शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

"आधीच ६० टक्क्यांना कुणबी आरक्षण, एकदमच ५ कोटी मराठा ओबीसीत येतील हा गैरसमज"

By विजय मुंडे  | Updated: October 31, 2023 12:10 IST

आपण महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय माघार घेणार नाही.

जालना : अगोदरच ६० टक्के मराठा समाज ओबीसीत आहे. त्यामुळे ५ कोटी मराठा समाज ओबीसीत येणार हा गैरसमज दूर करा. आपण महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय माघार घेणार नाही. अर्धवट आरक्षणाचा जीआर स्वीकारणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितले आहे. कुणबी प्रमाणपत्रासाठी, ओबीसीत येण्यासाठी आणखी जास्तीचा मार्ग काय यावर आपण अभ्यासकांसमवेत आज बैठक घेणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या दुसऱ्या टप्प्यातील आमरण उपोषणाचा मंगळवारी सातवा दिवस आहे. जरांगे पाटील यांच्याशी मंगळवारी सकाळीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली. झालेल्या चर्चेची माहिती देण्यासाठी जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

जरांगे म्हणाले, ओबीसीच्या यादीत ८३ व्या क्रमांकावर मराठा कुणबी आहे. व्यवसायावर आधारित जाती निर्माण झाल्या आहेत. त्यानुसार आरक्षण दिले आहे. त्यामुळे २००४ च्या जीआरमध्ये दुरूस्ती करावी. समितीकडे अनेक पुरावे आहेत. शासनाला महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला आरक्षण देता येणार आहे. त्याबाबतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितले आहे. अगोदरच ६० टक्के मराठा ओबीसी आरक्षणात गेला आहे. थोडे राहिले आहेत. गैरसमज दूर करा. उर्वरित थोडा समाज बाकी आहे. त्यामुळे विशेष अधिवेशन घेवून मराठा समाजाला आरक्षण द्या, त्याला चॅलेंज होणार नाही. ज्यांना घ्यायचे ते घेतील ज्यांना घ्यायचे नाही ते घेणार नाहीत. परंतु, अर्धवट घेणार नाही, असेही जरांगे पाटील म्हणाले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलJalanaजालनाMaratha Reservationमराठा आरक्षण