शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

अंबड तालुक्यात ४ हजार घरे झाली चुलमुक्त; प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे यश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2017 16:03 IST

धुरामुळे ग्रामीण महिलांनासुद्धा विविध आजाराला सामोरे जावे लागत होते. यासाठीच  प्रधानमंत्री उज्ज्वला योजना राबविण्यात आली. अंबड तालुक्यातील ३ हजार ६४० कुंटुबला या योजनेचा लाभ झाल्याने अनेक कुटुंबाना धुरापासून मुक्ती मिळाली आहे.

जालना : स्वयंपाकापासून ते अंघोळीला लागणा-या गरम पाणी करण्यापर्यंत घरातील बाया-बापडींना चुल पेटवण्यासाठी जळतन (लाकूड-फाटा) जमवाजमव करण्यासाठी रानोमाळ भटकावे लागायचे. तरच सकाळ-संध्याकाळ चुली पेटत असत. याला फाटा देण्यासाठी तालुक्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजना राबविण्यात आली. यामुळे तालुक्यातील ४ हजार घरे चुलमुक्त होऊन या कुटुंबांची धूरापासून मुक्ती झाली आहे.  

ग्रामीण भागात गॅसची सुविधा नसल्याने स्वयंपाक व इतर दैनदिन कामासाठी इंधन म्हणून लाकूड फाट्याची गरज लागते. यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात येत असे. यातून पर्यावरणास हानी पोहोचायची. तसेच धुरामुळे ग्रामीण महिलांनासुद्धा विविध आजाराला सामोरे जावे लागत होते. यासाठीच  प्रधानमंत्री उज्ज्वला योजना राबविण्यात आली. अंबड तालुक्यातील ३ हजार ६४० कुंटुबला या योजनेचा लाभ झाल्याने अनेक कुटुंबाना धुरापासून मुक्ती मिळाली आहे.

जागतिक आरोग्य संस्थेच्या  अहवालानुसार चुलीचा धूर श्वासनाद्वारे शरीरात जाणे म्हणजे एका तासात ४०० सगारेट ओढण्यासारखे आहे. सर्व सामान्य घरातील महिला किमान सलग दोन तास सकाळी व दोन तास रात्री या धुराच्या सान्निध्यात येतात. यामुळे महिलांचे आरोग्य धोक्यात आले होते. महिलांच्या आरोग्यावर घातक परिणाम करणारा हा स्वयंपाकाचा धूर निर्माणच होऊ नये म्हणून शासनाने प्रधानमंत्री उज्वला योजना अमलात आणली आहे. डिसेंबर २०१६ अखेर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आलेल्या योजनेमुळे अनेक सर्व सामान्य कुटुंबीयांना चुली पासून मुक्ती मिळाली आहे. तालुक्यात २०११ मध्ये करण्यात आलेल्या सर्व्हेनूसार तालुक्यातील चार हजार घरे चुलमुक्त झाल्याचे तहसीलदार दत्ता भारस्कर यांनी सांगितले. याचा निश्चितच ग्रामस्थांना फायदा होत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

जनजागृती करण्याची गरजपर्यावरणाचे संर्वधन आणि महिलांचे आरोग्य चांगले राहवे यासाठी पंधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र याचा अद्यापही म्हणावा तसा ग्रामीण भागात जनजागृती झाली नाही. यामुळे अद्यापही ग्रामीण भागात धूर कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे या योजनेबाबात मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे गरजेचे आहे.