि जालना पालिकेच्या आर्थिक सहभागातून जायकवाडी -जालना ही नवीन जलवाहिनी योजना राबविण्यात आली. मात्र, सत्तेचा गैरवापर करुन या योजनेवर हक्क सांगत तब्बल दहा टक्के म्हणजेच दररोज सहा एमएलडी पाणी अंबड पालिकेला मिळवण्याचा आ. नारायण कुचे यांचा प्रयत्न आहे. जालनेकरांवर हा अन्याय असून, याविरोधात आपण मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार असल्याचे नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.नगराध्यक्षा गोरंट्याल म्हणाल्या की, जालना शहर व परिसरात ड्रायपोर्ट, आयसीटी, सिडको वसाहत या व अन्य प्रस्तावित विकास प्रकल्पांमुळे पाण्याची गरज मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. सध्या शहराची ८० एमएलडी पाण्याची गरज असताना ६० एमएलडी पाण्यावर भागवावे लागत आहे. त्यातच अंतर्गत जलवाहिनी अंथरण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर व विविध ठिकाणचे जलकुंभ उभारणीनंतर नियोजनबद्ध वितरणासाठी पाण्याची गरज वाढणार आहे. मलनिस्सारण प्रकल्पही लवकरच सुरु होणार आहे. यामुळे आगामी काळात जालना शहर व परिसराचीच पाण्याची गरज अधिक राहील. त्यातच अंबड पालिकेच्यावतीने आ. नारायण कुचे यांनी या योजनेवर अंबड पालिकेचा हिस्सा दाखवत दररोज तब्बल सहा एमएलडी पाण्याची मागणी राज्य शासनाकडे केली आहे. सध्या अंबड पालिकेला अडीच एमएलडी पाणी दिले जात आहे.जालन्याच्या हिश्श्याचे पाणी अंबड पालिकेने पळवले तर शहरावर पुन्हा एक महिना अंतराने पाणी पुरवठा करण्याची वेळ येण्याची भिती माजी आ. गोरंट्याल यांनी व्यक्त केली. २०१२ मध्ये जशी स्थिती होती तीच पुन्हा निर्माण होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. जालनेकरांच्या हितासाठी लोकप्रतिनिधींनी याप्रश्नी सहकार्य करुन शहराच्या हिश्श्याचे इतरांना घेऊ देऊ नये, अशी अपेक्षाही माजी आ. गोरंट्याल यांनी व्यक्त केली.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईgovernment schemeसरकारी योजना