शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
2
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
3
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
4
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
5
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
6
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!
7
१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल
8
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
9
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
10
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
11
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
12
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
13
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
14
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
15
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
16
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
17
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
18
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
19
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...

साडेचौदाशे कोटींचा कृषी पतपुरवठा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 12:54 AM

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आगामी खरीप व रबी हंगामासाठी १४६८ कोटी रुपयांचे कृषी कर्जवाटपाचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने निश्चित केले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यामध्ये ५५ कोटी ४४ लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

बाबासाहेब म्हस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आगामी खरीप व रबी हंगामासाठी १४६८ कोटी रुपयांचे कृषी कर्जवाटपाचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने निश्चित केले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यामध्ये ५५ कोटी ४४ लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे. कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतक-यांनाही नव्याने कर्ज वितरित केले जाणार आहे.जिल्ह्यात पाच लाख ३५ हजार शेतकरी संख्या आहे. यामध्ये अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांची संख्या चार लाख सात हजार असून सर्वसाधारण जमीन धारणा एक हेक्टर २६ आर इतकी आहे. मागील आर्थिक वर्षात (वर्ष-२०१७-१८) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, व्यापारी व ग्रामीण बँकांना मिळवून जिल्ह्यासाठी १४११ कोटी ६६ लाख रुपये कृषी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित केले होते. मात्र, खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे नवीन कर्ज मिळविण्याऐवजी कर्जमाफीचे आॅनलाइन फार्म भरण्यासाठी शेतकºयांची मोठी धावपळ उडाली. शिवाय कर्जदार बँकांनाही शेतक-यांची विविध प्रकारची माहिती आपले सरकार या आॅनलाइन पोर्टलवर सातत्याने अद्ययावत करावी लागली. कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळायला वर्षभराचा कालावधी लागल्यामुळे बँकांना कृषी पतपुरठ्याचे निर्धारित उद्दिष्ट गाठता आले नाही. कर्जमाफी प्रक्रियेच्या गोंधळात नियमित कर्जफेड करणाºया बहुतांश शेतक-यांना नव्याने कृषी कर्ज मिळू शकले नाही. परिणामी गत आर्थिक वर्षात १४११.६६ कोटींपैकी केवळ २७७.१८ कोटींचे कृषी कर्जवाटप झाले. मात्र, या आर्थिक वर्षात बहुतांश थकबाकीदार शेतकरी कर्जमाफीचा लाभ मिळाल्यामुळे नव्याने कर्ज घेण्यास पात्र ठरणार आहेत. त्यामुळे यंदा कृषी पत पुरवठ्याचे उद्दिष्ट ५५ कोटी ४४ लाख रुपयांनी वाढविण्यात आले आहे.चालू आर्थिक वर्षात कृषी पतपुरवठ्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बँक अधिका-यांची बैठक घेण्यात येणार आहे. अधिकाधिक शेतक-यांना कृषीकर्ज वाटप करण्याच्या सूचना सर्व बँकांना देण्यात येणार आहे.- निशांत ईलमकर,व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रAgriculture Sectorशेती क्षेत्र