शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

३६ हजार कामगारांना १२ कोटी रुपयांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 00:35 IST

बांधकाम कल्याण मंडळाच्या वतीने जिल्ह्यातील नोंदणीकृत पात्र बांधकाम कामगारांना आठ वर्षात साहित्य खरेदीसाठी १२ कोटी ६२ लाख ५२ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले

गजानन वानखडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील बांधकाम कल्याण मंडळाच्या वतीने जिल्ह्यातील नोंदणीकृत पात्र बांधकाम कामगारांना आठ वर्षात साहित्य खरेदीसाठी १२ कोटी ६२ लाख ५२ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. यामुळे त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत होत आहे.बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांसाठी २८ विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. यामध्ये इमारत बांधकाम कामगार, दगडकाम, रंगकाम, सुतारकाम, लिफ्ट आणि स्वयंचलित जिन्याचे काम, सुरक्षा उपकरण, जलसिंचन, काचेच्या संदर्भात काम, अग्निशमन यंत्रणा, इलेक्ट्रिशियन तसेच विद्युत काम, विटांचे तसेच कौलारु काम, सौरउर्जेशी निगडीत, वातानुकूलित यंत्र दुरुस्ती, कामगारांच्या पाल्यासाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती यासह २८ प्रकारचे काम करणाऱ्या कामगारांसाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येतात. १८ ते ६० या वयोगटातील कामगारांनी २०११ ते २०१९ पर्यंत येथील कामगार मंडळात ६० हजारांपेक्षा जास्त कामगारांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ३६ हजार कामगार जीवित आहेत. कामगारांना विविध कामे करताना लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी नोंदणीकृत कामगारांना कामगार मंडळाच्या वतीने २०१४ पर्यंत ३ हजार रुपये आर्थिक सहाय्य करण्यात येत होते. वाढत्या महागाईमुळे शासनाने २०१८ पासून २ हजार रुपयांची वाढ करुन अनुदान ५ हजार रुपये प्रति कामगार केले. याचा फायदा कामगारांना व्हावा यासाठी जिल्ह्यात अनेक वेळा नोंदणी अभियान राबविण्यात आले आहे. तसेच दररोज येथील कार्यालयात ७०० कामगारांची नोंदणी होत असल्याची माहिती आहे. मात्र येथील कार्यालयात कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याने अर्जाची छाननी, अनुदान वेळेत मिळण्यास अडचणी येत असल्याच्या तक्रारी आहेत.येथील इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आणि सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात कामगार अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकरी, वेतन अधिकारी, सुविधाकार, कनिष्ठ लेखापाल, डेटा एट्री आॅपरेटर, लिपिक- टंकलेखक, शिपाई अशी १८ पदे मंजूर आहेत.यापैकी एक कामगार अधिकारी दोन शिपाई आदी पदे भरण्यात आली असून उर्वरित पदे रिक्त आहेत. अनेक कामे कंत्राटी कर्मचाºयांव्दारे करण्यात येत आहे. विशेष म्हणजे दररोज ७०० कामगारांची नोंदणी होेते. कर्मचाºयांच्या रिक्त पदांमुळे विविध कामांना विलंब होत असल्याची ओरड होत आहे.

टॅग्स :Labourकामगारfundsनिधीgovernment schemeसरकारी योजना